Monday 31 December 2012

HAPPY~NEW~YEAR-2013

This is the ending of year 2012. . . after less than an hour new year 2013 is coming. . .
Near about whole country & the world is celebrating new year. . . but some youngsters have decided to not celebrate welcome ceremony of new year 2013 to tribute Delhi gang rape victim DAMINI / NIRBHAYA / AMANAT who died before just 2 days. . .
After her death whole country is in anger so some peoples decided this. . .
I know its not sufficient to repay her sacrifice. . . but when whole country is mourning after DAMINI's death How INDIA can celebrate any day. . . ?
I am supporting and SALUTE Them all those who decided to not celebrate new year's welcome day. . . for Rest in Peace the soul of DAMINI...
However I am wishing you because I have not any right to sour in your happiness so. . .
I wish. . .

May coming year 2013 brings Health, Wealth, Success, Prosperity & fulfil Happiness in your Life...

Wish you a very-very. . .
2013-new-year.jpg

=*HAPPY~NEW~YEAR*=

=*2013*=

-RAJESH D. HAJARE & Family

BlogPost 37: 'ते 13 दिवस' - 16 ते 29 डिसेँबर 2012

टिप: याच लेख/ब्लॉगचा यापुर्वीचा मजकूर (सुरूवातीपासून) वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

अलीकडेच अमेरीकेत काही गुंडांनी एका शाळेतील विद्यार्थ्याँवर गोळ्या झाडल्या... त्यात ब-याच निष्पाप मुलांचा जीव गेला... या घटनेनंतर थेट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भाषण दिलं... ते निव्वळ आश्वासन देणारं नव्हे तर संतप्त देशाला धीर देणारं भाषण होतं... त्यावेळी भाषण देणारे ओबामा एक राजकारणी नेते नव्हे तर 2 मुलीँचे 'बाप' होते... आणि भारतात जेव्हा इतकी मोठी मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी घडली तेव्हा भारतीय नेत्यांच्या भाषणात केवळ "गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल." हे आश्वासन व "संतप्त देशवासीयांनी संयम व शांतता बाळगावी." हे आवाहन झळकत होतं... देशाच्या 3 उच्चपदस्थ मा. मंत्रीमहोदयांनी भाषणात स्वत: 3 मुलीँचे 'पिता' असल्याचे सांगीतले खरे, पण सन्माननीय मंत्रीमहोदय आपल्या मुली सार्वजनिक बसमध्ये वर्षातून कितीवेळा प्रवास करतात हेही सांगून द्यायला हवे होते... त्यातही देशाच्या महामहीम राष्ट्रपतीँच्या संदेशास बरेच दिवस लागले... यापूर्वी अमेरीकेच्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निकालानंतर मी माझ्या मागील एका लेख/ब्लॉगमध्ये फरक-भारत व अमेरीकेच्या राजकारणातला...! व्यक्त केला होता तो या घटनेनंतर परत जाणवला... ओबामांच्या भाषणानंतर अमेरीकन जनता निश्चितच थोडीशी निश्चिँत झाली असणार परंतु भारतीय नेत्यांच्या आश्वासनानंतर असं होणं जरा संभ्रमीच वाटतं... त्याला कारणही तसंच आहे... ही सरकारची नेहमीचीच कला आहे जनतेची मनसमजावणी करण्याची... पण बस्! आता पुरे... अजून नव्हे..! आता भारतीय जनता जागून शहाणी झालीय... आम्हाला आता फक्त 'आश्वासनं' नकोत 'अॅक्टिव्हिटी' हवीय...

आता मला या जनक्षोभात व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होणा-या प्रत्येक देशवासीयांना काही सांगावं व विचारावसं वाटतं... आपली मागणी योग्यच आहे... "जोपर्यँत कठोर कायदा बनत नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणार नाहीत." होय हे अगदी खरंय... आणि "बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी तर सर्वात मोठी फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही." कारण "जेव्हा कोणत्याही वयाच्या स्त्रीजातीवर बलात्कार होतो तेव्हा स्वत:चा तीळमात्र अपराध नसतानादेखील लोकलज्जेला घाबरून एकतर ती आत्महत्या करते, आणि जर का तीने धीर धरून जगण्याचा प्रयत्न केलाच तर समाज तीला जगू देत नाही; परिहार्याने ती जरी श्वास घेत असली तरी मात्र ती आतून क्षणेक्षणी फक्त मरत असते." मग "निरपराध महिलेला मरणास/मरणयातना सोशण्यास भाग पाडणा-या अपराधी नराधमांना ताठ मानेने जगण्याचा काय अधिकार उरतो?"

पण काय बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद संविधानात झाल्यास असे गुन्हे थांबतील? आज हत्येच्या गुन्ह्यासाठी संविधानात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 मध्ये फाशीची तरतूद आहे... पण किती गुन्हेगारांना फाशी होते? आणि फाशी झालीही तर अंमलबजावणीस किती विलंब लागतो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाशीची शिक्षा असल्यामुळे काय हत्या होणे थांबलेत? नाही ना..? तरी बलात्काराचा गुन्हा अजामीनपात्र व्हावा... खटला जलदगती (Fasttrack) न्यायालयात चालावा आणि कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा (अर्थात फाशीच) असावी या मागण्या अयोग्य नाहीतच... कारण फाशीची मागणी केल्यास फाशी नाही तर किमान फाशीपूर्वीच्या सर्वात कठोर शिक्षेचा (जन्मठेपच/नपुंसकत्व) कायदा येईल पण ही मागणी केल्यास परत कमी शिक्षा न होवो...!

एकीकडे बलात्काराच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यँत (उलट नाही) आंदोलन व 'निर्भया/दामिनी' साठी प्रार्थना होत असताना काय हे गुन्हे थांबलेत? उलट या 13 दिवसात बरेच बलात्कार व विनयभंगाच्या घटना समोर आल्या... म्हणून फक्त कठोर कायदा येऊन भागणार नाही... आवश्यकता आहे- सतर्कता बाळगण्याची, हिँमत एकवटण्याची, 'निर्भय' बनण्याची आणि मुख्यत: महिलांनी संरक्षणार्थ प्रत्युत्तर देऊन प्रतीकार करण्याची... एकीकडे आम्ही स्त्री-पुरूष समानतेचे धडे देतो आणि दुसरीकडे या 21 व्या शतकाच्या 12व्या वर्षाचा अंत होत असतानादेखील पुरूषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली कुटूंबापासून तर समाजापर्यँत प्रत्येकच क्षेत्रात स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो... जोपर्यँत हा स्त्री व पुरूषांमधील वैचारीक भेद आणि पुरूषप्रधान संस्कृतीचा अर्थहिन प्रकार संपुष्टात येऊन स्त्रीयांना ख-या अर्थाने पुरूषांसम वागणुक व दर्जा मिळणार नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणे मला तरी जिकिरीचेच वाटते...

सरतेशेवटी इतकीच आशा व्यक्त करुयात कि ब-याच वर्षाँनंतर का होईना आता बलात्कारासारख्या गुन्ह्यांबद्दलचा उद्रेक पेटून तरूणाईच्या मनात उफाळलेला जनक्षोभ व जनतेला आलेली जाग लवकर शमणार नाही व सरकारही असे गुन्हे थांबण्यासाठी कठोर कायदा आणूनच राहील... आणि वर्ष 2012 च्या दु:खद अंतास दिल्ली गैँगरेप (सामुहिक बलात्कार) पीडित निरपराध व निष्पाप तरूणी 'दामिनी/निर्भया'ने दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये याकरिता अपराधी नराधमांना कठोरात कठोर (फाशीची) शिक्षा देऊन आगामी 2013 या नववर्षात अशी दु:खद घटनेस परत एखादी दामिनी बळी पडू नये याकरिता, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार लवकरात लवकर ठोस निर्णय घेत कायद्यात सुधारणा करेल... व हिच नववर्षाच्या स्वागतोक्षणी 'दामिनी/निर्भया'च्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तीला संपूर्ण देशातर्फे वाहिलेली ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल...

-राजेश डी. हजारे (RDH)
(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)

Sunday 30 December 2012

'ते' 13 दिवस- 16 ते 29 डिसेँबर 2012

सन 2012... या वर्षाच्या प्रारंभी अशी एक अफवाच जणू पसरली होती कि... सन 2012 या वर्षाच्या अंतासोबतच; अहो कशाला अंतापूर्वीच 21 डिसेँबर 2012 रोजीच संपूर्ण जगाचा विनाश होईल... जाणीव तर होतीच कि हि निव्वळ अफवा आहे... नंतर जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ञांनीदेखील ही अफवा फेटाळली... आणि झालेही तसेच... (21 डिसेँबर) 2012 या वर्षात युगाचा तर अंत झाला नाही... मात्र या दुर्दैवी व दु:खदायी वर्षात माणुसकीचा अवश्य अंत झाला... आणि आता जाता-जाता हा वर्ष संपुर्ण देशाला शोककळेत डुबवून जातोय... आणि भारतीय जनतेला जागवूनदेखील..!

16 डिसेँबर 2012... दिल्ली या देशाची राजधानी असलेल्या शहरात धावत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर पाशवी रितीने सामुहिक बलात्कार करून 6 नराधमांनी मानवतेला काळीमा फासणारे अमानुष कृत्य केले... आणि ही बातमी वा-यासारखी पसरताच अवघा देश रस्त्यावर आला... तरूण-तरूणी, प्रौढ, वयस्क, स्त्री-पुरूष, सर्व... सर्व... आणि अगदी सर्वच...! संपूर्ण देशात या घटनेविरूद्ध एकच जनक्षोभ उसळला... 'We Want Justice..!' 'Hang The Rapist'... निश्चितच याचे श्रेय मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांना द्यावेच लागेल म्हणा...! अन्यथा कदाचित हे शक्य झाले नसते... पण का? एका बलात्काराच्या घटनेविरूद्ध अवघा देश का म्हणून रस्त्यावर यावा? काय यापुर्वी बलात्काराच्या घटना घडल्या नव्हत्या? काय ती तरूणी त्यांची कुणी नातेवाईक होती? तर नाही... तरी आला... याचे कारण एकच... त्या 6 नराधमांनी केलेला 'तो' अत्याचार हा फक्त त्या एका तरूणीवर झालेला नव्हता... तर संपूर्ण भारताच्या स्त्रीशक्तीवर झालेला तो अमानवी बलात्कार होता...

Saturday 22 December 2012

Achievements & Awards

  • Honoured in Maharashtra's 2nd PARIVARTANSHIL SAHITYA SAMMELAN at GOND-UMRI Ta.Sakoli Dist.Bhandara
    Performed song: प्रेयसीला विनंती
  • 4th Rajyastariya YUVA SAHITYA SAMMELAN

    organised by AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA PARISHAD PUNE's (GONDIA Branch) at 'Swagiya Gajananji Bagde Guruji Sahityanagari', Prasanna Hall, ARJUNI MORGAON on dated 23rd & 24th MARCH 2013.
    Performed 26/11 ची कहाणी in KAVISAMMELAN
    a-kavi.jpg
    a-award.jpg
    Honouring to Ratnadip Dahiwale (Former Z.P.Member,Gondia)
  • bhandara.jpg
    Performed मास्तर जरूर होजो in KAVISAMMELAN organised on the ABHISHTA CHINTAN SOHALA (Birthday) of Film Producer Engineer Mr. MORESHWAR MESHRAM at BHANDARA on 13th January 2013.
  • 'गोँदिया जिल्हाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' या पदावर नियुक्ती झाल्यानिमित्त 19 व्या' अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे 18-20 मे 2012 दरम्यान संमेलनाध्यक्ष श्री लक्ष्मण माने (उपराकार) यांच्या उपस्थितीत सन्मान.
  • झाडीपट्टी समाजमित्र पुरस्कार:24March 2012 (सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते 'इंजिनियर श्री मोरेश्वर मेश्राम' (SHEP Entertainment) यांच्या उपस्थितीत राजेश फुलझेले यांच्या शुभहस्ते 1ल्या झाडीपट्टी परिवर्तनशील मराठी साहित्य संमेलन येरंडी / बाराभाटी येथे वितरित).
    award.jpg
  • Participated in '3rd Stateleval YUVA SAHITYASAMMELAN, Gondia in 2012. Read song: ताईविणा...
  • Participated in '19th ZAADIBOLI MARATHI SAHITYASAMMELAN' Bhajepar (Anjora) on Dec.2011.
  • I had rewarded by SP of Gondia Dist. (Mr. Chhering Doraje in 2005-06, Mr. Pradip Deshpande in 2006-07) for District level Speech competition with 2nd & 3rd Rank by giving 'Award & Certificate'
  • I had rewarded first by Teachers For 1 Act Play in GATSAMMELAN at Z.P.Pri.School Dodadgaon Ta.Ambad Dist. Jalna in 2001-2002
  • I had rewarded by Swadeshi Khelottejak Mandal Gondia for participate in Part with 'Award& certificate' at Z.P.P.M.School Indora khurd in 2000-01
  • I got so many certificates for differentcategories & there are some certificates for won the competition also...

Thursday 20 December 2012

Blog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

[Read Previous page of this article]

3. सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही, अशी अवघड गोची करणा-या अनेक गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात. हे बोचकं तुम्ही कधी उघडून पाहिलं आहे का? त्यात काय-काय असतं?

=> होय! "सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही अशा ब-याच गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात." हे खरंच आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं झाल्यास असल्या प्रकरणांचं बोचकं घरच्यांसमोर उघडण्याचा मी ब-याचदा विचार केला पण कधी हिँमतच झाली नाही... भिती वाटते... काय प्रत्युत्तर येईल? रागावणार तर नाही... कि सगळं चांगलं होऊन आपलं बोलणं समजून घेतील; चुक झाल्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावतील...

मित्रांना सल्ले देताना "घरच्यांना सांगून दे सर्व... काही नाही होणार... सगळं चांगलं होईल..." असं म्हणणं ( दिलासा देणं ) फार सोप्पं असतं! परंतु नाही होत हिँमत सांगण्याची.

अशा ब-याच गोष्टी असू शकतात... शारीरीक वयानुसार होणारे शारीरिक बदल, तारुण्यानुसार बदलत जाणारे भावनिक विचार... अथवा कधी कुणासोबत असलेला प्रेमाचा अफेयर ( मी मात्र अपवाद ) वा एखाद्या वर्गमैत्रिणीशी जोडलेलं 'भाऊ-बहिणी'सारखं पवित्र नातं देखील..! होय हे अगदी खरंय...!

असं एक सर्वश्रूत वाक्य आहे कि, "मनातलं मित्रांशी बोलून वाटल्यानं मन मोकळं होतं." पण खरंच असं होतं का? काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात? कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची! ज्या आपण कुणाला सांगु शकत नसल्याने खुप विश्वासाने त्यांना सांगतो...

पण हो... माझ्याजवळ एक उत्तम 'फंडा / मार्ग' आहे असं मनाचं बोचकं उघडून मन मोकळं करण्यासाठी... दैनंदिनी लिहा... त्यात अशी मनातील प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही कुणाशी 'शेअर' करु शकत नाही... एखादे दिवशी ती तुम्ही स्वत:च वाचा ज्याला ती गोष्ट तुम्ही सांगू ईच्छिता ती व्यक्ती स्वत: असल्याची कल्पना करून... तुमच्या मनाला दिलासा अवश्य मिळेल. मी असंच करतो म्हणून हा माझा विश्वास आहे. अथवा सांगा तुमच्या मनातील भावना तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलेचा वापर करुन अवघ्या जगाला... उदाहरणार्थ चित्राच्या, लेखनीच्या, पुस्तकाच्या वा कवितेच्या माध्यमातून...

-राजेश डी. हजारे-

Blog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

तुमचे मित्रमैत्रिणी, तुम्ही स्वत: आणि आजुबाजूच्या तरूण मुलामुलीँच्या आयुष्यात डोकावून बघता तेव्हा-

1.उमेद वाटावी, आनंद व्हावा असे कोणते बदल, मतं, जाणिवा तुम्हाला दिसतात?

=> प्रत्येकच क्षेत्रात आजचे तरूण-तरूणी व मित्रमैत्रिणी देखील यशस्वी होताहेत. आज प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याची फिकीर असते व त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो व आजची तरुण मंडळी स्वत:च्या पायावर उभी होतेय. प्रत्येकच क्षेत्रात मित्रमैत्रिणीँना वा आजच्या तरुण-तरुणीँना लाभत असलेले यश व त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो; शिवाय आपल्या जीवनात देखील यशस्वितेचा कळस गाठण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते व नवी उमेद जागृत होते. आजच्या तरुणांना 'स्व', कुटूंब व समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव असून त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून आनंद होतो.

•पूर्वीच्या पिढीपेक्षा नव्या पिढीच्या जगण्या-वागण्यातले कोणते बदल दिलासादायक असे तुम्हाला जाणवते?

=> पूर्वीच्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगतीशील (Advance) होत चाललेली आहे. नव्या पिढीतील नागरीकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता झळकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने आज प्रत्येक व्यक्ती आधुनिक सुख-सोयीँचा व साधनांचा वापर करताना दिसतो. पूर्वीच्या पिढीमध्ये जगण्या-वागण्यात व बोलण्यात जी संकूचित वृत्ती जाणवत होती ती नव्या पिढीत नाही. आज प्रत्येक व्यक्ती मनातलं व्यक्त करणे शिकलाय व मनाला पटेल ते मोकळेपणे (बिँधास्त) करू लागलाय. ही बाब मनाला दिलासा देते.

2. काळजी वाटावी अशा कोणत्या अवघड गोष्टी तुम्हाला दिसतात / जाणवतात आणि खुपतात?

=> आजचे तरुण-तरुणी भावना व्यक्त करणं शिकलेत. मी देखील एक तरुण म्हणून समजू शकतो कि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी तरुणावस्थेच्या उंबरठ्यात असलेल्यांना वा तरुणांना 'आपलंही कुणीतरी असावं' ही भावना मनात येणं स्वाभाविकच आहे; किँबहूना या अवस्थेत ती नैसर्गिकच आहे. मग ते 'कुणीतरी' कुणीही असू शकतं! मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी..! पण---

आज जरी खरी मैत्री संपली नसली तरी ती फार कमी आढळते. शिवाय जसं मी मागील प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं त्याप्रमाणे आजची पिढी विचारी होत असली तरी त्यात अविचारच अधिक झळकतो.

आजच्या तरुण पिढीला परलिँगी म्हटलं तर मित्र-मैत्रिण तर नकोच... प्रत्येकाला फक्त प्रियकर वा प्रेयसीच हव्या आहेत व त्यांचीही संख्या अमर्याद आहे...

माझ्या लिहिण्याचा उद्देश "प्रेम करणं चुकीचं / वाईट / अपराध आहे" असं सांगण्याचा मुळातच नाही. कारण पवित्र प्रेम करणारे प्रेमवीर देखील आहेत; पण किती..?

मला तर प्रेमाच्या नावाखाली निव्वळ प्रियकर व प्रेयसीच्या भावना व शरीराशी खेळणारे व निव्वळ वासनेच्या आहारी जाऊन फक्त शरीरसुखासाठी 'प्रेम' या पवित्र अडीच अक्षरांची विटंबना करणारेच अधिक दिसतात.

तरुणावस्थेच्या कोमल वयात जाणते-अजाणतेपणे अश्लीलतेचे घाणेरडे प्रदर्शन करणा-या महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्याँचे उदाहरण फार जुने नाही.

आजची तरुण पिढी कूणी मौज म्हणून, कुणी मित्रांच्या नादाला लागून तर कुणी आपला मोठेपणा / वर्चस्व गाजवण्यासाठी तंबाखू, खर्रा, सिगारेट, मद्य आणि 'ड्रग्स' सुद्धा सेवन करू लागलीय. हे सर्व तरुणाईला लागलेले व्यसनाचे वेड पाहून काळजात चर्र होतं. शिवाय तरुणांमध्ये वाढता व्याभीचार आहेच.

या आणि अशा असंख्य गोष्टी मनाला खुपतात.

[Read this article Continue on Next page]

Monday 17 December 2012

Contact me

RAJESH D. HAJARE

•ADDRESS•





At. Kamtha Road AMGAON
Tah. AMGAON Dist. GONDIA
( MAHARASHTRA, India)
Pin Code No.-441902



Mobile No.

91 7588887401



• Mail me at: www.rdh@gmail.com

Follow my Weblinks

FOLLOW ( @RDHSir )FMT8.png
LIKE | RDH SirFB7.png
FOLLOW Me on FacebookFB2.png


Button4-7.png

View RDH Sir's profile on LinkedIn
wikipedia-logo.jpg

THANKS..! for visit my Website www.rdhsir.mwb.im





CETFlash

cetflash.jpg
LIKE | CETFlashFB7.png




Visit RDH Sir's WEBLINKS

Wednesday 5 December 2012

RDH यांची संग्रहित लेखमाला (निबंध, लेख व भाषणे)

  • शिक्षणाचे जीवनात महत्त्व
    (निबंध- 2006-07)
  • स्वातंत्र्याचे महत्त्व
    (गोँदिया जिल्हास्तरावर द्वितीय बक्षिस प्रमाणपत्र प्राप्त निबंध- 20/08/2006)
  • एड्सची समस्या आणि युवकांची भुमिका
    (माहिती व जनजागृतीपर निबंध- 01 डिसेंबर 2006)
  • मी घेतलेला आमगावातील पहिला इंजेक्शन
    (आत्मकथनपर निबंध: 30/10/2007)
  • व्यायामाचे जीवनात महत्त्व
    (गोँदिया जिल्हास्तरावर तृतीय बक्षिस व प्रमाणपत्र प्राप्त निबंध-12/09/2007)
  • माझ्या आयुष्यातील पहिली 'सलाईन'
    (आत्मकथनपर निबंध- 01/08/2009)
  • कॉपीला जबाबदार आपण सर्वच!
    (चिँतनपर निबंध-2008-09)
  • प्राणीसंग्रहालयांची आवश्यकता आहे
    (निबंध-2008-09)
  • माझा आवडता खेळाडू - सचिन तेँडूलकर
    (निबंध-2009)
  • महात्मा जोतिबा फुले
    (सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा व जीवनपट- 2009)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    (सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा, विशेष माहिती, महानिर्वाण व जीवनदर्शन-2009)
  • कलाकाराच्या जीवनाची माहिती:विवेक दशरथ हजारे
    (चरित्रपर निबंध-2009-10)
  • शिक्षक दिन
    (भाषण: 05 सप्टेँबर 2010)
  • मनोगत [Download][ऐका]
    (डी.टी.एड प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या भाषणाची ध्वनीफित -01/01/2011)
  • महात्मा गांधी हुतात्मा दिन
    (भाषण-30 जानेवारी 2011)
  • इंटरनेटची आवश्यकता नाही. [Download][ऐका]
    (डी.टी.एड द्वितीय वर्षात 'सागर अध्यापक विद्यालय खुमारी ता. रामटेक जि. नागपूर' येथे 'इंटरनेटची आवश्यकता आहे/नाही.' या विषयावरील वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेत्या वादविवादाची ध्वनीफित-2011)
  • 'भारत बंद' कशासाठी?
    (चिँतनपर लेख-31/05/2012)
  • प्रेमाचा आभास
    (लेख-05/07/2012)
  • परत 'भारत बंद' कशासाठी?
    (चिँतनपर लेख-20/09/2012)
  • (निबंध-2008-09)
  • ईँसानियत - सबसे बड़ा धर्म
    (लेख हिँदी मेँ- 29/10/2012)
  • फरक- भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...!
    (चिँतनपर लेख-08/11/2012)
  • वाचन हे मेँदूचे पोषकतत्त्व आहे
    (वाचक संवाद- रोजगार नोकरी संदर्भ-08-14 डिसेँबर 2012)
    rns-cutting.jpg