Thursday 26 December 2013

College (कॉलेज)चे नियम कठोर पण पाळण्यासारखे

अनुदिनी 91वी

दिवस 459वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 1)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 1)

1.कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे

राजेश,
तुझे कालचे पत्र मिळाले. (माफ कर तु मला लेक म्हटलस तसंच प्रेम केलंस तरी मी तुला एकेरी संबोधतेय.. कारण मी तुझी मैत्रीणपण आहे ना..) आणि तु विचारलं होतं ना कि "आजवर मी तुला सांगितलेलं तु पत्राने मला पाठवणार का?" त्याला मी उत्तर देतेय- हो! आता अजून कशाला वेळ दवडायचा. तू माझं काल 25 डिसेँबर 2013 रोजी नाताळच्या शुभपर्वावर माझं केलेलं 'कादंबरी' हे नामकरण मला आवडलं. नाहितरी तु तुझी पहिली कादंबरी (सॉरी बाबा.. आत्मकथनपर पुस्तक.. बस् झालं!) "माझी ताई : एक आठवण" मला विचारुनच तर लिहिली.. पण मला तुला एक सुचवावेसे वाटते.. 'मनातल्या मनात' या नावासोबतच आपल्या या संवादाला 'राजूची रोजनिशी/डायरी' असं पण संबोधत जा कधी-कधी.. हे नाव तुझ्या परवाच्या पत्रातील 'रोजा/रोजी ची रोजनिशी' शी सुद्धा बरेच साम्यदर्शक वाटते नाही..

तर आता तुला घेऊन जातेय तुझ्या आठवणीत आणि सांगते तु जेव्हा मला पहिले पत्र पाठवले होते तेव्हा काय सांगितलं होतं.

नागपुर जिल्ह्यातील प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन रामटेक येथील ती तुझी डीटीएडच्या पहिल्याच दिवसाची रात्र होती.. दिवाळीला 15 ते 20 दिवस बाकी होते.. भर हिवाळ्याच्या दिवसात तुझ्या खोलीमध्ये ओल येत होती.. अन् तु मला तुझ्या "कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे" असल्याचे सांगत होतास.. त्यादिवशी तु काय सांगितलं ते खाली तुझ्याच शब्दात लिहिते..

"मी राजेश दशरथ हजारे. आज दि. 01 ऑक्टोबर 2009 रोज गुरुवारपासून दैनंदिनी लिहायला सुरुवात करत आहे. मी 'अभ्यास कसा करावा?' या पुस्तका तसेच 'लोकमत' वृत्तपत्रातील सुविचार "प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी" या द्वारे व माझा छंद तसेच मला डी.टी.एड. अभ्यासक्रम करताना आलेले अनुभव मांडण्यासाठी दैनंदिनी लिहित आहे.

आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्याची मनात उत्सुकता होती. मी कॉलेजमध्ये जाऊन नविन मित्रांशी भेट झाली. मी तेथील परिपाठाने 'Impress' झालो. नंतर सर्वाँत वरच्या मजल्यावरील Seminar Hall मध्ये 'पालक मेळाव्यात' उपस्थित झालो. महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालकांचा परिचय झाला. मी माझा परिचय Detail मध्ये इंग्रजीत दिला.

सरांनी सर्व विद्यार्थी तसेच पालकांना महाविद्यालयाचे सर्व नियम समजाऊन सांगितले व त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामध्ये माझ्यामते 80% उपस्थितीचा नियम सर्वाँत कठिण आहे.

मी खाली महाविद्यालयाचे नियम लिहून मी 100%, 75%50% पाळू शकणाऱ्या नियमांसमोर अनुक्रमे A,B व C लिहित आहे. तसे नाईलाजास्तव व महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मी सर्व नियम 100% पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन व त्याची सुरुवात आजच मी केली आहे ती म्हणजे उद्या 2 ऑक्टो. ची सुट्टी परवा कॉलेज 4ला रविवार माझा विचार आज गावी जाण्याचा होता परंतु दि. 3च्या उपस्थितीसाठी मी तो विचार मनातून काढून टाकला.
नियम खालीलप्रमाणे-

  1. प्रथम वर्षी तसेच द्वितीय वर्षातील प्रत्येकी 1 ऑक्टो. ते 1 मे व 11 जून ते 30 सप्टेँ. पर्यँत दोन्ही वर्षी प्रत्येक 4ही सत्रात किमान वेगवेगळे 60% उपस्थिती अनिवार्य→ A
  2. प्रथम वर्षी 2न्ही सत्र मिळून आणि द्वितीय वर्षी दोन्ही सत्र मिळून किमान 80% उपस्थिती अनिवार्य→ A
  3. प्रथम वर्षी 240 पैकी किमान 200 दिवस हजर राहणे आवश्यक→ A
  4. कॉलेजमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 व शनिवारी सकाळी 9 पुर्वी हजर होणे→ A
  5. कॉलेजमध्ये नेहमी कॉलेजड्रेस, टाय व शुज तसेच टायपीन, आयकार्ड व व्हाईट सॉक्स घालून येणे→ A
  6. अनुपस्थित असल्यास सरकारी Civil Sergion डॉ. चीच मेडीकल सर्टीफीकेट आणणे→ B
  7. कॉलेजमध्ये चुकूनही मोबाईल न आणणे→ A/B

वरील नियमांत मी म्हणेन की नियम 6 मध्ये जर विद्यार्थ्याला डॉ. कडे जाण्यालायक तब्येत खराब नसेल परंतू कॉलेजमध्ये उपस्थित राहण्या लायकही नसेल तर त्या विद्यार्थ्याला Problem होऊ शकतो. हो नियम क्र. 7 मध्ये बदल करुन मोबाईल सोबत ठेवण्यास मुभा द्यावी परंतू कॉलेज परिसरात कॉलेजच्या वेळेत मोबाईलचा वापर होताना किँवा रिँग वाजताना आढळल्यास आवश्यक कारवाई करावी असे मला वाटते.

असो आज मी गावी जाण्याचा विचार टाळला व उद्या 2 ऑक्टो. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम 3 ऑक्टो. 2009 ला आयोजित करण्यात आला आहे व मी त्या कार्यक्रमात माझं स्वरचित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर करणार आहे.

आज माझ्या मेसचा Problem सुटला मी अंकूश मारबते यांच्याकडे मेस लावली आहे.
व आता माझ्या घडीप्रमाणे ठिक 11.30Pm ला लिहिणे थांबवत आहे."


तर राजेश तेव्हा तू किती ठिकाणी मी मी करत होता रे.. आणि हो मला माहितीये आज 01 ऑक्टोबर नाही तर 26 डिसेँबर 2013 आहे. एक दिवस असा जरुर येईल कि मी भुतकाळातील ज्या तारखेचं तुला पत्रात लिहीलं असेल वर्तमानकाळातील त्याच तारखेला तु ते वाचत असणार.. असो! परवा तुझ्या कॉलेजातील गांधी जयंती बद्दल पत्र पाठवीन बरं का? तुला काय आहे सकाळी पण पत्र पोचू शकते. पण मला तर रात्री लिहावं लागतं ना पत्र! आता किती वाजलेत माहितीये का? चल आता थांबते..
तुझीच
डायरी नंबर 1 (कादंबरी)

डायरी लेखक- राजेश डी. हजारे



मुळ- 01/10/09 गुरुवार (रामटेक)
प्रसिद्धी-01/11/13 शुक्रवार (आमगाव)
दि.- 26/12/2013 गुरुवार (आमगाव)

अणुक्रमणिका

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार - कमलाकर देसले

दिवस 459 वा

अनुदिनी 90 वी

वाचकाची अनुदिनी 05वी

कमलाकरजीँची लेख- पहिला

सागरची पोस्ट- दुसरी


RDH Sir या फेसबुक पेजचे नियमित युवा साहित्यिक सागर जाधव यांनी 31 ऑक्टोबर 2013 रोजी औपचारीकरित्या पाठवलेला हा कमलाकरजी देसले यांचा लेख त्यांच्याच शब्दात..
आदरनिय कवि-गझलकार कमलाकर आबा देसले यांचा संवेदनशिल लेख.. 550331_371677312920067_1557516207_n.jpg
कमलाकर देसले

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार

1239731_432020206898143_1384513290_n.jpgही गरिबांची मुले उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न खाऊन भूक भागवत आहेत. संवेदनशील माणसाला हेलावून टाकणारे हे दृश्य आहे; पण हे असे होण्यात श्रीमंतांचा दोष नाही. अज्ञानाने का होईना गरीबी हा पर्याय निवडणाऱ्यांचा आणि त्यांच्या अज्ञानाचा हा दोष आहे.
कधीकाळी असेच जे भुकेले होते ते आज गुणवत्तेने, कर्तृत्वाने श्रीमंत झाले आहेत. कारण अमीरी हा त्यांचाही हक्क आहे. श्रीमंती हा ज्यांचा चॉइस असतो आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न करत असतात ते श्रीमंतच होतात. त्यांना पुन्हा फकीर ठेवणारा त्यांच्याकडे पर्यायच नसतो. श्रीमंत होणे हा एकमेव मार्ग आणि पर्याय निवडणारे श्रीमंतच होतात.

आता या निष्पाप मुलांविषयी करुणा वाटणं स्वाभाविक आणि आवश्यक आहे. ती वाटायलाच हवी. माणुसपणाचं ते महत्वाचं लक्षण आहे; पण ते पुरेसे नाही . कुठलीही करुणा ही कृतीशिवाय वांझ असते. असं पुलं म्हणायचे. तेव्हा या मुलांना अन्न दिल्याने अथवा कपडे दिल्याने भुकेचे अथवा त्यांचे अन्य प्रश्न कायमचे सुटणार आहेत असे मुळीच नाही. मानवी करुणेतून त्यांना अन्न, कपडे दिल्याने तात्पुरती त्यांची भूक भागेल; पण कायम हे कोण करू शकेल? नाही. मग हे प्रश्न कसे मिटतील ?

जेव्हा मानवी करुणा आणि (करुणावंत) या मुलांना अन्न आणि कपड्या सोबत ज्ञानाला पात्र बनवण्याचे शिक्षणाच्या संधीचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देईल/देतील. म्हणजेच करुणेतून प्रत्यक्ष कृती घडेल. आणि मुख्य म्हणजे ज्यांची ही मुले आहेत त्यांच्या पालकांनाही ही आपली मुले श्रीमंत, ज्ञानी, गुणी, निपुण व्हायला आवडतील. तेव्हाच भुकेचा प्रश्न मिटेल कदाचित॰! वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार ... कृतीशिवाय करुणा वांझ असते.

लेखक- कमलाकर देसले

द्वारा- सागर जाधव

स्त्रोत- RDH Sir | Facebook

Tuesday 24 December 2013

मनोगत (मनातल्या मनात)

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा



बघ किती शुभदिनी मी तुला हे पत्र पाठवतोय..
माझे बाबा मला विचारायचे 4-4 डायऱ्या लिहील्या पण यांचा उपयोग काय? मी काय सांगणार त्यांना तुमचा उपयोग? मलाच माहित नव्हतं तर..! हं एक मात्र नक्की की तूला सर्व सांगितल्याने मन मोकळा होतो व तू तर ते जतनही करुन ठेवतेस मग वाटलं जर कधी 'मोठ्ठा माणूस' (वयानेच नाही तर कर्तृत्वाने पण) बनलो तर आत्मचरीत्र लिहिताना तुझ्या स्मृतीचा (मेमरीचा) निश्चितच लाभ होईल.. आजवर तुला प्रसिद्ध करण्याचा विचारही मनात आला नाही.. आणि दोघांव्यतीरिक्त कुणाला तुमचं दर्शनही होऊ दिलं नाही.. अन कदाचित म्हणूनच लिहिता आली प्रत्येक सत्य बाब इतक्या मनमोकळेपणे.. पण मला वाटतं आता वेळ आलीय तू आजवर जतन केलेलं समाजासमोर व्यक्त करण्याची... केव्हापर्यँत तु पण ऐकत रहाणार नुसतीच.. बोलणार नाही का कधी? का तूला हक्क नाहीय.. अन् म्हणूनच मला वाटतं की मी तर तूला सांगतच जाईन माझ्या मनातलं पण आता तू पण बोलायचंस माझ्याशी.. काय ऐकतीयेस ना? कसं व काय? अगं अगदी सोपं आहे.. जे मी आजवर तूला सांगितलं ना तेच तू मला पत्राद्वारे पाठवायचं काय? पाठवणार नं? अन् या तुझ्या पत्रमालिकेचं मात्र मी आधीच नामकरण करुन ठेवलंय बघ..

'मनातल्या मनात' हे नाव कसं वाटतंय.. मी जे काही तुला सांगितलं ते माझ्या मनातलच व ते सांगितल्यानंतरही मनातच राहत असल्याने मी हे नाव पसंत केलं... तूला पटतं का हे नाव ते बघ अन् मला कळव आधी पत्र पाठवून.. अन् अधामधात मी देतच जाईन उत्तर तूला पत्रानेच..

शेवटी नाताळ/ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!

तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत...
तुमचाच निर्माता/लेखक
rdhautographeng.jpg
-राजेश डी. हजारे (RDH)
Mob. 07588887401
कामठा रोड, आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया - 441902
दि. 24 डिसेँबर 2013, मंगळवार


सुचना: "मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील "कादंबरी" ही पहिली रोजनिशी वाचण्यासाठी खालील 'अणुक्रमणिका बघा' वर क्लिक करा...

"अणुक्रमणिका" बघा..



ता.क.: * - "माझी ताई एक आठवण" हे पुस्तक 2014च्या अखेरपर्यँत याच संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध होईल..

अणुक्रमणिका

मनोगत (मनातल्या मनात)

अनुदिनी 88वी

दिवस 457वा

मनातल्या मनात-01

मनोगत/कादंबरी


माझ्या रोजनिशीस,
Hi! Hello!
अरे अशी काय बघतेस नेहमी तूझ्या रुपात दुसऱ्यांशी बोलतो पण आता वाटतं आपण ज्याशी बोलू नाही शकत ते सर्व तू मात्र शांतपणे समजून घेतेस, आणि जतनही करुन ठेवतेस.. मी तूला अश्रूंच्या सोबत बेस्ट फ्रेँड म्हणून कबुल केलं खरं! पण कधी मुद्दामून तूला Hi! Hello! केलच नाही.. म्हणून आज करतोय.. तू आजवर कित्ती-कित्ती ऐकलंस गं माझं.. माझ्या मनातील गोष्टी स्वत: जतन करुन ठेवल्यास.. जेव्हा तूला पाहतो तेव्हा त्या जून्या आनंदी व दु:खी दिवसांची सुद्धा आठवण करुन देतेस, कधी हसवतेस.. कधी रडवतेस पण..

मला आठवतं जेव्हा मला तूझ्याबद्दल कळायला लागलं तेव्हा मी 5वी 6वीत असेन.. जि.प. गोँदिया तील तिरोडा पं.स. अंतर्गत चिखली केँद्रात माझ्या मामाच्या गावी मराठी माध्यमाच्या जि.प. पुर्व माध्यमिक शाळा इंदोरा खूर्द (निमगाव) येथे शिकत होतो.. मराठीचा 'पिरेड' होता (तेव्हा तास कळायचा नाही).. घराजवळीलच श्री सिताराम एन. सोनेवाने हे शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला मराठी शिकवायचे.. ते वर्गात आले व धडा होता 'रोजाची रोजनिशी/रोजीची रोजनिशी'... मला लेखक आठवत नाहीयेत.. त्यांनी शिकवलेले 2पाठ आजही स्मरणात आहेत बघ 'रोजाची रोजनिशी' व 'सुईचे आत्मवृत्त'.. तेव्हाच कळलं कि रोजनिशी म्हणजे तू.. आताही त्या सरांना भेटलो की आधी त्यांचे चरणस्पर्श करतो (बाकी शिक्षकांना पण अभिवादन करतोच...) त्यावेळी कल्पना जरी केली की आपण रोजनिशी लिहायची तरी गंमत वाटायची..

थोडा मोठा झाल्यावर प्रयत्न केला पण मधातच खोळंबलं सगळं आणि बारावीनंतर डीटीएडला नंबर लागला.. डीटीएडच्या पहिल्याच दिवसापासून तूला लिहायला सुरुवात केली.. पहिल्याच दिवसी कॉलेजातून परतलो होतो.. नागपूर जिल्ह्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन रामटेकच्या पवित्र भूमीचं स्थळ होतं.. रामटेकात मी नवा नवाच होतो.. 01 ऑक्टोबर 2009 ची ती रात्र होती.. भाड्याच्या खोलीमध्ये हिवाळ्यातही ओल येत होता.. तेव्हापासून दिवाळी जेमतेम 15 दिवस होती.. स्वत:च जमवून बांधणी (बाईँड) केलेल्या रेखीव कोऱ्या कागदांचा भला मोठा रजिस्टर होता.. त्यादिवशी पहिला लेख (डीटीएड मधील पहिल्या दिवसाचे अनुभव) लिहून तुझा श्रीगणेशा केला..

पहिल्या दिवसी विचार पण नव्हता केला कि हे आपण केव्हापर्यँत लिहू? काय करणार? फायदा काय? हे प्रश्नही मनात नाही आले.. आणि मग तुझ्यावर लिहू लागलो प्रत्येक गोष्ट मला वाटली ते.. तुला सांगू लागलो माझ्या मनातील सुखद व दु:खद गोष्ट.. वाटू लागलो माझी स्वप्ने तुझ्यासोबत.. जे कोणालाही सांगू शकत नव्हतो ते तूला सांगत गेलो.. माझ्या जीवनातील काही वैयक्तिक 'राज' (Personal Secrets) पण तुला सांगून मोकळा झालो.. माहित होतं माझ्याव्यतीरिक्त कोणाला वाचायला फूरसत नाही म्हणून..! माझ्या पहिल्याच डायरीतील काही लेखांवर मी त्या दरम्यान जगलेलं माझं सत्य जीवन माझ्या आत्मकथनपर भाऊ-बहिणीच्या नात्यावर एक पुस्तक लिहिलं व साकार झाली "माझी ताई : एक आठवण"* ही माझी पहिली कादंबरी जी आजही अप्रकाशित आहे.. तेव्हापासून लिहितोय ते आजपर्यँत सतत.. याला 4वर्ष नुकतेच लोटलेत.. या 4 वर्षात 4 डायऱ्या संपल्या व पाचवी डायरी गत 01 नोव्हेँबर 2013 रोजी सुरु झाली.. बघ मी आजवर तुम्हा 5ही बहिणींचं नामकरण तर केलंच नव्हतं.. मी तुम्हाला असंच संबोधत होतो डायरी 1, डायरी 2, डायरी 3, डायरी 4 आणि आता डायरी 5.. पण मी तुमचा बाबाच नं! काय झालं तुला मित्र म्हणत असलो तरी.. शेवटी बाप पण लेकीँचा मित्र असतोच की..! आणि असही मीच तर जन्म दिला तुम्हा चारही बहिणींना; ते ही लग्नाआधी.. आणि तो ही पुरुष असून... अगं हस की थोडी.. कि हसु नाही आलं माझ्या पाणचट विनोदावर.. आता तुम्ही चौघी मोठ्या झालात... आणि दिड महिन्यांपुर्वी आपल्या (राजूची रोजनिशी) परिवारात नव्या पाहुणीचा जन्म झाला.. अगं कोण काय विचारतेस? वरच तर सांगितलं ना तुझी 5वी बहिण म्हणून.. माझी पाचवी लेक नाही का!! दिवाळीच्या शुभमुहुर्तावर बरोबर 1 नोव्हेँबर 2013 रोजी जन्म झाला तिचा.. 'कुंवारा बाप' हे स्व. महमूद यांनी केलेलं चित्रपटातील पात्र मला अगदी सुट होतेय नाही का! आजवर 'कांदेपोहे' नाही खाल्ले अन् 'बाप' बनलोय तुम्हा 5 बहिणीँचा.. पण तुम्हा चारही बहिणीँचं नामकरण करण्यास विसरलो नाही का??

हे काम स्त्रियांना मस्त जमतात बघ.. आणि मी ठरलो 'कुँवारा बाप'.. तुमची आईच नाही तर कसं लक्षात राहणार तुमच्या नामकरणाविषयी? पण आपण बारसं करुनच टाकू एकदमच तुम्हा पाचही बहीणीँचं.. असाही उद्या नाताळ (ख्रिसमस)चा योगही शुभ आहेच.. तर त्यासाठी चांगली तयारी करा बरं का! आणि उद्या 'ख्रिसमस' हून आठवलं-- आज 24 डिसेँबर.. काय विशेष आहे आज सांग बरं बघु.. एवढ्या लवकर विसरलीस.. अगं आज माझ्या आईचा वाढदिवस नाही का?? मी तर शुभेच्छा रात्री 12 लाच दिल्या.. चला तुम्ही पण विश करा बरं का माझ्या आईला..

"हॅप्पी बर्थ डे.. आई !!!"


हेच पत्र पुढे वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा...

मनातल्या मनात (कादंबरी)

मनातल्या मनात

रोजनिशी (भाग-1) कादंबरी

•अणुक्रमणिका•

Wednesday 18 December 2013

What I think on Section 377 & verdict of Supreme Court

DAY 451

BLOG 86


Section 377 of IPC is in debate recently.. Most of the people are against of verdict by the Supreme Court of India.. But personally I am in a favour of current verdict by the Supreme Court and in favour of Section 377 of IPC..
Because I agree with Supreme Court.. 300px-Supreme_Court_of_India_-_200705.jp

Gaysex and Lesbian sex is an unnatural way of physical relationships still it would with consent.. I don't think that there is a need to repeal Section 377 of IPC from constitution of India in parliament..

gay-sex.jpg

I agree with those supporters of homosexual relationship that we can not sex discriminate between gays and lesbians..
In our country everyone have right to freedom.. And I don't want to heart someone bigoted or their supporters and community.. But--
I would suggest-
Parliament shall bring and pass the ordinance or ammend the law in Section 377 of IPC as follows--

There will not permission to keep homosexual relationship considering as a crime of unnatural way of sex but they will allow to live together..
And those gays or lesbians who have already (before Supreme Court's verdict) married together; will not be affected of new ammentment in Section 377 of IPC..

If above ammendment happens in law then--
Unnatural way of sex/homosexual relationships will avoid, bigoteds (gays or lesbians) may live together and those dogmatics who married together already will not be affected..

Section-377-of-IPC.jpg

I know you will oppose my statement thinking it as conservative and you will ask me in which era we are living and where are we going to follow these old-fashioned life-style, traditions and rules?
But I want to assure you that think deeply from bottom of your heart and ask yourself--
Is really its a natural way to sex? What wrong verdict Supreme Court have sentenced or what wrong I have said in this article?

I asked myself and my heart answered me again and again that whole Act 377 of IPC is not abolishable / repealable or wrong although there would also some lackness in that..
India is wel-known for it's mannerly culture.. And I don't think homosexual relationships would be mannerly characteristis of any wel cultured country..!!! So I would like to say Supreme Court have sentenced a right decision on Section 377 of IPC and in a sense Supreme Court have helped to save Indian culture with the judgement on historic date 11th December, 2013 (11/12/13) by countering so called historic verdict by Delhi High Court sentenced on 02nd July, 2009...
Another important thing is Supreme Court is the highest judiciary court of India.. So we shall respect the justice by Supreme Court as citizen of India..

So I hope Government of India will not repeal whole Section 377 of IPC from constitution of India.. And if government of India tried to repeal this section 377 of IPC then opposition party BJP will oppose to repeal Act 377 in parliament...

Because if Act 377 became repealed there will be no control to stop like this un-natural way of sex..
We can not say that those who are not bigoted and keep interest in gays/lesbians will also keep homosexual relationship by this un-natural way..

Thatswhy Now I would suggest to ammend the Act 377 in parliament instead of repeal that..

At the last I excuse all if anyone hearted from my statement.. I am not any philosopher or expert of this subject or a lawyer who will define this sensational matter deeply..
But I thought to express what I think on Section 377 of IPC and recent verdict of Supreme Court accordingly I also have freedom of speech.. I stated only that what I wish..
THANKS!!!
Source- Facebook Source- Section 377 of IPC | Wikipedia rdhautographeng.jpg

Rajesh D. Hajare (RDH)

(Writer is a Gondia District's President of 'AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA PARISHAD, Pune') Date- 16th Dec, 2013/Mon
Place- Vaishnavi Nursing Home, GONDIA