Showing posts with label Interviews. Show all posts
Showing posts with label Interviews. Show all posts

Friday, 16 December 2016

"My image was ruined by social media"- Sonam Gupta says in the interview

  • 158th --> Blog Post:
  • 1544th --> Day

Dear  friends! We all are familiar with Sonam Gupta, who is trending on social media these days. Though, Sonam’s life resembles a two-sided coin. We all are aware of the views of social sites about her. But this interview reveals the other side. Sonam talks to us about her personal life in this interview.
  • Que: Hello Sonam, most of the people already know you through the memes created on your name. But I would like you to introduce yourself first.
  • Sonam Gupta: I am a small town girl from a middle-class family with little desires and dreams to win the world. I have a small family with parents and a younger sister. I do teach children to make a living. I’m a person of principles, emotions, and morality.

Friday, 17 January 2014

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी CLICK करा
  • प्र.: आजपर्यँतच्या शिक्षणात कित्येक पैसा खर्च झाला परंतू कधीही पश्चात्ताप नाही केला की याचा योग्य फायदा झाला नाही वा जर वाचवला असता तर किती रुपये जमा असते?
  • उ.: शिक्षणात पैसा खर्च होणारच व मी चूक केली आहे हे खरे आहे पण पश्चात्ताप करुन काय फायदा?
  • प्र.: आजच्या Competition च्या जमान्यात D.Ed. करुन शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुण घेऊन पात्र होण्याची ताकद आहे काय?
  • उ.: मी प्रयत्न करतोय व 10वी 12वीतील चुक सुधरवून खरंच मन लावून नि:स्वार्थी पणे 90% अभ्यास करुन कमीतकमी 80% घेण्याचा निर्धार केला आहे व "रेतीचे कण रगळीता तेल ही गळे" तर नशिबाद असली व देव तसेच मोठ्यांचा आशिर्वाद असला तर निश्चित एक दिवस पात्र होऊन शिक्षक होऊन दाखविन ही शाश्वती देतो कारण Competitionच्या जमान्यात पात्र होण्याची ताकद पूर्वीही होती व आताही आहे परंतु तीचा तेव्हा लाभ घेतला नाही मात्र आता जरुर घेईन.
  • प्र.: 12वीत ही 70% घेईन म्हणत होता परंतु 55.50%च मिळाले.
  • उ.: 12वीत मी अभ्यासच न करुन चूक केली होती व मनसमजवनी करत होतो. व खरे तर मला 60च्या वर अपेक्षा नव्हती. तिचा पश्चात्ताप झाल्याने मी नव्या जोमाने D.Ed. ला सुरुवात केली असून अभ्यास करुन 80% घेण्याचे बोलत आहे.
  • प्र.: तू सध्या Top 10 मध्ये हवा होता पण Bottom Ten मध्येही नाही.
  • उ.: मी D.Ed. मध्ये 100 पैकी Top 15 मध्ये आहे. व याचा Result Result नंतरच कळेल.
  • प्र.: रात्री उशीरापर्यँत जागून झोप पूर्ण होऊ न देता आरोग्यावर विपरित परिणाम होईल असा अभ्यास करुन काय फायदा?
  • उ.: अभ्यास कसा व किती तसेच केव्हा करायचा हा माझा Matter झाला परंतु आरोग्याची काळजी मात्र मी घेईनच.

वरील प्रकारे फत्त प्रश्न माझ्या बाबुजीँनी घरच्यांसमोर उच्चारले व त्यांच्या प्रश्नांना कंटाळून मी उपाशीच झोपून गेलो नंतर थोडासा जेवण (2 कोचईच्या वळ्या) घेऊन लिहित आहे.

असो! माझ्या वडिलांचेही बरोबरच आहे. त्यांच्या बोलण्याचा मला राग कधीच येत नाही परंतू खंत वाटते की ते आपल्या मनातील प्रश्न व शंका-कुशंका प्रेमाने माझ्याशी बोलून त्यांचे निराकरण करत नाही वा मला प्रेमाने समजावत नाही आणि माझ्यात तर त्यांच्यासमोर अशा मुद्द्यांबद्दल काही बोलण्याची हिँमतच होत नाही. परंतू मी त्यांचे बोलणे ऐकूण घेतो व पटलेली गोष्ट फायद्याची असतेच ती करण्याचा प्रयत्न करतो. असो!

किती वेळचा लिहित आहे. लिहीता-लिहिता हात दुखून गेले. तुमचा तोँड नाही दुखला का इतके वाचताना? चला झोपा! किती रात्र झाली. सगळे झोपले. रात्रीचे 11.15PM वाजले."
Good Night

वाचक मित्रांनो माझ्या सदर पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी मी काही स्पष्ट करु ईच्छितो...

वरील नोंद माझ्या दैनंदिनीत / डायरीत अर्थात 'राजूच्या रोजनिशीत' 26/10/2009 रोजी.. परत वर्ष नीट वाचा.. 2009.. मध्ये लिहिलेला असल्याने हि परिस्थिती 'तेव्हाची' होती.. आता काळासोबतच परिस्थितीही बदलली.. आणि या प्रश्नोत्तरामुळे कदाचित आपला गैरसमज होऊ शकतो कि माझे बाबुजी तेव्हा वरील प्रश्नांबाबत (माझ्याबाबत काळजीग्रस्त) असले तरी खर्च वगैरेबाबत खुप चिँताग्रस्त होते वगैरे..! हे सत्य नसून त्या 'क्रॉस कनेक्शन' फोन कॉलमुळे माझ्यावर आलेला संताप बाहेर काढण्याकरिता त्यांना वरील प्रश्न उच्चारावे लागले होते आणि तसे करणे रास्तही होते.. त्या प्रश्नांचे मी समक्ष त्याच वेळी उत्तरे देऊ शकलो नसलो (जाणून दिले नसले) तरी त्याच वेळी माझ्या मनात जी उत्तरे होती ती वर नोँदलेली आहेत.. त्यादिवसानंतर बाबूजीँच्या तोँडून त्यांनी माझ्या शिक्षणावर केलेल्या खर्चासंबंधी 'ब्र' ही विचारल्याचे माझ्या लक्षात नाही.. कारण मुळातच तो त्यांचा स्वभाव नाही.. आता 'त्या' गोष्टीला 4 वर्षाहून अधिक दिवस झालेत.. माझं डीटीएड 2011 मध्येच पुर्ण झालं.. माझा निकाल आपणास माहितच असेल.. आणि नसेल तर मी या पत्रमालिकेच्या शिर्षकाप्रमाणे 'मनातल्या मनात' दिलेल्या उत्तराचे परिहार्याने वचनाचेच काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आपणास लागलेली असेल; पण ते थोडं गुलदस्त्यात सिक्रेट ठेवुयात.. वाचत राहा ही पत्रमालिका म्हणजे कळेलच आपणास माझा निकाल आणि डीटीएड काळातील माझं जीवनसुद्धा... आणि हो मी वरील प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे देऊ शकलो नाही याचा अर्थ काही भलताच लावू नका बरं का! आणि आपला अजून एखादा गैरसमज होऊ नये म्हणून सांगूनच टाकतो.. आमचं एकमेकांवर तेव्हाही प्रेम होतं आणि आताही भरपूर प्रेम आहे कारण "माझे बाबूजी जगातील 'बेस्ट' बाबा आहेत..."

तुमचाच
राजेश

ता.क.- पत्रातील नोँद मुळ 2009 मध्ये लिहिले असल्याने प्रसिद्ध करताना जाणीवपुर्वक व्याकरणीय चुका दुरुस्त केलेल्या नाहीत.

मुळ लेख- 26 ऑक्टो. 2009 (आमगाव)
प्रसिद्धी- 17 जाने. 2014 (आमगाव)

अणुक्रमणिका (कादंबरी/मनातल्या मनात)

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

दिवस- 481 वा

अनुदिनी- 95 वी

मनातल्या मनात - पत्र 3

राजूची रोजनिशी 1 (कादंबरी-3)


"मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील पुढील पत्रात माझ्या बाबुजीँच्या प्रश्नांची उत्तरेच मी 'मनातल्या मनात' दिलेली असल्याने सदर पत्र माझ्या बाबुजी लाच पाठवतोय..
तिर्थरुप बाबुजीस,

कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण 26 ऑक्टोबर 2009 रोजी तुम्ही रागाच्या भरात मला काही प्रश्न विचारले होते... त्या प्रश्नांची उत्तरे मी तेव्हा तुम्हाला देवू शकलो नव्हतो परंतु त्याच दिवशी मी ते सर्व प्रश्न माझ्या डायरीत नोँदून त्यावेळचे माझ्या मनातील उत्तरे तिथे लिहिले होती ती अशी-

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

"आज दि. 26 ऑक्टोबर 2009. आज मी दैनंदिनी लिहिणार नव्हतो परंतु लिहित आहे व लिहिण्यामागे कारण एकच ते खालीलप्रमाणे-
मी खाली आज माझ्या घरी केलेल्या चुकांमुळे किती ऐकलो व काय चुकले तसेच घरी आता का गप्प राहतो व खरंच माझ्या मनात काय आहे ते खाली स्पष्ट करत आहे-
आज नेहमीसारखाच योग्य व सहज दिवस जाईल असे वाटत होते, परंतु बाबुजी '[वसन] स्टेशनरीत' बाकी असलेले पैसे देण्यास गेले व मला फोन केला. मी फोन उचलला बाबुजींचा पण Line वर होते [मुकेश निवारे] व बाबुजीँनी मला फोन करुनही Line वर बोलले कुणीतरी अजय ज्याला [मुकेश] शी बोलायचे होते. माझ्या मते बरोबर नंबरवर फोन लावून चुकीच्या जागी फोन लागल्यास दिमाग खराब होईलच. मी बाबूजीला त्याच नं. वर फोन केला तर कळले की बाबूजीचा फोन चुकीच्या जागी बरोबर नं. असूनही लागला होता.

असो त्यांनी दुकानदाराकडे 80/- बाकी असल्याचे माझ्याकडून पुष्टि करुन घेतले व घरी आल्यावर माझ्या शिक्षणावर त्यांनी केलेल्या खर्चावर तसेच मी दिलेल्या गुणांच्या मोबदल्याबद्दल संताप व्यक्त करीत होते.

मी तेव्हा त्यांच्या एकाही प्रश्नावर बोलू शकलो नाही. परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर जे त्यांचा समाधान करु शकतील; असे प्रश्न व उत्तर खाली लिहित आहे -↓

  • प्र.: राजेशने दहावीत जी चूक केली तीच चुक बारावीत केली तर याची शाश्वती काय की तो D.Ed. मध्ये ती चूक करणार नाही?<
  • उ.: मी दहावीत चुक केली ती माझी नादाणी होती परंतु मी 12वीत चुक केली हे जाणतो व त्याचे फळ मी भोगलेले आहेत ते कसे बघा- मला 12वीत PCM ग्रुप मध्ये 7 गुण कमी पडले व D.Ed. मध्ये रामटेक येथे D.Ed. करावे लागत आहे. व राहीली गोष्ट शाश्वतीची तर मी जेव्हा 10वी व 12वीत होतो तेव्हा आमगावच्या घरीच तेव्हा घरात मनोरंजनाचे साधन वगैरे होती त्यामुळे तितका वेळ जात होता तसेच इतके वाजतापर्यँत अभ्यास कर ताण घेऊ नको हे बोलणे त्यामुळे लवकर झोपण्याचा धाक जो तेथे Single व Separate खोलीत राहणार नाही व तेथे मनोरंजनाचे साधन नसल्याने मी अभ्यास करीनच. शिवाय माझ्या मते "जर विद्यार्थी पालकांना सोडून बाहेरगावी जात असेल तर तो तेथे अभ्यास करतोच कारण त्याला माहीती असते की माझ्या पालकांना माझ्याकडून किती अपेक्षा आहेत, व ते किती खर्च करत आहेत; आणि तो जिद्दीने अभ्यास करतो."
  • प्र.: राजेशने 10वी 50.46% 12वीत 55.50% घेतले तर घेऊन-घेऊन D.Ed. मध्ये किती घेऊन घेईल?
  • उ.: मी 10वीत 15% अभ्यास करुन तसेच 12वीत 35% अभ्यास करुन तितके गुण प्राप्त केलेत व D.Ed. मध्ये मी 100% नाही म्हणणार पण 95% प्रयत्न करुन 90% तर निश्चितच अभ्यास करेन. तसेच D.Ed. मध्ये 50% Passing असल्याने 10वी 12वीतील 35% ची व 12वीत मिळणाऱ्या Practicals मुळे Theory ची काळजी नव्हती परंतू D.Ed.मध्ये दोघांमध्ये वेगवेगळे 50% घ्यावे लागत असल्याने अधिक अभ्यास करीनच व त्याचा फळ मला मिळणार नाही का? मी D.Ed. मध्ये 90% घेण्याचा निश्चय केले आहे व 80% तर घेईनच. याची शाश्वती देतो.
  • प्र.: P.E.T.चे ते 3 शिक्षक आले व त्यांच्या बोलण्याने करायचे नसूनही P.E.T. जॉईन केली.
  • उ.: ती माझी सर्वात मोठी चुक होती. व तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात नव्हती.
  • प्र.: P.E.T. 200पैकी फक्त 74 गुण आले.
  • उ.: P.E.T.ही Competition Exam आहे. त्यामुळे कितीही अभ्यास करणारा विद्यार्थी कमी वा बुद्धू विद्यार्थी 100 च्या वर गुण घेऊ शकतो व मी खरं सांगु तर तेथे 75% अभ्यास केला होता व मला कमीतकमी 90 गुण अपेक्षित होते.
  • प्र.: P.E.T. मध्ये डूबलेल्या 20,000/- रुपयांविषयी राजेशला एकदाही पश्चात्ताप वाटला नाही की जर तो 1.5 (दीड) महिना हवा नसलेला Course केला नसता तर 20,000 रु /- घरी असून एखादी कोणतीही वस्तू झाली असती असा त्याने कधी घरी विषयही काढला नाही.
  • उ.: मला पश्चात्ताप झाला पण पश्चात्ताप करुन किँवा ती गोष्ट घरी काढून त्या गोष्टीची पून्हा आठवण केल्याने काय उपयोग म्हणून मी ती विसरण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तशी चुक पुन्हा माझ्याशी कधी होणार नाही याची काळजी घेत आहे परंतू कितीही प्रयत्न केल्याने मी ते विसरु शकत नाही व कधी कधी डोळ्यातून टपटप अश्रू सुद्धा पडतात पण कोणाला सांगणार शेवटी चुक माझीच होती.

[ ]- नावे बदललेली आहेत.
याच पत्राचा पुढील पान वाचण्यासाठी CLICK करा

Thursday, 20 December 2012

Blog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

[Read Previous page of this article]

3. सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही, अशी अवघड गोची करणा-या अनेक गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात. हे बोचकं तुम्ही कधी उघडून पाहिलं आहे का? त्यात काय-काय असतं?

=> होय! "सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही अशा ब-याच गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात." हे खरंच आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं झाल्यास असल्या प्रकरणांचं बोचकं घरच्यांसमोर उघडण्याचा मी ब-याचदा विचार केला पण कधी हिँमतच झाली नाही... भिती वाटते... काय प्रत्युत्तर येईल? रागावणार तर नाही... कि सगळं चांगलं होऊन आपलं बोलणं समजून घेतील; चुक झाल्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावतील...

मित्रांना सल्ले देताना "घरच्यांना सांगून दे सर्व... काही नाही होणार... सगळं चांगलं होईल..." असं म्हणणं ( दिलासा देणं ) फार सोप्पं असतं! परंतु नाही होत हिँमत सांगण्याची.

अशा ब-याच गोष्टी असू शकतात... शारीरीक वयानुसार होणारे शारीरिक बदल, तारुण्यानुसार बदलत जाणारे भावनिक विचार... अथवा कधी कुणासोबत असलेला प्रेमाचा अफेयर ( मी मात्र अपवाद ) वा एखाद्या वर्गमैत्रिणीशी जोडलेलं 'भाऊ-बहिणी'सारखं पवित्र नातं देखील..! होय हे अगदी खरंय...!

असं एक सर्वश्रूत वाक्य आहे कि, "मनातलं मित्रांशी बोलून वाटल्यानं मन मोकळं होतं." पण खरंच असं होतं का? काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात? कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची! ज्या आपण कुणाला सांगु शकत नसल्याने खुप विश्वासाने त्यांना सांगतो...

पण हो... माझ्याजवळ एक उत्तम 'फंडा / मार्ग' आहे असं मनाचं बोचकं उघडून मन मोकळं करण्यासाठी... दैनंदिनी लिहा... त्यात अशी मनातील प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही कुणाशी 'शेअर' करु शकत नाही... एखादे दिवशी ती तुम्ही स्वत:च वाचा ज्याला ती गोष्ट तुम्ही सांगू ईच्छिता ती व्यक्ती स्वत: असल्याची कल्पना करून... तुमच्या मनाला दिलासा अवश्य मिळेल. मी असंच करतो म्हणून हा माझा विश्वास आहे. अथवा सांगा तुमच्या मनातील भावना तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलेचा वापर करुन अवघ्या जगाला... उदाहरणार्थ चित्राच्या, लेखनीच्या, पुस्तकाच्या वा कवितेच्या माध्यमातून...

-राजेश डी. हजारे-

Blog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

तुमचे मित्रमैत्रिणी, तुम्ही स्वत: आणि आजुबाजूच्या तरूण मुलामुलीँच्या आयुष्यात डोकावून बघता तेव्हा-

1.उमेद वाटावी, आनंद व्हावा असे कोणते बदल, मतं, जाणिवा तुम्हाला दिसतात?

=> प्रत्येकच क्षेत्रात आजचे तरूण-तरूणी व मित्रमैत्रिणी देखील यशस्वी होताहेत. आज प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याची फिकीर असते व त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो व आजची तरुण मंडळी स्वत:च्या पायावर उभी होतेय. प्रत्येकच क्षेत्रात मित्रमैत्रिणीँना वा आजच्या तरुण-तरुणीँना लाभत असलेले यश व त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो; शिवाय आपल्या जीवनात देखील यशस्वितेचा कळस गाठण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते व नवी उमेद जागृत होते. आजच्या तरुणांना 'स्व', कुटूंब व समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव असून त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून आनंद होतो.

•पूर्वीच्या पिढीपेक्षा नव्या पिढीच्या जगण्या-वागण्यातले कोणते बदल दिलासादायक असे तुम्हाला जाणवते?

=> पूर्वीच्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगतीशील (Advance) होत चाललेली आहे. नव्या पिढीतील नागरीकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता झळकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने आज प्रत्येक व्यक्ती आधुनिक सुख-सोयीँचा व साधनांचा वापर करताना दिसतो. पूर्वीच्या पिढीमध्ये जगण्या-वागण्यात व बोलण्यात जी संकूचित वृत्ती जाणवत होती ती नव्या पिढीत नाही. आज प्रत्येक व्यक्ती मनातलं व्यक्त करणे शिकलाय व मनाला पटेल ते मोकळेपणे (बिँधास्त) करू लागलाय. ही बाब मनाला दिलासा देते.

2. काळजी वाटावी अशा कोणत्या अवघड गोष्टी तुम्हाला दिसतात / जाणवतात आणि खुपतात?

=> आजचे तरुण-तरुणी भावना व्यक्त करणं शिकलेत. मी देखील एक तरुण म्हणून समजू शकतो कि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी तरुणावस्थेच्या उंबरठ्यात असलेल्यांना वा तरुणांना 'आपलंही कुणीतरी असावं' ही भावना मनात येणं स्वाभाविकच आहे; किँबहूना या अवस्थेत ती नैसर्गिकच आहे. मग ते 'कुणीतरी' कुणीही असू शकतं! मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी..! पण---

आज जरी खरी मैत्री संपली नसली तरी ती फार कमी आढळते. शिवाय जसं मी मागील प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं त्याप्रमाणे आजची पिढी विचारी होत असली तरी त्यात अविचारच अधिक झळकतो.

आजच्या तरुण पिढीला परलिँगी म्हटलं तर मित्र-मैत्रिण तर नकोच... प्रत्येकाला फक्त प्रियकर वा प्रेयसीच हव्या आहेत व त्यांचीही संख्या अमर्याद आहे...

माझ्या लिहिण्याचा उद्देश "प्रेम करणं चुकीचं / वाईट / अपराध आहे" असं सांगण्याचा मुळातच नाही. कारण पवित्र प्रेम करणारे प्रेमवीर देखील आहेत; पण किती..?

मला तर प्रेमाच्या नावाखाली निव्वळ प्रियकर व प्रेयसीच्या भावना व शरीराशी खेळणारे व निव्वळ वासनेच्या आहारी जाऊन फक्त शरीरसुखासाठी 'प्रेम' या पवित्र अडीच अक्षरांची विटंबना करणारेच अधिक दिसतात.

तरुणावस्थेच्या कोमल वयात जाणते-अजाणतेपणे अश्लीलतेचे घाणेरडे प्रदर्शन करणा-या महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्याँचे उदाहरण फार जुने नाही.

आजची तरुण पिढी कूणी मौज म्हणून, कुणी मित्रांच्या नादाला लागून तर कुणी आपला मोठेपणा / वर्चस्व गाजवण्यासाठी तंबाखू, खर्रा, सिगारेट, मद्य आणि 'ड्रग्स' सुद्धा सेवन करू लागलीय. हे सर्व तरुणाईला लागलेले व्यसनाचे वेड पाहून काळजात चर्र होतं. शिवाय तरुणांमध्ये वाढता व्याभीचार आहेच.

या आणि अशा असंख्य गोष्टी मनाला खुपतात.

[Read this article Continue on Next page]