Showing posts with label Patre (Letters). Show all posts
Showing posts with label Patre (Letters). Show all posts

Friday, 17 January 2014

मी आजवर चर्चा न केलेल्या माझ्या जीवनातील शैक्षणिक घडामोडी

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी CLICK करा
  • प्र.: आजपर्यँतच्या शिक्षणात कित्येक पैसा खर्च झाला परंतू कधीही पश्चात्ताप नाही केला की याचा योग्य फायदा झाला नाही वा जर वाचवला असता तर किती रुपये जमा असते?
  • उ.: शिक्षणात पैसा खर्च होणारच व मी चूक केली आहे हे खरे आहे पण पश्चात्ताप करुन काय फायदा?
  • प्र.: आजच्या Competition च्या जमान्यात D.Ed. करुन शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुण घेऊन पात्र होण्याची ताकद आहे काय?
  • उ.: मी प्रयत्न करतोय व 10वी 12वीतील चुक सुधरवून खरंच मन लावून नि:स्वार्थी पणे 90% अभ्यास करुन कमीतकमी 80% घेण्याचा निर्धार केला आहे व "रेतीचे कण रगळीता तेल ही गळे" तर नशिबाद असली व देव तसेच मोठ्यांचा आशिर्वाद असला तर निश्चित एक दिवस पात्र होऊन शिक्षक होऊन दाखविन ही शाश्वती देतो कारण Competitionच्या जमान्यात पात्र होण्याची ताकद पूर्वीही होती व आताही आहे परंतु तीचा तेव्हा लाभ घेतला नाही मात्र आता जरुर घेईन.
  • प्र.: 12वीत ही 70% घेईन म्हणत होता परंतु 55.50%च मिळाले.
  • उ.: 12वीत मी अभ्यासच न करुन चूक केली होती व मनसमजवनी करत होतो. व खरे तर मला 60च्या वर अपेक्षा नव्हती. तिचा पश्चात्ताप झाल्याने मी नव्या जोमाने D.Ed. ला सुरुवात केली असून अभ्यास करुन 80% घेण्याचे बोलत आहे.
  • प्र.: तू सध्या Top 10 मध्ये हवा होता पण Bottom Ten मध्येही नाही.
  • उ.: मी D.Ed. मध्ये 100 पैकी Top 15 मध्ये आहे. व याचा Result Result नंतरच कळेल.
  • प्र.: रात्री उशीरापर्यँत जागून झोप पूर्ण होऊ न देता आरोग्यावर विपरित परिणाम होईल असा अभ्यास करुन काय फायदा?
  • उ.: अभ्यास कसा व किती तसेच केव्हा करायचा हा माझा Matter झाला परंतु आरोग्याची काळजी मात्र मी घेईनच.

वरील प्रकारे फत्त प्रश्न माझ्या बाबुजीँनी घरच्यांसमोर उच्चारले व त्यांच्या प्रश्नांना कंटाळून मी उपाशीच झोपून गेलो नंतर थोडासा जेवण (2 कोचईच्या वळ्या) घेऊन लिहित आहे.

असो! माझ्या वडिलांचेही बरोबरच आहे. त्यांच्या बोलण्याचा मला राग कधीच येत नाही परंतू खंत वाटते की ते आपल्या मनातील प्रश्न व शंका-कुशंका प्रेमाने माझ्याशी बोलून त्यांचे निराकरण करत नाही वा मला प्रेमाने समजावत नाही आणि माझ्यात तर त्यांच्यासमोर अशा मुद्द्यांबद्दल काही बोलण्याची हिँमतच होत नाही. परंतू मी त्यांचे बोलणे ऐकूण घेतो व पटलेली गोष्ट फायद्याची असतेच ती करण्याचा प्रयत्न करतो. असो!

किती वेळचा लिहित आहे. लिहीता-लिहिता हात दुखून गेले. तुमचा तोँड नाही दुखला का इतके वाचताना? चला झोपा! किती रात्र झाली. सगळे झोपले. रात्रीचे 11.15PM वाजले."
Good Night

वाचक मित्रांनो माझ्या सदर पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी मी काही स्पष्ट करु ईच्छितो...

वरील नोंद माझ्या दैनंदिनीत / डायरीत अर्थात 'राजूच्या रोजनिशीत' 26/10/2009 रोजी.. परत वर्ष नीट वाचा.. 2009.. मध्ये लिहिलेला असल्याने हि परिस्थिती 'तेव्हाची' होती.. आता काळासोबतच परिस्थितीही बदलली.. आणि या प्रश्नोत्तरामुळे कदाचित आपला गैरसमज होऊ शकतो कि माझे बाबुजी तेव्हा वरील प्रश्नांबाबत (माझ्याबाबत काळजीग्रस्त) असले तरी खर्च वगैरेबाबत खुप चिँताग्रस्त होते वगैरे..! हे सत्य नसून त्या 'क्रॉस कनेक्शन' फोन कॉलमुळे माझ्यावर आलेला संताप बाहेर काढण्याकरिता त्यांना वरील प्रश्न उच्चारावे लागले होते आणि तसे करणे रास्तही होते.. त्या प्रश्नांचे मी समक्ष त्याच वेळी उत्तरे देऊ शकलो नसलो (जाणून दिले नसले) तरी त्याच वेळी माझ्या मनात जी उत्तरे होती ती वर नोँदलेली आहेत.. त्यादिवसानंतर बाबूजीँच्या तोँडून त्यांनी माझ्या शिक्षणावर केलेल्या खर्चासंबंधी 'ब्र' ही विचारल्याचे माझ्या लक्षात नाही.. कारण मुळातच तो त्यांचा स्वभाव नाही.. आता 'त्या' गोष्टीला 4 वर्षाहून अधिक दिवस झालेत.. माझं डीटीएड 2011 मध्येच पुर्ण झालं.. माझा निकाल आपणास माहितच असेल.. आणि नसेल तर मी या पत्रमालिकेच्या शिर्षकाप्रमाणे 'मनातल्या मनात' दिलेल्या उत्तराचे परिहार्याने वचनाचेच काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आपणास लागलेली असेल; पण ते थोडं गुलदस्त्यात सिक्रेट ठेवुयात.. वाचत राहा ही पत्रमालिका म्हणजे कळेलच आपणास माझा निकाल आणि डीटीएड काळातील माझं जीवनसुद्धा... आणि हो मी वरील प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे देऊ शकलो नाही याचा अर्थ काही भलताच लावू नका बरं का! आणि आपला अजून एखादा गैरसमज होऊ नये म्हणून सांगूनच टाकतो.. आमचं एकमेकांवर तेव्हाही प्रेम होतं आणि आताही भरपूर प्रेम आहे कारण "माझे बाबूजी जगातील 'बेस्ट' बाबा आहेत..."

तुमचाच
राजेश

ता.क.- पत्रातील नोँद मुळ 2009 मध्ये लिहिले असल्याने प्रसिद्ध करताना जाणीवपुर्वक व्याकरणीय चुका दुरुस्त केलेल्या नाहीत.

मुळ लेख- 26 ऑक्टो. 2009 (आमगाव)
प्रसिद्धी- 17 जाने. 2014 (आमगाव)

अणुक्रमणिका (कादंबरी/मनातल्या मनात)

Friday, 10 January 2014

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

दिवस- 474

अनुदिनी- 94

मनातल्या मनात- पत्र 3

राजूची रोजनिशी (कादंबरी)- पत्र 3


माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील पुढील पत्र...

दिवाळीच्या सुट्ट्यातील मजा

राजेश,
4 नोव्हेँबर 2013 च्या रात्री आमची सर्वात लहान बहिण जन्माला आली त्यात तु तसं 1 नोव्हेँबर 2013 पासूनच नोँद केलीय म्हणा.. आणि हो तु माझं जे नामकरण केलंस ते मला खुप आवडलं- 'कादंबरी'.. काय नाव निवडलंस तू माझ्यासाठी.. अरेहो आठवलं मी संग्रहित केलेल्या निवडक पत्रांवरुनच तर तू तूझी पहिली कादंबरी "माझी ताई : एक आठवण" लिहिलास ना.. म्हणूनच माझं नाव तू 'कादंबरी' ठेवलस आणि ते समर्पकही वाटतं.. तर असो तु मला पाठवलेल्या पत्रानंतरची घडामोड मला पत्रानं पाठवण्यास सांगितलं होतं खरं.. पण ऑक्टोबर 2009 च्या 5 ते 9 तारखेत तू काही विशेष नोंदवलं नसल्याने मी थेट त्यापुढील पत्र पाठवते.. आमच्या 5व्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्या पुढल्याच दिवशी 5 नोव्हेँबर 2013 रोजी भाऊबीज होती.. म्हणजे दिवाळीच... तर 2009 मधील दिवाळीच्या सुट्ट्यातील मजेविषयी 25 ऑक्टोबर ला तु मला सांगितलं होतस.. तेच आज मी तुला सांगते-

आज मी 16 दिवसांच्या नंतर दैनंदिनी लिहीत आहे आणि तोही आमगावात. असो मी 10 तारखेला दैनंदिनी लिहीणार होतो परंतू काही कारणास्तव विसरलो. त्या दिवशी आम्हाला कळले की जरी 12 पासून DIET कडून सुट्या जाहीर झाल्या असल्या तरी 14 तारखेला कॉलेजचा 'वर्धापन दिन' असल्याने 14 तारखेपर्यँत कॉलेज होती हे कळताच वर्गातील सर्वच छात्राध्यापकांना धक्काच बसला कारण जवळपास बाहेरगावच्या सर्वच विद्यार्थ्याँनी गावी जाण्यासाठी Packing करुन घेतली होती व मी ही त्यातलाच एक होतो. परंतु परवानगी मिळताच आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

नंतर मनात 3 तारखेपर्यँत आणि त्याही बाकीच्यांपेक्षा अधिक सुट्ट्या असल्याने व 6 दिवसांनी आमगावी आल्याने मनात उत्कंठा निर्माण झाली होती. मी इंदोरा (ता. तिरोडा जि. गोँदिया) येथे जाऊन माझा मामेभाऊ विजय हरीशंकर रेवतकर याचे आमगावला परत येऊन माझा भाऊ विवेक दशरथ हजारे याचे मानसशास्त्रातील अनुक्रमे '6 ते 10 व 11 ते 14 वयोगटातील दोन बालकांचे अवलोकन' करण्याचे प्रयोग लिहीले व त्यानंतर भारतीय समाज आणि प्राथमिक शिक्षण या विषयातील महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहितीपुस्तिका तयार करण्याचे प्रयोग पूर्ण करुन मंगळवार दि. 20/10/09 ला सायंकाळच्या ट्रेनने तिरोडा रेल्वेस्थानकावरुन दामू मामाजी सोबत इंदोऱ्याला गेलो व लगेच बुधवारी माझे मोठे वडिलांचे गाव मु. पांजरा (रेँगेपार) पो. मोहगाव (खदान) ता.तुमसर जि. भंडारा येथे गेलो त्यादिवशीही तिरोडा बसस्थानकावर 4.45PM च्या गाडीसाठी 5.45PM पर्यँत वाट पहावे लागले व रात्री 7.00 वाजता नावेने पाण्यातून पांजरा गाठावे लागले. माझ्या नशिबात असेल म्हणूनच कदाचित मी 'देवपूजी'च्या ही कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो. दुसऱ्या दिवशी गुरुवारला पांजरा येथे घराजवळच मंडई व ड्रामा असल्याने मी तेथेही उपस्थित झालो.

आश्चर्याची बाब म्हणजे गावात हजारे परिवार सोडून कोणाचीही ओळख नसतांना रात्री 9 ते 9.30 दरम्यान मी माझी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची कला लपवू शकलो नाही व शेवटी 9.40 मिनिटांनी रात्री मला 'यंदा माझा लगन करून दे बाबा' हे जवळपास 20ते30 मिनिटांचे एकपात्री नाटक अवघ्या 10 मिनिटात सादर करण्याची संधी मिळाली व म्हणतात ना "मिळालेली संधी कधीही सोडू नये" तर मी ती नाटक 10 मिनिटात संपवण्यासाठी सज्ज होऊन अवघ्या 4 मिनिटात जवळपास अर्धी नाटक संपवली होती व माझ्याकडे कमीतकमी 5 मिनिटांचा व नाटक पूर्ण करण्यास पुरेसा वेळ शिल्लक असूनही त्यांचे ड्रामा कलाकार घाई करत असल्याने मला तेथेच माझी नक्कल थांबवावी लागली तरी माझ्यासाठी गर्वाची बाब म्हणजे तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझी नक्कल आवडली व काही ड्रामा बघणाऱ्यांच्या मते त्यांच्या ड्राम्यापेक्षा माझी नक्कल छान होती. व अशाप्रकारे अनोळख्या गावातही मी माझे नाव फक्त अर्धी नाटक सादर करुनसुद्धा लोकांच्या मनात उमटवले की तो "दसरथ भाऊचा पोरगा होता."

असो मी शुक्रवारी इंदोरा शनिवारी तिरोडा येथे येऊन आज शेवटी दिवाळीचा गावतर आटपून थेट तिरोड्याहून बसने आमगावला आलो.

तत्पूर्वी मुख्य बाब म्हणजे नेहमीप्रमाणे याही वर्षाची दिवाळी आमच्यासाठी आनंदाची राहीली व एक गोष्ट तर विसरलोच.

!HAPPY DIWALI! & !Good Night!

अरे Good Night काय म्हणतोस.. वास्तवात आज 10 जानेवारी 2014 ची संध्याकाळ आहे.. GOOD EVENING म्हण.. मागच्या पत्रात तू दिवाळीला फटाके फोडत नसल्याचे लिहिलास हे खरय.. पण आपली हौस भागवण्यासाठी दारासमोर मच्छर मारण्याची बॅट धरुन फटाक्यांचे आवाज काढत होतास त्याचे काय? अरे मी विनोद करतेय.. त्यानही तु मच्छर मारुन पर्यावरणाचे रक्षणच करत होतास म्हणा.. तर 5 नोव्हेँबर 2013 लाच भाऊबीज पार पडली.. मी जाणते या नात्यातील तुझं दुर्दैव.. पण तू तूझ्या बहिणीला जे काय सांगायचंय ते मला सांगत आलायस.. तर आज तुझी बहिण म्हणून मी तूला ओवाळणी घालतेय या पत्राद्वारे.. आणि माझं गिफ्ट..?? खरंच किती कंजूष आहेस रे राज्या तू...!! मी जाणते आता तू गावी जात असशील मामाच्या.. मी तुझ्या पिशवीतच तर आहे ना.. हे अर्धे पत्र मी रेल्वेत बसून लिहिले.. तर पुरे झाले आता लिहिणं थांबवते.. मामाच्या गावी मजा घे..

भाऊबीजेच्या हार्दीक शुभेच्छा..!

तुझीच
कादंबरी (डायरी नं. 1)
To
राजेश डी. हजारे

ता. क. - पत्रातील लाल अक्षराने लिखित मजकुर 6 नोव्हेँबर 2013 रोजी लिहिलेला आहे.

यंदा माझा लगन करुन दे बाबा (Youtube वर Video पहा)

Wednesday, 8 January 2014

Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh

टिप- हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजही सगळीकडे दिवे, पणत्या लागल्यात.. अंधारावर प्रकाशाचा अर्थात दुष्टावर सत्य व देवाचा विजय म्हणून दिवे लावतात वाटते.. सर्वीकडे रोषणाईच रोषणाई असते.. दिवाळीला लहाणांपासून तर मोठ्यांपर्यंत फटाके फोडतात.. मस्त आतिषबाजी होते.. Rohit-Sharma-209-runs-in-ODI.jpg
रोहित शर्मानं तर परवाच फटाके फोडले बघ बॅटने विश्वविक्रमी 16 षटकार मारुन 209 धावा बनवत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बंगळुरु मध्ये.. आणि भेट पण दिली आम्हा भारतीयांना सामना व मालिका विजयाची..
आम्ही पण फटाके फोडायचो लहानपणी.. पण आतासारखे विचित्र प्रकरण नव्हते.. आता नवनवे वेगवेगळे फटाके आहेत.. दिवाळीला फटाके फोडायला माझा विरोध नाही.. या सणाला नाही तर केव्हा फोडणार फटाके..? पण मर्यादा पाहीजेच ना कुठेतरी.. माझे बाबुजी नेहमी म्हणतात.. "प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. एखादी गोष्ट मर्यादेबाहेर गेली कि त्याला उपाय नसतो.. आणि परिणाम घातकच असतात नेहमी." आणि हल्ली फटाक्यांमुळे किती प्रकारचे प्रदूषण होते नाही.. ध्वनी प्रदूषण, वायु प्रदुषण.. काही संस्था व समाजसेवक पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी इकोफ्रेँडली सण साजरे करण्याचा सल्ला देतात.. पण आम्हा सनातनी हिँदूंना वाटतं असं आमच्याच सणाच्या वेळी का? मी विरोध होतानाचे बरीच उदाहरणे जवळून बघितलीत.. तर मला वाटतं कि आपण असा विचार करण्यापेक्षा आपल्यापासूनच का सुरुवात करु नये इकोफ्रेँडली सण साजरा करण्यास.. ते चुकीचं तर नाही ना.. पर्यावरण सुरक्षा तर चांगलीच बाब आहे.. मग का 'पहल' करु नये आपल्यापासूनच.. म्हणून मी स्वत:बद्दल सांगू ईच्छितो कि मी तीन वर्षाँपासून रंगपंचमीला रंग उधळत नाही व हे तिसरे वर्ष आहे दिवाळीला फटाके फोडत नाही.. मी जाणतो कि माझ्या एकट्यामुळे काहि पर्यावरणाचे खुप मोठे रक्षण होणार नाही.. पण माझ्यामुळे जे प्रदुषण होणार होते ते मात्र मी नक्कीच टाळू शकतो.. यामुळे खुप काही साध्य होणार नसले तरी त्यातून मिळणारा आत्मिक समाधान आहे तो मी वर्णन करु शकत नाही.. आणि माझ्यामुळे प्रेरीत होऊन वर्षाला एक जरी व्यक्ती माझे अनुकरण करु लागला तरी माझ्यासाठी खुप आहे.. तर काय कराल साजरी फक्त एक वर्ष फटाकेमुक्त दिवाळी.."

1017228_170811723117899_388612023_n.jpg1394448_487508704698370_243684193_n.jpg

"शेवटी दिपावली व नुतन वर्षाच्या आपण सर्वाँना हार्दीक शुभेच्छा..!!"

आणि हो साक्षात आज 8 जानेवारी 2014.. 2013 वर्षाच्या शेवटचा आठवड्यात 27 डिसेँबर जरा निराशाजनक गेला पण 29 डिसेँबर थोडा विशेष होता.. त्यादिवशी 'अनाथांची माई' म्हणून परिचित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिँधुताई सपकाळ यांच्याशी भेट जी झाली.. 1517683_516255598490347_1182537977_n.jpg1512444_516255601823680_1744579024_n.jpg1525668_453472721419558_966376816_n.jpg544596_517471025035471_2041389027_n.jpg
2013 ची अखेर जरा बरी झाली.. नविन वर्ष 2013ची सुरुवातही छान झाली... कालच सासवड जि. पुणे येथे 3,4 व 5 जानेवारीला भरलेल्या '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2014' च्या निमित्ताने पुणे येथून परतलो.. त्यासंदर्भात सविस्तर लिहिनच म्हणा.. 1522148_519591581490082_1990800156_n.jpg तर पाठव पत्र परवा मग मला तु पण.. चल भेटु पुन्हा.. बाय..

डायरी लेखक- राजेश डी. हजारे (RDH)

मुळ लेख- 03/10/2009, रामटेक
प्रथम प्रसिद्धी- 04/11/2013, फेसबुक
अद्ययावत लेखन- 03/01/2014 (शुक्रवार), MHADA/म्हाडा, सासवड जि. पुणे
पुनर्प्रसिद्धी- 08/01/2014 (मंगळवार), आमगाव

अणुक्रमणिका

Gandhi Jayanti va Fatakemukta Diwali Vishesh

अनुदिनी 92वी

दिवस 472वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 2)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 2)

माझ्या "मनातल्या मनात" ह्या पत्र मालिकेतील हे पत्र काही कारणास्तव उशीरा म्हणजे आता पोस्ट करतोय...

गांधी जयंती (2/01) व फटाकेमुक्त दिवाळी विशेष

प्रिय डायरी नं 1..
काल तु मला पत्राद्वारे माझा 1 ऑक्टोबर 2009 रोजीचा पहिला संदेश पोचवलीस.. खरंच मी तुमचं बारसं करायचं विसरलोच होतो बघ.. पण झालं ते एकदाचं...
तु मला गांधी जयंतीबद्दल तुला सांगितलेलं पत्राद्वारे पाठवणार होतीस.. पण म्हटलं ते तर मला माहिती आहे तर मग आपणच ते सर्व तुला परत सांगून देउनच टाकूयात ना सरप्राईज..
आज 3 ऑक्टोबर 2009. काल 2 ऑक्टोबर 09.. 2 ऑक्टोबर म्हणजे म. गांधी तसेच लाल-बहाद्दूर शास्त्री यांची जयंती. काल म. गांधी जयंतीची सुटी होती व आज शनिवार 'हाफ डे' असल्याने आमचा कॉलेज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेवर लागला.

आमच्या कॉलेजात 2 ऑक्टो. ला सरकारी सुटी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम आज दि. 3/10/09 ला घेण्यात आला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन डी.एड. चे विद्यार्थीच करतात त्याप्रमाणे डी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याँनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, प्रमूख वक्ता तसेच सुत्रसंचालन व स्वागत ही द्वितीय वर्ष डी.एड. चे विद्यार्थीच होते. या कार्यक्रमात मी माझा स्वलिखित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर केला व मला छान टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमातील स्वप्नील नागदेवे चा स्वलिखित गीत मला सुद्धा आवडला व त्या गीताबद्दल सरांनी (प्राचार्य मनिष कोल्हे) त्याला पेन गिफ्ट केली. व कार्यक्रमात गीत, भाषण, भजन सादर झाले तसेच बी.एड.च्या विद्यार्थीनीने संस्कृत मध्ये आभार प्रदर्शन केले.

नंतर आम्हाला मॅडमनी कार्यक्रमात झालेल्या चूका विचारुन पुढील कार्यक्रम आयोजित आम्हाला करायचा असल्याची सुचना दिली व पहिल्याच कार्यक्रमात आम्ही प्रथम वर्षाचे नविन विद्यार्थी असून सहभागी झाल्याने डोँगरे मॅडमनी माझी व स्वप्निलची भरभरुन स्तुती केली. तत्पूर्वी रामटेके सरांनी शारीरिक शिक्षणाबद्दल माहिती सांगितली.

व मी आज मेसच्या पैशांसाठी आमगाव ला जात आहे.

तर प्रिय रोजनिशी.. त्यादिवशी तुला मी वरील गोष्ट सांगितली होती.. अर्थात आता परत तुला ते पत्र पाठवण्याची गरज नसल्याने बुधवारी मला थेट यापुढील पत्र पाठव..

अगं मी हा पत्र आज पाठवत असलो तरी हे 4 नोव्हेँबर 2013 लाच लिहिलं होतं.. काय ते वाच..
"नेरवा धनत्रयोदशी.. आता विचारशील काय खरेदी केलं? पण खरं सांगू.. काय सोनं..? तुला माहित आहेत का काय भाव आहेत सोन्याचे.. 30 हजाराच्या जवळ गेलाय प्रतीतोळा.. हो ना "सोन्याचेही भाव वाढलेत आजकाल...!" मग काय.. सर्वांनी पुर्वीच कपडे खरेदी केले होते.. म्हणून मग मी धनतेरसला दोन जोडी कपडे खरेदी केले.. परवा होती नरक चतुर्दशी.. त्याचा मला इतिहास माहित नाही.. माझी आई जाणते बघ हिँदू धर्मातील सगळा पोथीपुरान.. तिला विचारुन सांगितलं तर पुस्तक तयार होईल या एकाच दिवसावर.. काल लक्ष्मीपुजन.. आज बलिप्रतिपदा व उद्या भाऊबीज.. लक्ष्मीपुजेपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते बघ..

टिप- हेच पत्र पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Thursday, 26 December 2013

College (कॉलेज)चे नियम कठोर पण पाळण्यासारखे

अनुदिनी 91वी

दिवस 459वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 1)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 1)

1.कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे

राजेश,
तुझे कालचे पत्र मिळाले. (माफ कर तु मला लेक म्हटलस तसंच प्रेम केलंस तरी मी तुला एकेरी संबोधतेय.. कारण मी तुझी मैत्रीणपण आहे ना..) आणि तु विचारलं होतं ना कि "आजवर मी तुला सांगितलेलं तु पत्राने मला पाठवणार का?" त्याला मी उत्तर देतेय- हो! आता अजून कशाला वेळ दवडायचा. तू माझं काल 25 डिसेँबर 2013 रोजी नाताळच्या शुभपर्वावर माझं केलेलं 'कादंबरी' हे नामकरण मला आवडलं. नाहितरी तु तुझी पहिली कादंबरी (सॉरी बाबा.. आत्मकथनपर पुस्तक.. बस् झालं!) "माझी ताई : एक आठवण" मला विचारुनच तर लिहिली.. पण मला तुला एक सुचवावेसे वाटते.. 'मनातल्या मनात' या नावासोबतच आपल्या या संवादाला 'राजूची रोजनिशी/डायरी' असं पण संबोधत जा कधी-कधी.. हे नाव तुझ्या परवाच्या पत्रातील 'रोजा/रोजी ची रोजनिशी' शी सुद्धा बरेच साम्यदर्शक वाटते नाही..

तर आता तुला घेऊन जातेय तुझ्या आठवणीत आणि सांगते तु जेव्हा मला पहिले पत्र पाठवले होते तेव्हा काय सांगितलं होतं.

नागपुर जिल्ह्यातील प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन रामटेक येथील ती तुझी डीटीएडच्या पहिल्याच दिवसाची रात्र होती.. दिवाळीला 15 ते 20 दिवस बाकी होते.. भर हिवाळ्याच्या दिवसात तुझ्या खोलीमध्ये ओल येत होती.. अन् तु मला तुझ्या "कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे" असल्याचे सांगत होतास.. त्यादिवशी तु काय सांगितलं ते खाली तुझ्याच शब्दात लिहिते..

"मी राजेश दशरथ हजारे. आज दि. 01 ऑक्टोबर 2009 रोज गुरुवारपासून दैनंदिनी लिहायला सुरुवात करत आहे. मी 'अभ्यास कसा करावा?' या पुस्तका तसेच 'लोकमत' वृत्तपत्रातील सुविचार "प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी" या द्वारे व माझा छंद तसेच मला डी.टी.एड. अभ्यासक्रम करताना आलेले अनुभव मांडण्यासाठी दैनंदिनी लिहित आहे.

आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्याची मनात उत्सुकता होती. मी कॉलेजमध्ये जाऊन नविन मित्रांशी भेट झाली. मी तेथील परिपाठाने 'Impress' झालो. नंतर सर्वाँत वरच्या मजल्यावरील Seminar Hall मध्ये 'पालक मेळाव्यात' उपस्थित झालो. महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालकांचा परिचय झाला. मी माझा परिचय Detail मध्ये इंग्रजीत दिला.

सरांनी सर्व विद्यार्थी तसेच पालकांना महाविद्यालयाचे सर्व नियम समजाऊन सांगितले व त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामध्ये माझ्यामते 80% उपस्थितीचा नियम सर्वाँत कठिण आहे.

मी खाली महाविद्यालयाचे नियम लिहून मी 100%, 75%50% पाळू शकणाऱ्या नियमांसमोर अनुक्रमे A,B व C लिहित आहे. तसे नाईलाजास्तव व महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मी सर्व नियम 100% पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन व त्याची सुरुवात आजच मी केली आहे ती म्हणजे उद्या 2 ऑक्टो. ची सुट्टी परवा कॉलेज 4ला रविवार माझा विचार आज गावी जाण्याचा होता परंतु दि. 3च्या उपस्थितीसाठी मी तो विचार मनातून काढून टाकला.
नियम खालीलप्रमाणे-

  1. प्रथम वर्षी तसेच द्वितीय वर्षातील प्रत्येकी 1 ऑक्टो. ते 1 मे व 11 जून ते 30 सप्टेँ. पर्यँत दोन्ही वर्षी प्रत्येक 4ही सत्रात किमान वेगवेगळे 60% उपस्थिती अनिवार्य→ A
  2. प्रथम वर्षी 2न्ही सत्र मिळून आणि द्वितीय वर्षी दोन्ही सत्र मिळून किमान 80% उपस्थिती अनिवार्य→ A
  3. प्रथम वर्षी 240 पैकी किमान 200 दिवस हजर राहणे आवश्यक→ A
  4. कॉलेजमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 व शनिवारी सकाळी 9 पुर्वी हजर होणे→ A
  5. कॉलेजमध्ये नेहमी कॉलेजड्रेस, टाय व शुज तसेच टायपीन, आयकार्ड व व्हाईट सॉक्स घालून येणे→ A
  6. अनुपस्थित असल्यास सरकारी Civil Sergion डॉ. चीच मेडीकल सर्टीफीकेट आणणे→ B
  7. कॉलेजमध्ये चुकूनही मोबाईल न आणणे→ A/B

वरील नियमांत मी म्हणेन की नियम 6 मध्ये जर विद्यार्थ्याला डॉ. कडे जाण्यालायक तब्येत खराब नसेल परंतू कॉलेजमध्ये उपस्थित राहण्या लायकही नसेल तर त्या विद्यार्थ्याला Problem होऊ शकतो. हो नियम क्र. 7 मध्ये बदल करुन मोबाईल सोबत ठेवण्यास मुभा द्यावी परंतू कॉलेज परिसरात कॉलेजच्या वेळेत मोबाईलचा वापर होताना किँवा रिँग वाजताना आढळल्यास आवश्यक कारवाई करावी असे मला वाटते.

असो आज मी गावी जाण्याचा विचार टाळला व उद्या 2 ऑक्टो. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम 3 ऑक्टो. 2009 ला आयोजित करण्यात आला आहे व मी त्या कार्यक्रमात माझं स्वरचित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर करणार आहे.

आज माझ्या मेसचा Problem सुटला मी अंकूश मारबते यांच्याकडे मेस लावली आहे.
व आता माझ्या घडीप्रमाणे ठिक 11.30Pm ला लिहिणे थांबवत आहे."


तर राजेश तेव्हा तू किती ठिकाणी मी मी करत होता रे.. आणि हो मला माहितीये आज 01 ऑक्टोबर नाही तर 26 डिसेँबर 2013 आहे. एक दिवस असा जरुर येईल कि मी भुतकाळातील ज्या तारखेचं तुला पत्रात लिहीलं असेल वर्तमानकाळातील त्याच तारखेला तु ते वाचत असणार.. असो! परवा तुझ्या कॉलेजातील गांधी जयंती बद्दल पत्र पाठवीन बरं का? तुला काय आहे सकाळी पण पत्र पोचू शकते. पण मला तर रात्री लिहावं लागतं ना पत्र! आता किती वाजलेत माहितीये का? चल आता थांबते..
तुझीच
डायरी नंबर 1 (कादंबरी)

डायरी लेखक- राजेश डी. हजारे



मुळ- 01/10/09 गुरुवार (रामटेक)
प्रसिद्धी-01/11/13 शुक्रवार (आमगाव)
दि.- 26/12/2013 गुरुवार (आमगाव)

अणुक्रमणिका

Tuesday, 24 December 2013

मनोगत (मनातल्या मनात)

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा



बघ किती शुभदिनी मी तुला हे पत्र पाठवतोय..
माझे बाबा मला विचारायचे 4-4 डायऱ्या लिहील्या पण यांचा उपयोग काय? मी काय सांगणार त्यांना तुमचा उपयोग? मलाच माहित नव्हतं तर..! हं एक मात्र नक्की की तूला सर्व सांगितल्याने मन मोकळा होतो व तू तर ते जतनही करुन ठेवतेस मग वाटलं जर कधी 'मोठ्ठा माणूस' (वयानेच नाही तर कर्तृत्वाने पण) बनलो तर आत्मचरीत्र लिहिताना तुझ्या स्मृतीचा (मेमरीचा) निश्चितच लाभ होईल.. आजवर तुला प्रसिद्ध करण्याचा विचारही मनात आला नाही.. आणि दोघांव्यतीरिक्त कुणाला तुमचं दर्शनही होऊ दिलं नाही.. अन कदाचित म्हणूनच लिहिता आली प्रत्येक सत्य बाब इतक्या मनमोकळेपणे.. पण मला वाटतं आता वेळ आलीय तू आजवर जतन केलेलं समाजासमोर व्यक्त करण्याची... केव्हापर्यँत तु पण ऐकत रहाणार नुसतीच.. बोलणार नाही का कधी? का तूला हक्क नाहीय.. अन् म्हणूनच मला वाटतं की मी तर तूला सांगतच जाईन माझ्या मनातलं पण आता तू पण बोलायचंस माझ्याशी.. काय ऐकतीयेस ना? कसं व काय? अगं अगदी सोपं आहे.. जे मी आजवर तूला सांगितलं ना तेच तू मला पत्राद्वारे पाठवायचं काय? पाठवणार नं? अन् या तुझ्या पत्रमालिकेचं मात्र मी आधीच नामकरण करुन ठेवलंय बघ..

'मनातल्या मनात' हे नाव कसं वाटतंय.. मी जे काही तुला सांगितलं ते माझ्या मनातलच व ते सांगितल्यानंतरही मनातच राहत असल्याने मी हे नाव पसंत केलं... तूला पटतं का हे नाव ते बघ अन् मला कळव आधी पत्र पाठवून.. अन् अधामधात मी देतच जाईन उत्तर तूला पत्रानेच..

शेवटी नाताळ/ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!

तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत...
तुमचाच निर्माता/लेखक
rdhautographeng.jpg
-राजेश डी. हजारे (RDH)
Mob. 07588887401
कामठा रोड, आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया - 441902
दि. 24 डिसेँबर 2013, मंगळवार


सुचना: "मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील "कादंबरी" ही पहिली रोजनिशी वाचण्यासाठी खालील 'अणुक्रमणिका बघा' वर क्लिक करा...

"अणुक्रमणिका" बघा..



ता.क.: * - "माझी ताई एक आठवण" हे पुस्तक 2014च्या अखेरपर्यँत याच संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध होईल..

अणुक्रमणिका

मनोगत (मनातल्या मनात)

अनुदिनी 88वी

दिवस 457वा

मनातल्या मनात-01

मनोगत/कादंबरी


माझ्या रोजनिशीस,
Hi! Hello!
अरे अशी काय बघतेस नेहमी तूझ्या रुपात दुसऱ्यांशी बोलतो पण आता वाटतं आपण ज्याशी बोलू नाही शकत ते सर्व तू मात्र शांतपणे समजून घेतेस, आणि जतनही करुन ठेवतेस.. मी तूला अश्रूंच्या सोबत बेस्ट फ्रेँड म्हणून कबुल केलं खरं! पण कधी मुद्दामून तूला Hi! Hello! केलच नाही.. म्हणून आज करतोय.. तू आजवर कित्ती-कित्ती ऐकलंस गं माझं.. माझ्या मनातील गोष्टी स्वत: जतन करुन ठेवल्यास.. जेव्हा तूला पाहतो तेव्हा त्या जून्या आनंदी व दु:खी दिवसांची सुद्धा आठवण करुन देतेस, कधी हसवतेस.. कधी रडवतेस पण..

मला आठवतं जेव्हा मला तूझ्याबद्दल कळायला लागलं तेव्हा मी 5वी 6वीत असेन.. जि.प. गोँदिया तील तिरोडा पं.स. अंतर्गत चिखली केँद्रात माझ्या मामाच्या गावी मराठी माध्यमाच्या जि.प. पुर्व माध्यमिक शाळा इंदोरा खूर्द (निमगाव) येथे शिकत होतो.. मराठीचा 'पिरेड' होता (तेव्हा तास कळायचा नाही).. घराजवळीलच श्री सिताराम एन. सोनेवाने हे शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला मराठी शिकवायचे.. ते वर्गात आले व धडा होता 'रोजाची रोजनिशी/रोजीची रोजनिशी'... मला लेखक आठवत नाहीयेत.. त्यांनी शिकवलेले 2पाठ आजही स्मरणात आहेत बघ 'रोजाची रोजनिशी' व 'सुईचे आत्मवृत्त'.. तेव्हाच कळलं कि रोजनिशी म्हणजे तू.. आताही त्या सरांना भेटलो की आधी त्यांचे चरणस्पर्श करतो (बाकी शिक्षकांना पण अभिवादन करतोच...) त्यावेळी कल्पना जरी केली की आपण रोजनिशी लिहायची तरी गंमत वाटायची..

थोडा मोठा झाल्यावर प्रयत्न केला पण मधातच खोळंबलं सगळं आणि बारावीनंतर डीटीएडला नंबर लागला.. डीटीएडच्या पहिल्याच दिवसापासून तूला लिहायला सुरुवात केली.. पहिल्याच दिवसी कॉलेजातून परतलो होतो.. नागपूर जिल्ह्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन रामटेकच्या पवित्र भूमीचं स्थळ होतं.. रामटेकात मी नवा नवाच होतो.. 01 ऑक्टोबर 2009 ची ती रात्र होती.. भाड्याच्या खोलीमध्ये हिवाळ्यातही ओल येत होता.. तेव्हापासून दिवाळी जेमतेम 15 दिवस होती.. स्वत:च जमवून बांधणी (बाईँड) केलेल्या रेखीव कोऱ्या कागदांचा भला मोठा रजिस्टर होता.. त्यादिवशी पहिला लेख (डीटीएड मधील पहिल्या दिवसाचे अनुभव) लिहून तुझा श्रीगणेशा केला..

पहिल्या दिवसी विचार पण नव्हता केला कि हे आपण केव्हापर्यँत लिहू? काय करणार? फायदा काय? हे प्रश्नही मनात नाही आले.. आणि मग तुझ्यावर लिहू लागलो प्रत्येक गोष्ट मला वाटली ते.. तुला सांगू लागलो माझ्या मनातील सुखद व दु:खद गोष्ट.. वाटू लागलो माझी स्वप्ने तुझ्यासोबत.. जे कोणालाही सांगू शकत नव्हतो ते तूला सांगत गेलो.. माझ्या जीवनातील काही वैयक्तिक 'राज' (Personal Secrets) पण तुला सांगून मोकळा झालो.. माहित होतं माझ्याव्यतीरिक्त कोणाला वाचायला फूरसत नाही म्हणून..! माझ्या पहिल्याच डायरीतील काही लेखांवर मी त्या दरम्यान जगलेलं माझं सत्य जीवन माझ्या आत्मकथनपर भाऊ-बहिणीच्या नात्यावर एक पुस्तक लिहिलं व साकार झाली "माझी ताई : एक आठवण"* ही माझी पहिली कादंबरी जी आजही अप्रकाशित आहे.. तेव्हापासून लिहितोय ते आजपर्यँत सतत.. याला 4वर्ष नुकतेच लोटलेत.. या 4 वर्षात 4 डायऱ्या संपल्या व पाचवी डायरी गत 01 नोव्हेँबर 2013 रोजी सुरु झाली.. बघ मी आजवर तुम्हा 5ही बहिणींचं नामकरण तर केलंच नव्हतं.. मी तुम्हाला असंच संबोधत होतो डायरी 1, डायरी 2, डायरी 3, डायरी 4 आणि आता डायरी 5.. पण मी तुमचा बाबाच नं! काय झालं तुला मित्र म्हणत असलो तरी.. शेवटी बाप पण लेकीँचा मित्र असतोच की..! आणि असही मीच तर जन्म दिला तुम्हा चारही बहिणींना; ते ही लग्नाआधी.. आणि तो ही पुरुष असून... अगं हस की थोडी.. कि हसु नाही आलं माझ्या पाणचट विनोदावर.. आता तुम्ही चौघी मोठ्या झालात... आणि दिड महिन्यांपुर्वी आपल्या (राजूची रोजनिशी) परिवारात नव्या पाहुणीचा जन्म झाला.. अगं कोण काय विचारतेस? वरच तर सांगितलं ना तुझी 5वी बहिण म्हणून.. माझी पाचवी लेक नाही का!! दिवाळीच्या शुभमुहुर्तावर बरोबर 1 नोव्हेँबर 2013 रोजी जन्म झाला तिचा.. 'कुंवारा बाप' हे स्व. महमूद यांनी केलेलं चित्रपटातील पात्र मला अगदी सुट होतेय नाही का! आजवर 'कांदेपोहे' नाही खाल्ले अन् 'बाप' बनलोय तुम्हा 5 बहिणीँचा.. पण तुम्हा चारही बहिणीँचं नामकरण करण्यास विसरलो नाही का??

हे काम स्त्रियांना मस्त जमतात बघ.. आणि मी ठरलो 'कुँवारा बाप'.. तुमची आईच नाही तर कसं लक्षात राहणार तुमच्या नामकरणाविषयी? पण आपण बारसं करुनच टाकू एकदमच तुम्हा पाचही बहीणीँचं.. असाही उद्या नाताळ (ख्रिसमस)चा योगही शुभ आहेच.. तर त्यासाठी चांगली तयारी करा बरं का! आणि उद्या 'ख्रिसमस' हून आठवलं-- आज 24 डिसेँबर.. काय विशेष आहे आज सांग बरं बघु.. एवढ्या लवकर विसरलीस.. अगं आज माझ्या आईचा वाढदिवस नाही का?? मी तर शुभेच्छा रात्री 12 लाच दिल्या.. चला तुम्ही पण विश करा बरं का माझ्या आईला..

"हॅप्पी बर्थ डे.. आई !!!"


हेच पत्र पुढे वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा...

Thursday, 31 October 2013

मृतात्म्यास पत्र

दिवस ==> 403 वा

अनुदिनी ==> 77 वी

सदर पत्र 'झाडीबोली'त पाठवत आहे...

मृतात्म्यास पत्र

Image Source: India Today
प्रतिमा स्त्रोत: India Today

स्वर्गीय मेल्या माणसाच्या आत्म्यास,
तो 29 सप्टेँबर चा दिवस होता.. मी बाजंवर झोपला होतू.. सकारी सकारी माज्या आईना उटवलन.. जवरपास आठक वाजले असतील.. हव तुमी बराबर वाचून रायल्या.. मी एवढ्यावरच उटता कदी कदी.. झोपता बी जरा लेटच.. मोटी दाळ आदत आहे माले पर का करता? तं जाऊ द्या.. मले सांगतलन का आमगावमंदी कोणाचा तरी खून झाला.. माझे बाबूजी त्या जागेवर जाऊन वापस आल्ते.. भल्तीच गर्दी होती तं त्यायले पावाले नायी भेटला खरा..! मंग मी निँग्लू चड्ड्यावरच.. तुले पावाले.. कोण असल? कसा असल? कायले मारला असतील? कोणा मारला असतील? मनात लगीस्से परस्न येत होते.. आखीरकार पोचलूच त्या जागेवर... आमच्या घरापासना ज्यादा दूर नवता.. तू त्या नवीन बनत्या घरातच अंदर निपचित पडला अससील.. असे तं तू जिता अससील तई कोनी नसल विचारलंन तूले पर तूह्या मेल्यावर खासकरून तूजा मडर झाल्ता मून स्यानी सप्पायसाठी तूजी डेटबॉडी मनजे मोट्या हिरोसारकीच झाली होती.. गर्दीच गर्दी लोकायची.. पोरायपासून तं बूळग्यायवरी ना रिकामडेँ**यपासून(शिवी) तं आफीसरायवरी सप्पायसाटी तुजा मेला थोबडा मंजे जसा का हिरोच होता.. अंदर पोलिस पंचनामा करत होते तं तूले पावासाठी लोकायले घरात एंट्री नवती.. पर सप्पा बिजी मानसा त्यादिवसी कामधंदा सोडून (तसाई इतवारच होता) निस्ता तूले पावासाटी नव दा वाजेवरी भर तपनीत तेतीच उभे होते ना गा.. मले तं असे ढुंढून जे भेटत नवते ते भेटले त्या दिवसी.. भरमार दूरदूरुन आले होते निस्ता तूले पावासाटी...

मंग आखिरकार तूले बाहेर आणला.. आमी तं तसा तूले पायलून नवतून पर जे लोकं सकारी सकारी पायटलेच जातत ना (अगा डब्बे धरुन नायी गा...!) फिरावले का मनतत त्याले मार्निँग वाक का फार्निँग वाक तं त्यायच्यातल्या एकाले तूजे पाय दिसले होते खरा..! मंग पोलिसायले बोलवला असतील.. मनजे माले तं लागते सनवारच्या रातीच झाला असल तूजा काम तमाम है ना गा? तं पोलिसायना पोते हातरला जमिनीवर अना लोकायले मेन पोलिसाना सांगतलंन (माफ करा भाषेमुळे मान देऊ शकत नाही) "तर बघा तूम्हाला आतापर्यँत इथे थांबवून ठेवण्याचा इंटेन्शन एवढाच आहे कि जर तुमच्यातील कोणी याला ओळखत असेल कि हा कोण आहे, कूठला आहे तर सांगावं व याची ओळख पटावी... तर तुम्ही एक-एक करुन पुढे या, पहा व समोर निघत चला..." त्याच्यापयलेच आमाले फोटोग्राफर ना क्यामेऱ्यात तूही फोटू दाखवलन होतन.. तेबी अलग-अलग पोज मंदली.. तूना बी खिचला नससील तस्या पोज जिता अससील तई..! तरी आमी तूले ससारचा (खरोखर) पावासाटी थांबलेच होतून.. मंग आमी पायलून तूले.. नड्ड्यावर (गळा), पाटीवर ना पोटावर चाकूचे घाव होते, तोँड उघडा होता.. मोठा भयानक दिसत होतास पर आमाले भेव नायी लागला.. मंग कोणातरी ओरखलन ना तूजा असली सरनेम सांगतलन तो मी नाई लिवा या पतरात अना गाव सांगतलन.. अखीन एका मानसाना पुस्टी केलन (पेपर वाचता मून मी बी नक्कल मारुन रायलू पेपरावानी.. ) तं पुस्टी बी नायी समजे; पुस्टी मनजे तो तुच व्हस मून कनफरम गा.. मंग आमी घरी आलून.. त्याच्या बादमंदी पोलिसायना तूजा पोस्टमार्टम केला असतील नायी का..? अना मंग तूले तूया घरी नेऊन सोडला असतील..

तू तं मेलास.. आगीत भस्सम बी झाला अससील.. आमीना तूले पायलून तरी चूपच.. पर आजूबाजूच्या बाया.. ज्या आल्या नायी, गेल्या नायी, पायला नायी तरी त्यायचा चालू-- "कोणा कूत्र्यायना मारला असतील बाई... मानसं नसतील ते... जनावर असतील (हा तं खरी मनला).." पर तू जेती भेटलास तो घर बनतच होता.. वास्तूपूजन बी होवालेच होता ना रावाले बी जावाचेच होते तं या का मनत सांगू-- "कसे रायतील बाई ते.. भेव नायी लागल का? घर बनावच्या पयलेच मुर्द्यायना अपसकून केला.. आता तो (म्हणजे तू) भूत बनून तेती फिरसील.." मी खरी सांगता तूज्या मेल्यापासून कोणी तेती बिनकामानं नायी जाय रातच्याले.. अना असा सिरीफ तूज्याच नायी.. तं कोणी बी मेला मनजे होते.. आता तू बी येतीच रायत होतास तं तूले बी मालूमच असल मना.. नायी असा नायी.. पर मी मनता- "का झाला?" तू का जाणून बूजून थोडी गेलतास तेती मरावले.. खूदहून तूले मारला त्या घरी दूसऱ्यायना.. तसा तं भूत बीत राये नायी.. काऊनका माजा विस्वासच नसे भूतादैतावर.. पर आता तू वरतं गेलास तं तूले मालूम तूले देवाघरी रावाचे आये का भूत बनावचा आये?
पर हो.. जर भूत झालास गिलास तं एकदम माझ्याजवरच नोको येजो नायतं माले पतरं कायले लिवलास मून.. अना तू झोँबजो तं त्यायले ज्यायनं तूले मारला.. आता मालूम चालला का तू मोटा सिदा सादा होतास खरा.. 

तं मी हा पतरं तूले सांगावसाठी लिवून रायलू का माणूस मेल्यावर त्याचा का होते हा अलग मॅटर आहे पर त्याच्याबाऱ्यात त्याच्या संगचेच आमच्यासारके लोकं का सोचतत.. अना हा मालूम असून का एक दिवस सप्पायले जावाचाच आहे तरी!! तं जाऊ दे तो सब सोड आता.. मी सांगता त्या घराले आता दरवाजा लावला.. तूले एकच इनती हाय का जो झाला तो झाला.. बळा गलत झाला तूज्यासंगा पर जाऊ दे आता त्यायची सजा देव त्याले देयल पर तू आता देवाघरी गेलास तं देव बनून राय.. भूत बीत तं रायेच नायी.. हाच सांगावासाठी डॉ. नरेँद्र दाभोळकर सारखा देवमाणूस थकून केला पर हिँमत नायी हारला तं जनावरायना त्यायच्यासारक्या देवमाणसाले बी तूज्याचसारखा मारला.. तूले मालूमच असल पेपरात वाचला अससील तं.. ते आता तेतीच असतील.. तू त्यायले विचार डॉक्टर तूले माज्यावून चांगला समजवून सांगतील भूत-चुडैल च्या बाऱ्यात का हे निर्री अंदश्रद्दा व्हय मून.. अना हो चूकभूल माफ कर.. जेतीबी अससील सुखी राय..

देव तूज्या आत्म्याले शांती लाभू देवो...!


तुआ मेला चेहरा पायनेवाला एक अनोळखी पोरगा

-राजेश डी. हजारे

(लेखक 'अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे' चे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)

आमगाव जि. गोँदिया

लेखन: 20 ऑक्टो. 2013 (रविवार)
शेवटचे अद्ययावत: 19 मे 2019 (रविवार)

  • स्त्रोत:

  1. न लिहिलेली पत्रे-14
  2. न लिहिलेली पत्रे-15
  3. #RDH Sir FB
  4. WhatsApp

Thursday, 17 October 2013

फ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र

दिवस→ 389

अनुदिनी/ब्लॉग→76

1382876_426999214066909_28692608_n.jpg1378742_525340920886123_1163613089_n.jpg
सन्माननीय श्री फ.मुं.शिँदे सर,

काल वृत्त वाचण्यात आले कि आपली '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी निवड झाली.. तात्काळ मी हे वृत्त फेसबुक व ट्विटर वर शेअर केलं... सोबतीला आपला छायाचित्र हवा होता म्हणून गुगल वर शोधून पाहिला आपला नाव तेव्हा चित्रांसोबतच विकीपिडीया वर आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिसली.. तेव्हाच आपणास या निमित्ताने पत्र पाठवण्याचा माणस झाला... सोबतच आपल्या फेसबुक पेजविषयी पण कळलं.. आता तो तुमचाच आहे कि तुमच्या नावाने कोण्या दुसऱ्याच व्यक्तीने बनवून ठेवलाय ते माहित नाही पण कळवा जरुर...

तसं बघितलं तर आपली ओळख मी शाळेत शिकायचो तेव्हापासूनची... म्हणजे हो मला कळतय आपण मला ओळखत नाही.. पण मी आपणास ओळखायला लागलो ते शाळेत असतानापासून.. मला इयत्ता आठवत नाही पण इतकं अवश्य आठवतंय कि आठवी अथवा आठवीपुर्वीच्या मराठी बालभारती च्या पाठ्यक्रमात आम्हाला आपण लिहिलेली प्रसिद्ध 'आई' ही कविता होती... वर्ग आठवत नसल्याने आतापर्यँतच्या (1ली पासून ते अगदी डीटीएड पर्यँत) सर्व मराठी शिक्षकांची नावे आठवत असूनदेखील नेमक्या शिक्षकाचे नाव सांगू शकत नाही.. पण ती कविता शिकवण्यापुर्वी शिक्षकाने सांगितलेला लेखक परिचय व त्यातलेच त्या कवितेचे कवी 'फ.मु.शिँदे' अगदी 'फकीर मुंजाजी शिँदे' या आपल्या पूर्ण नावासह लक्षात आहेत ते आजपर्यँत.. मी शिकलेल्या बऱ्याच कविता विसरल्यात मात्र 'आई' ही कविता आणि तीचे कवी आजही स्मरणात आहेत.. कारण 'आई' हा प्रत्येकासाठी अगदी जवळचा (किँबहुना पहिलाच) शब्द.. आणि आपण काय सोपं व तितकच भावस्पर्शी वर्णन केलं आईचं त्या कवितेत तो ही अगदी साध्या व सोप्या भाषेत..

मी ती कविता शिकत असताना कधी स्वप्नातही विचार वा कल्पना केली नव्हती की मी कधी आपणास पत्र पाठवीन.. या साहित्यिक क्षेत्रात येण्याचं तर कधी स्वप्नातही आलं नव्हतं.. पण योगायोगाने मी या क्षेत्राकडे वळलो तो हि फक्त छंद म्हणून नव्हे तर अगदी 'प्रोफेशन' म्हणून तेसुद्धा तरुण वयात.. मी जाणतो कदाचित या क्षेत्रात पैसा नसेल पण आपल्या लेखनीत ताकत असेल तर एक दिवस तो ही एक दिवस निर्माण होईल याच क्षेत्रातून... आज मी 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' च्या 'गोंदिया जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष' पदावर कार्यरत आहे.. ही हि एक समाजसेवाच आहे... आणि पैसा मिळत नसला तरी या सर्वाँतून मिळणारा मानसिक समाधान खुप मोठा आहे.. मी जाणतो "पैसा खुप काही असला तरी सर्वकाही नाही.." आणि या मानसिक समाधानाची तुलना पैशाची होऊच शकत नाही.. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपणास भेटण्याचा (किँवा प्रत्यक्ष पाहण्याचा) कधी योग येईल.. होय कारण मी पुणे पासून भरपूर लांब (अगदी विरुद्ध टोकावरीलच) गोँदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असून देखील पुणे जिल्ह्यातील 'सासवड' येथे 3, 4 व 5 जानेवारी 2014 रोजी आयोजित '87 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी' येत आहे.. तसे मी या फक्त 20 वर्षाच्या आयुष्यात बरीच छोटी मोठी साहित्यसंमेलने पार पाडली आहेत, पण इतक्या मोठ्या व विशेषत: इतक्या प्रतिष्ठित व मानाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्याची ही माझ्यासाठी पहिलीच संधी असेल... मला निमंत्रण पण मिळालेय.. आणि माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकासाठी स्वाभाविकच ही खुप आनंद व अभिमानास्पद बाब आहे...

असो... आपणाशी बोलण्या व सांगण्यासारखं बरंच काही आहे कारण आपण स्वत:च्या कर्तृत्वाने लेखनीद्वारे व वयानेही खुपच मोठे आहात आणि त्यामुळे आपली किमयाही फारच न्यारी व महतीही खुपच मोठी आहे.. पण पत्राला काही मर्यादा आहेत त्या पाळाव्या लागतील.. आणि आपण आता खुप व्यस्त असाल त्यामुळे पत्र वाचाल कि नाही काय माहिती पण हातात पडल्यास वाचालच ही आशा करतो.. जर पत्र वाचून झाला असेल तर प्रतिक्रीया नक्की द्या पत्राद्वारे... माझा पत्ता व संपर्क क्रमांक माझ्या फेसबुकच्या भिँतीवरुन आपणास मिळूनच जाईल आणि तरीही मी शेवटी नोँदवलाय.. शेवटी साहित्यसंमेलनात आपली प्रत्यक्ष भेट (पाहणे होईलच) 5-10 सेकंदांची का होईना पण त्या व्यस्त कार्यक्रमात भेटही होईल जर अल्लाहची (मी हिँदु आहे) ईच्छा असली तर... काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करावे... आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल हा विश्वास आहे.. आपली लेखनी तडपत राहो हि सदिच्छा व्यक्त करतो...

आणि या पत्राचा समारोप करण्यापुर्वी तुमचीच आई ही कविता (ज्यामुळे मी आपणास ओळखू लागलो) विषय निघालाच आहे तर ती इथे नमूद करतोय..

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं
गाव असतं !
...
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा...
...
घर उजळतं तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायला
कमी पडतं रान !
...
अरे ! आणि आपणास शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या कि... 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन ..!
आपलाच चाहता
एक नवोदित साहित्यिक
rdhautographmar.jpg
राजेश डी. हजारे (RDH)
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
पत्ता-कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
~(गोँदिया जिल्हाध्यक्ष- अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे)

Saturday, 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

BlogPost==> 73rd

Day==> 384

अप्रिय आसाराम...
मी माफीही मागत नाही कि मी तुम्हाला प्रिय प.पु. संत श्री बापू असं म्हटलं नाही.. कारण मी मानतच नाही.. तसं मी यापूर्वीही तुमचा कोणी मोठा भक्त वा समर्थक नव्हतो व आता तर प्रश्नच नाही... कारण जे बहूसंख्य होते ते आता तर थोडेफार राहिले असतील.. व त्यातलेही काही पश्चात्तापच करत असतील..!

पण मी एक खरं सांगू.. ज्यादिवशी तुमच्यावर पहिल्यांदा 'बलात्काराचा' आरोप लावला गेला व जेव्हा प्रसारमाध्यमे (मिडीया) तुम्हाला विनापुरावा पोलिसांच्या चौकशीपुर्वीच धारेवर धरत होती.. त्यांनी तुम्हाला तेव्हाच गुन्हेगार संबोधलं होतं त्यावेळी मीच तुमची बाजू घेत "आसाराम यांची पोलिसांद्वारे चौकशी होऊ द्यावी त्यात गुन्हा सिद्ध झाला तर नंतर मग मिडियाने तुम्हाला गुन्हेगार संबोधावं" असं ट्वीट केलं होतं.. पण ते चूकीचे नव्हते.. जेव्हा तुम्ही पोलिसांसमोर समर्पण करण्याऐवजी इकडे-तिकडे लपत नव-नवे बहाणे बनवत होते ना.. तेव्हाच मलाही पटलं "सच मे जरुर दाल मेँ जरूर कूछ काला हैँ..." आणि नंतर माझंही मत बदललं.. मी स्वत: परत मिडीयाची माफी मागत तेच बरोबर असल्याचं पण नवीन ट्वीटद्वारे कबूल केलं होतं...

आसाराम, तुम्ही स्वत: आश्वासन दिलं होतं कि "सध्या माझे सत्संग सुरु असल्याने 30 तारखेनंतर मी स्वत: समर्पण करून पोलिस चौकशीत मदत करीन.".. पण तुम्ही तर मूदत संपून 2 दिवसांनंतरही इंदौरच्या आश्रमात विश्रांती घेत होतात... मला अचंबा वाटतो की तिथले पोलिस कसे मिडीयाने जोर धरेपर्यँत तूम्हाला अटक करण्यास धजावले नाहीत... शेवटी मानलं तुम्हाला! पण माघार घेणार ते भारतीय पोलिस कसले? डोंबले ना तुरुंगात शेवटी! तुमचा कितीही दबदबा असला तरी...! तुम्ही गुन्हेगार असल्याचं मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा विमानामध्ये तुमचे (विशेषत: महिला) समर्थक 'आजतक' या नॅशनल खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी शिव्यागाळ व मारपीठ सारखे असभ्य वर्तन करत होते आणि तुम्ही दुपट्ट्याने तोँड झाकत होतात... म्हणे 'प्रायव्हसी' चा विचार केला.. मी म्हणतो तुम्ही उत्तर द्यायचं होतं ना... प्रायव्हसी च्या कारणाने कारवाई झाली असती ती केली असती विमान कंपनीने संबंधित वाहिनीवर.. त्याची तुम्हाला काय पडली होती एवढी ?

मी तूम्हाला सन्मानाने 'जी' संबोधतोय याचं कारण एवढंच कि तुम्ही वयाने मोठे आहात.. पण तुम्ही तर दिडशे वर्षे जगण्याची ईच्छा ठेवता म्हणे... हे वाईट नाही हो... पण तुम्हाला कोणत्या पुस्तकात कळलं तर कोण जाणे दिर्घायुष्यासाठीच तुम्ही (अर्शकल्प, आणि अजून कोणकोणते मला 'नॉलेज' नाही) शक्तीवर्धक (अंमली पदार्थ सुद्धा!) औषधी सेवन करुन अल्पवयीन मुलीँचे लैँगिक शोषण करत होतात खरं..! कोणी म्हणतं तुम्हाला लहान मुलीँशी वासनाच्छेचा आजार जडलाय काय नाव त्याचं... मी विसरलोच बघा... मग तर मोठमोठाले ऋषीमुनी कित्येक वर्षे जगले त्या सर्वाँनी तीच पुस्तक वाचली होती काय? वा रे मेरे संत!

माझ्या माहितीनूसार तुमचं खरं नाव आसुमल थाउमल हरपलानी उर्फ आसुमल सिरुमलानी.. जन्म 17 एप्रिल 1941 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या तत्कालीनी ब्रिटीश भारतातील नवाबशाह जिल्ह्यातील विरानी गावात मेहनगीबा (आई) व थाऊमल सिरुमलानी (वडील) च्या घरी.. 'थँक्स गॉड' तुमचा जन्म एक दिवस उशीरा झाला नाही अन्यथा माझ्याही मनात एक सल आयुष्यभर राहिली असती की माझा वाढदिवस कुकर्मी आसारामच्या वाढदिवसी येतो.. ईश्वरानं मला सुदैवानं 18 एप्रिल 1992 रोजी 'भारतरत्न' महर्षी धोँडो केशव कर्वे सारख्या समाजसुधारकाच्या वाढदिवसी या पृथ्वीवर पाठवलं.. तुम्ही पंक्चर दुरुस्तीचे काम करत होतात.. तुमचा मालक जवळच एका संताचे प्रवचन ऐकण्यास जायचा.. कधी मधी तुम्ही पण सोबत जायचे.. मग तुमच्या मनात आलं कि-- हा तर मस्त काम आहे.. काही वेळ प्रवचन करायचं.. मान, सन्मान, प्रसिद्धी मिळते.. अन्  दक्षिणेच्या नावाखाली वारेमाप पैसासुद्धा... सोबतच स्त्री-पुरुष, मुले-मुली, भक्त जमतात.. पाया पडतात.. आशीर्वादाच्या बहाण्याने प्रत्येक वयाच्या स्त्री-पुरुषास स्पर्श करता येतो... तुम्हाला काय पाहिजे होतं अजून... मग काय?? सुरु केला तुम्ही आसुमल चे आसाराम असे नामकरण करत स्वत:च स्वत:ला प.पु.संत आसाराम बापु अशा एक ना अनेक पदव्या घोषित करुण प्रवचनगिरीचा व्यवसाय... खरंतर इथंच चुकलं तुमचं... तुम्ही आपला नाव आशाराम वा 'आसाराम' ऐवजी 'नासाराम' ठेवावयास हवं होतं... पण काहीही म्हणा तुम्हाला तरुण मुलींना आशीर्वाद देण्यात जरा जास्तच रस होता नाही का? खरे संत फक्त डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद देतात; पण तुम्हाला समर्पणाच्या नावाखाली स्वतंत्र खोलीत बोलावून तरुणीँच्या बाह्य व आंतरीक अंगाअंगाला स्पर्श करत आशीर्वाद देण्याचे जरा जास्तच कौशल्य होते.. आणि पिडीत तरुणी बिचारी विरोधात 'ब्र' ही उच्चारु शकत नव्हती..


Source: i.ndtvimg.com

कारण बहुसंख्य समर्थक जे होते तुमची बाजु घेण्यासाठी.. सोबतच अशा कार्यातून तुम्हाला वाचवणारे सहकारी देखील... शिवाय तुम्हाला वाटत असावं कदाचित भोळ्या भाबड्या भक्तांच्या आस्थेचे बाजारीकरण करुन कमावलेल्या वारेमाप संपत्तीच्या बळावर व प्राप्त समर्थकांच्या विरोधाच्या बळावर करत राहू तरुण वयातील कोवळ्या मुलीँवर लैँगिक अत्याचार आणि वाचून जाऊ भारताच्या कायद्यापासून... पण ते कदापि शक्य नाही... आणि आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर येताहेत भुतपूर्व पिडीत मुली एकेक करुण पुढे तुमच्या विरोधात खटले दाखल करण्यासाठी...

आता तर तुमच्या विषयी फक्त प्राथमिक माहिती पुढे आलीय.. ये तो अभी ट्रेलर है मेरे आसा.. अब तो पुरी पिक्चर बाकी है... आता जेव्हा मी तुमच्या विरोधात इतर विविध पोलिस ठाण्यात पिडीतांद्वारे एफआयआर नोँद होताना पाहतो व तुमच्या आश्रमातीलच तुमच्याच भुतपूर्व सहयोग्यांचे तुमच्याचविरोधात मते व आश्रमासंबंधी वादग्रस्त प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रतिक्रीया ऐकतो तेव्हा मला वाटतं कि किती भोळे आहेत आमच्या भारतातील भक्त! आणि कसे फसवत होतात तुम्ही भाबड्या भक्तांना... अन् आम्हीही कसं विश्वास ठेवतो तुमच्यासारख्या स्वघोषित संतांवर स्वत:च्या बंद डोळ्यांनी... तुमच्यासारख्या ढोँगी बाबांची सत्यता कळल्यावर मी देवाला प्रार्थनाच करु शकतो की एक दिवस असा न येवो की जे खरंच स्वत:ला संत म्हणून फक्त म्हणवूनच घेत नाही तर वास्तविक वैयक्तिक जीवनात आचरणही करतात संतांसारखाच अशांवरचा विश्वास व श्रद्धेला कलंक लागू न देवो रे बाबा !! अन्यथा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत गोराकुंभार, संत सैय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा, संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बाबा, ईश्वरतूल्य संत साईबाबा, संत गजानन महाराज, विसाव्या शतकातील प्रबोधनकार राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज या व अशा कितीतरी तसेच ज्यांनी अखिल मानवजातीस ईश्वर दगडांच्या मंदिरात नसून माणसात आहे ही ग्राम स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबतच बहुमूल्य शिकवण दिली त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या महाराष्ट्र व भारत देशातील हिँदूंच्या धार्मिक अस्मितेला कदापि काळीमा फासला जाऊ नये; आणि कलंकाचा डाग तर सोडा पण छोटासा छिट्टा सुद्धा उडवला जाऊ नये...

अप्रिय आसाराम.. तुम्ही तर कलंकित झालातच पण आपल्या या दुष्कृत्यात मुलगा नारायण प्रेम साई सिरुमलानी ला सुद्धा सामाऊन घेतलंत... असा कोणता बाप असेल जो कुकर्मात स्वत:च्या मुलाला सामाऊन घेईल.. आणि असंच करायचं होतं तर का दिलं त्या बलात्कारी पोराला ईश्वरतूल्य साई बाबा चं पवित्र नाव... सुरत ठाण्यात दोन सख्ख्या बहिणीँनी त्याच्याविरुद्धही लैँगिक अत्याचाराचा खटला नोँदवलाय.. हे तर काहिच नाही.. या सर्व खेळात संपूर्ण कुटूंबच सहभागी आहे खरं तुमचा... अर्थात तुमची पत्नी लक्ष्मीदेवी व मुलगी भारतीदेवी सुद्धा... फक्त नावासमोर देवी लावल्यानं कोणी साक्षात देवी बनून जात नाही.. आता तर तुमचा अवघा परिवारच अदृश्य आहे खरं... ते सर्व गायब आहेत... तुम्हीच जाणोत कुठं असतील ते... कारण आपण तर 'साक्षात परमेश्वराचेच अवतार' आहात ना !!! माहित असेल तर सांगून द्या कुठे लपून बसलेत ते... सुरत पोलिस मागावर आहेत त्यांच्याही.. मला तर नारायण साईवर पुर्वीपासुनच संशय होता... जेव्हापासून एका पहाडी जंगलातील त्याच्या गुप्त गुफेबद्दल 'इंडिया टीव्ही' या अजून एका प्रसिद्ध राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिलं व ऐकलं तेव्हापासूनच... नुकतच ऐकायला मिळालं कि तुमचा मुलगा हि उठून सुटून निरर्थक बहाणेबाजी करतोय याचिकाकर्त्याँविरुद्ध.. आणि करु लागलाय खरं जाहिरात स्वत: निर्दोष असल्याची स्थानिक वृत्तपत्रांमधून.. पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा.. एक म्हण आहे बघा आमच्यात "मंदीराची इमारत मजबूत असण्यासाठी सर्वप्रथम त्याचा पाया मजबूत असावा लागतो.." आणि इथे तर मंदिराचा पाया अर्थात परिवाराचा मुखिया म्हणजे तुम्हीच कलंकित असल्यावर मंदिर म्हणजे तुमच्या परिवारातील इतर सदस्यांवर या कलंकाचा एक छिट्टा उडाला नसेल हे शक्यच कसे आहे? आणि जर तुमचा परिवार आहे निर्दोष खरोखरच तर येत का नाही समोर सुरत पोलिसांच्या..? का करावं लागतंय पोलिसांना त्याचा शोध ठिकठिकाणी 6 टिम बनवून...?

असो... मी बरंच बोललो या पत्राच्या माध्यमातून.. मी ना तुमचा समर्थक ना विरोधक! मला काय आवश्यकता होती एवढं लिहिण्याची कोण जाणे.. पण एकमात्र नक्की! माझे शब्द तुम्हाला टोचले कि नाही माहित नाही कारण तुम्ही ठरले ते शेवटी 'बेशरम'च! पण तुमच्या आताही असलेल्या समर्थकांना निश्चितच टोचले असतील माझे शब्द... मला जाणीव आहे त्याची... कारण जसे आज तुमचे विरोधक तूमचे समर्थन करणारे वक्तव्य ऐकू शकत नाही तसंच तूमचे आजही टिकून असलेले समर्थक सुद्धा आपल्या 'परमात्म्याविरुद्ध' काही ऐकू ईच्छिणार नाही मी जाणतो... पण त्यांच्यावर जरा जास्तच प्रभाव दिसतो आपला... किमान त्यांचा तरी विचार करावयास हवा होता तोँड काळा करण्यापूर्वी.. इतकं सगळं होऊनही व नवनवे कटू सत्य बाहेर येणं सूरुच असूनदेखील त्यांचा अद्यापही तूमच्यावरचा विश्वास टिकून आहे... मी तूमची माफी कदापि मागणार नाही पण माफी मागतो त्या सर्व समर्थकांची... माझा उद्देश त्यांच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. पण हेच कटु सत्य आहे.. मी जाणतो हे थोडं कठिण आहे पण एक दिवस त्यांनाही जाणीव होईल वस्तुस्थितीची कि तुम्ही कोणी 'संत' वगैरे नसून फक्त 'बलात्कारी बाबा' आहात... होय पैशाचा हव्यासु, किशोरवयीन मुलीँशी शरीरसुख मिळवण्यासाठी वासनेच्छा तृप्त करण्यासाठी टपूनच असलेला एक बिमार वृद्ध राक्षस! निव्वळ एक पाखंडी!! मला हे कळत नाही कि एकीकडे अवघा संत समाज तुम्हाला संत बिरादरीत नाकारत असताना अ.भा. संत महासभेचे/अखाडा परिषद चे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज का घेत आहेत तुमची बाजू?? खाजगी वृत्तवाहिन्यांवर आयोजित परिसंवादात का देताहेत ते वादग्रस्त विधाने व का जोडतात संबंध तुमच्या कूकर्मांचा साधारण परंतू संवेदनशील घटनांशी? तुमची साठगाठ तर नाही ना? अन्यथा असेल भिती त्यांना कि एका पापी संतामुळे उडून जाईल जनतेचा विश्वास संत समाजावरुन-- पण हे कदापि शक्य नाही.. संतांवरचा आमचा विश्वास व श्रद्धा अढळ आहे.. ती कमी होणार नाही.. पण एक मात्र नक्की! आता करु लागतील किमान काहितरी सुजाण भक्त चौकसबुद्धीने विचार संतांना संत मानण्यापूर्वी एकदातरी... आणि आता अपेक्षाही आहे सुजाण भक्तांकडून ती एवढ्याचीच...


तुमचा ना समर्थक ना विरोधक
एक चौकसबुद्धीचा आस्तिक

-राजेश डी. हजारे (RDH Sir)
-12/10/2013, आमगाव
(पत्र लेखक अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे चे गोंदिया जिल्हाध्यक्ष आहेत. )

  • ता. क.: 25 एप्रिल 2018 रोजी आसाराम ला बलात्काराच्या आरोपात दोषी मानत जोधपुर न्यायालयाने आजीवन कारावास चा दंड सुनावला आहे. 


  • पुर्वप्रसिद्धी:
 

Thursday, 3 October 2013

जुमदेवबाबास पत्र

...सुरुवातीपासून वाचा

तसं मी 'परमात्मा एक' या मार्गाचा सेवक नाही पण या मार्गाच्या सेवकांशी माझा संपर्क येऊन गेला (त्या दिवशी तर विशेषत्वाने) आणि भविष्यात येणारच.. पण मी हिँदु धर्मीय असलो तरी माझ्यावर ईस्लामचा बराच प्रभाव आहे.. त्यामुळे साहजिकच मी 'परमात्मा एक' या एकमेव सत्याचा (मार्गाचा नसलो तरी) अनुयायी आहे... आपणास माहित असेलच रामटेक येथे तुमचा खुप मोठा (आश्रम/मंदिर/देऊळ/मठ/आणखी काही नेमकं काय म्हणतात माहित नाही) पण आहे..आणि जवळच 'हजरत बाबा सैय्यद गंजुशाह रहमतुल्लाह अलैह' यांचा दर्गासुद्धा.. मी दर्ग्यात जात असताना बहुतेक वेळा तुमच्याकडे येवुन नतमस्तक व्हायचो.. 'परमात्मा एक' सेवकांसाठी हे योग्य असले तरी मी मानत असलेल्या ईस्लाम मध्ये एकमेव 'अल्लाह' व्यतीरिक्त कुणापुढेही नतमस्तक होणं नियमात बसत नाही पण काय करणार..? शेवटी मी जन्मलो व वावरतो तर हिँदू म्हणूनच ना!

असो.. 3 एप्रिल व 3 ऑक्टोबर ला दरवर्षी तुमच्या जयंती व पुण्यतीथीनिमित्त वर्धमान नगर नागपूर नागपूर व मौदा येथे 'परमात्मा एक' सेवकांचा बराच मोठा कार्यक्रम असतो खरं... शक्य झालं व कधी योग आला तर तिथेही येईन भविष्यात पण प्रॉमिस नाही करत..

असो... काही चुक-भूल झाली असेल तर क्षमा मागतो.. असंही 'क्षमा' हा तुमच्या व तुमच्या सेवकांचा महत्त्वाचा गुण आहेच.. शेवटी तुमच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हास पाठवत असलेल्या या पत्राला नुकतीच प्रकाशित तुमचीच टपाल तिकीट जोडलीय..

आशीर्वाद व कृपा असावी..
मार्गाचा नसलो तरी एक सेवक
राजेश डी. हजारे
jumdev30092013.jpg
-आमगाव
(03 ऑक्टो. 2013, गुरुवार)

जुमदेवबाबास पत्र

दिवस---> 375वा

अनुदिनी/ब्लॉग---> 70वा

प.पु. महानत्यागी श्री जुमदेवजी बाबा,
आज 3 ऑक्टोबर 2013.. आपली पुण्यतिथी.. त्या स्मृतीप्रित्यर्थ माझं आपणास नमन... तसं पाहिलं तर काही आपणास पत्र पाठवण्याचा बेत नव्हताच.. परंतु नेरवाच्या दिवसी 30 सप्टेँबर 2013 रोज सोमवारला गोँदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात (MIET) तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ डाक तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.. मी तसं उपस्थित राहणार नव्हतोच म्हणा पण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर VVIP राजकीय नेते राहणार होतो.. आणि असणार का नाही म्हणा..! जिल्ह्याचे खासदार ना. प्रफुल पटेल सारखे दमदार नेते केँद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री असल्यावर..

तर नियोजनाप्रमाणे मी सकाळी गोँदियाच्या एन.एम.डी. महाविद्यालयात गेलो..तसं माझं तिथे वैयक्तिक काम होतं.. पण तुम्हाला सांगू का हा तुमच्या तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम प्रारंभी याच परिसरात डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये होता.. या कार्यक्रमामुळे तेथुन कोणत्या तरी परिक्षेचं केँद्र रद्द करण्यात आलं खरं.. कार्यक्रमाचा मंच उभारणार तोच जागा मर्यादित असल्याच्या कारणाने कार्यक्रमाचे स्थान MIET त स्थलांतरीत करण्यात आल्याचं कळलं.. मला तर नवलच वाटलं बुवा! बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार? असंच मला वाटलं होतं पण---

मी गोँदियात पोचल्यापासूनच कितीतरी 'परमात्मा एक' सेवकांचे जत्थेचे जत्थे पायदळी कार्यक्रमस्थळी जाताना दिसत होते.. मी हि निघालो एनएमडी तून आणि थोड्याच अंतरावर एका प्रौढ व्यक्नीने हात दाखवला.. त्यांना मी दुचाकीवर लिफ्ट दिली.. त्यांनाही तुमच्याच कार्यक्रमास जायचं होतं व योगायोगाने मला पण.. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणाने शहरातील ऑटो रिक्षा बंद असावेत बहुतेक..! MIET त पोहोचताच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.. अहो खरंच..माझा अंदाज फोल ठरला होता.. जिकडे तिकडे वाहने व माणसांव्यतीरिक्त काहीच दिसत नव्हते..

कार्यक्रम नुकताच सुरु झालेला.. मंचावर उपस्थित केँद्रात मंत्री असलेल्या बऱ्याच मंत्र्यांची भाषणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. प्रफूल पटेल यांचे भाषण झालेले.. अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के. शंकरनारायणन यांनी भाषण दिले ज्यात आपल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.. व भारत सरकारद्वारा प्रसिद्ध तुमच्या डाक तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती मा. ना. डॉ. श्री मो. हामिद अन्सारी यांच्या हस्ते झाले.. भारताच्या उपराष्ट्रपतीँनी आपल्या भाषणात वारंवार प्रफूल पटेलांचे कार्य, गोँदिया जिल्ह्याचा विकास इ. बाबीँचा आवर्जून उल्लेख केला.. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...

1374762_163783340487404_638683112_n.jpgjumdevstamprelease.jpgjoomdev.jpg

माझ्या नजरेत आपली ओळख 'परमात्मा एक' चे संस्थापक (जुमदेवजी ठुब्रिकर) इतकीच होती पण ती या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने कळली.. कार्यक्रमासाठी लावलेल्या हजारो खुर्च्या सेवकांनी गच्च भरल्या होत्या आणि त्याच्याही दुप्पट सेवक दोन्ही बाजुला शांतपणे उभे होते.. जितपर्यँत नजर जाईल तिथपर्यँत डोळ्यांना आपल्या सेवकांचेच दर्शन होत होते.. आणि कार्यक्रम संपल्यानंतरही हजार-दोन हजार सेवकांचे येणे सुरुच होते.. मी ज्यांना लिफ्ट दिली होती ते संजय वानखेडे सुद्धा 'परमात्मा एक' सेवक असून ते स्वत: चंद्रपूर हून आलेले होते.. हिँगना, नागपूर सारखे सबंध महाराष्ट्र व कदाचित आंतरराज्यातुनही आलेल्या आपल्या मार्गाच्या सेवकांनी MIET चे प्रांगण अगदी तुडुंब भरले होते.. काटोल हून तर अवघी बसची बसच बुक करुन आलेली होती.. मला नंतर तुमच्या सेवकांकडून कळलं कि 'परमात्मा एक' चा कार्यक्रम कुठेही असो सेवकांना कळल्यास जातातच.. ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने.. अल्पोहाराची आयोजकांकडून व्यवस्था असुनदेखील सेवक स्वत: आणलेले डबे, अल्पोहार अथवा स्वखर्चाने नाश्ता खरेदी करुन शांतपणे ग्रहण करत होते...

home-page-logo.png
home-page-logo2.png

माझ्या मनात 'परमात्मा एक' म्हणजे घराच्या दाराला लावलेली "दारु पिऊन आत येण्यास मनाई आहे." ही पाटी हि एकच ओळख होती.. पण नेरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण जीवनभर महानत्याग करुन अंधश्रद्धा विरोधी व व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल जाणुन घेता आले.. जसे 3 शब्द, 4 तत्त्व, 5 नियम.. कच्चे सेवक, पक्के सेवक.. हातावर पर्वत घेऊन उडत्या हनुमानाचेच प्रतिक म्हणून स्विकार, जात-धर्म कसलाही भेद न करता मानवतावादाचा पुरस्कार.. वगैरे वगैरे.. आणि बरंच काही...

पुढे वाचा→ readmore.png

Wednesday, 2 October 2013

नोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)

374वा→ दिवस

069वी→ अनुदिनी

002री→ वाचकाची अनुदिनी

नमस्कार..!
आज माझ्या या ब्लॉगिँग वेबसाईटने 50,000 वाचक भेटी पुर्ण केल्यात.. ब्लॉग च्या 374व्या दिवशी आणि ते ही 02 ऑक्टोबर 2013 म्हणजे महात्मा गांधी यांच्या 144व्या जयंतीच्या दिवशी आपण हा टप्पा पुर्ण केला त्याबद्दल या ब्लॉगच्या वाचकांचे अभिनंदन आणि धन्यवाद..!

'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर युवा साहित्यिका स्वाती ठुबे - खोडदे यांनी एक पत्र पाठवले होते नोकरी करणा-या महिलेची व्यथा... या पत्राने फेसबुक विश्वात बरेच विक्रम केले व याला खुप प्रसिद्धीही मिळाली. त्यासंबंधी दैनिक 'लोकमत' मध्ये सोमवार दि. 30 सप्टेँबर 2013 रोजी अभिनंदनपर वृत्तही छापून आले.. स्वाती ठुबे यांच्या सहमतीने सदर पत्र मी खाली देत आहे...

1278056_531460616933644_1132553930_o.jpg

1.नोकरी करणा-या महिलेची व्यथा

काल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले, नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे.

1234719_155351857997219_759671131_n.jpg प्रिय सखी
“नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे” हे मी काल ऐकले होते. मला त्या वेळेस बोलावसं वाटलं होतं, तुम्ही खुपजणी होतात आणि मी एकटीच होते, आधीच खुप उशिर झाला होता, त्यात माझ्या पिल्लांचे दोन फोन येऊन गेलते. मला घराची ओढ होती म्हणून नाही थांबले मी.

सखी आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय? आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करतो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांचे बोलणे खावे लागतात, घरचे टेन्शन, ऑफीसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामीक टेन्शनखाली वावरत असतो आम्ही.

नोकरीवाली असले तरी मी ही एक आईच आहे. नऊ महिने पुर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवुन बाळाचे स्वप्न पहात मी प्रवास केला. तुमच्या सारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. तीन महीन्याचे बाळ घरी सोडुन जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप फुटायचा तेव्हा काळजाच पाणी पाणी व्हायचं. वाटायच पळत सुटावं आणि पिलाला कुशित घेवुन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दुर ठेवावं लागलं.

आम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणुन आम्हाला गर्वीष्ट समजता पण तसे नाही आम्हाला वेळच नाही. अग, सखी घरी आल्यावर कधी काम आवरुन झोपेल असं होतं गं. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफीसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात.

तुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. चार घास खाऊ घालण्याइतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात, तेव्हा तापलेल्या लेकराला सोडुन जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार.

आमचे सगळे सण ऑफीसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पहातो तेव्हा तुम्ही नटुन थटुन चालले असतात. तेव्हा खुप चिडचिड होते. आमच्या कपडयांकडे तुम्ही पहात असता. आमच्या चांगल्या रहाण्याला शुध्द बोलण्याला आमच्या साध्या चपलांना तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपुन घेता तर आमच्या रोजच्या प्रवासाचे काय? काय मजा करतो आम्ही?

उठल्यापासुन झोपे पर्यंत घडयाळाच्या काटयावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडुन आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करुन घेतात तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मजाच मारतो हा गप्पांचा विषय का होतो सखी?

तुमचीच
एक नोकरी करणारी सखी
लेखिका : स्वाती ठुबे - खोडदे

Monday, 23 September 2013

22 सप्टेँबर - ताईस पत्र

हाच ब्लॉग सुरुवातीपासून वाचा

त्या दिवशी मला बोलावून तासभर संवाद साधण्यामागे तुझा हेतू काय होता ते तर मला कळलं नाही.. पण मी तूला एक सांगू ईच्छितो ताई.. आज आपण जरी स्वगावी राहत असलो, आपल्यात बराच अंतर असला.. व त्या सुखद दिवसानंतर 2 वर्ष लोटलेत.. तुला कदाचित वाटत असेल कि तूझा न मानलेला भाऊ तूला विसरला.. पण नाही ताई.. याचा पुरावा हा पत्र आहे.. आपल्यात संपर्क नाही याचा अर्थ असा नाही ताई कि मी तुला विसरलोय वा तुझा नंबर माझ्याकडे नाही.. तो आहे पण भिती वाटते आजही तुझी आणि नाही करत फोन कितीही आठवण येत असली तरी कारण उगाचच होऊ नये त्रास तुला माझ्यामुळे म्हणून.. कारण काळजी आहे मला माझ्या ताईची.. मला नाही आवडणार तुला एका मुलाचा फोन आल्याचे घरच्यांना कळल्यास त्यांनी तुला काही प्रश्न केलेलं.. तो ही तुझा दोष नसताना.. म्हणून आजही पुर्वीप्रमाणेच तुझ्या छायाचित्रांशीच बोलतो वा बोलतो तुझी कल्पना करुन स्वत:च स्वत:शी एकांतात वा लिहित असतो तुला पत्रे माझ्या दैनंदिनीत व वाचत बसतो एकटाच वेळ मिळेल तेव्हा.. मला माहितीये ताई हा पत्र प्रसिद्ध होत असल्याने वाचकवर्ग हसेल माझ्यावर.. म्हणतील असलाही काय वेडेपणा!! कारण त्यांना बहिण असेल.. आणि नसलीही तर उणीव भासत नसेल बहिणीची.. पण मला किँमत कळतेय बहिण नसल्याची.. आणि म्हणूनच आजच्या वर्गमैत्रिणीँशी प्रेमाचे सोँग करणा-यांच्या युगात व वातावरणात मी मानलं तूझ्या रुपात माझ्या वर्गमैत्रिणीला मोठी बहिण.. तो ही जात-पात, धर्म, वय सर्व बाबींना अलिप्त ठेवून.. कारण या बाबी पवित्र नात्याच्या आड येवू शकत नाहीत.. आणि तुला सांगू ईच्छितो ताई आता मी पण (हिँदू असून) तुम्हा मुस्लिम बंधु-भगिणीँचा पवित्र धर्मग्रंथ 'कुरआन' वाचतोय.. तो ही जीवाभावापासून..! काय झालं तु मला भाऊ मानलं नाही? मी कधी तुला भाऊ मानच म्हणून बळजबरी केली नाही वा त्रास दिला नाही.. बस् घुटमळत बसतो एकटाच.. मी जाणतो ताई जरी तु मला भाऊ मानत नसली तरी कुठे ना कुठे असेलच जागा या भावासाठी तुझ्या हृदयात.. अन्यथा कशाला लिहिलं असतं तु टोपणनाव "तुमची ताई" म्हणून माझ्या स्लॅम मध्ये?

ताई, त्या दिवशी मला तु भाऊ मानलं नाही पण आश्वासन दिलं होतं कि "वाटल्यास जमलंच तर... लग्नाला बोलवूऽऽऽ..." मी आठवण करुन देतोय ताई किमान एवढं तरी करशील माझ्यासाठी.. "ताईचं प्रेम नाही तर ना सही पण तीचा 'निकाह' तरी या दुर्दैवी भावाला नसीब होऊ दे... तुला माझी शप्पथ." तु तर मला नि:संकोच बोलण्याची संधी दिली होतीस गं.. पण त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते; होते ते फक्त अश्रू! तुझ्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला भरपूर काही आठवत होऊ बोलण्यासारखं पण वेळ निघून गेली होती.. आता आजही खंत आहे मनात तु संधी देऊनपण मी मनसोक्त बोलू शकलो नाही.. मला भरपूर बोलायचं होतं.. 2 वर्ष रडत असताना जे थोडेफार आनंदाश्रू साठवले होते याच सुखद दिवसासाठी ते तरळतसुद्धा होते.. ती अश्रूसरिता मला ताईच्या खांद्यावर लहान भावाच्या नात्यानं डोकं ठेवून मनसोक्त रडत मोकळी करायची होती.. तुझ्यापुढे कानशील पुढे करत बहिणीच्या हातच्या 2 चपराक खायच्या होत्या मी केलेल्या क्षुल्लक चुकांसाठी.. आई-वडील व ईश्वरानंतर ज्या व्यक्तीचे छायाचित्रात पाया पडत होतो त्या साक्षात मोठ्या ताईचे चरणस्पर्श करायचे होते पण सर्व ईच्छा अपु-याच राहिल्या..

त्या दिवशी तु मला उपवास असल्याने चम्मचभर साखर व पाणी प्यायला दिलं होतं.. आजही त्या साखरेचा गोडवा प्रसाद व पाण्याची चव अमृत म्हणून जीभेवर आहे.. दुस-या दिवशी जाण्याचे नियोजन असतानाही तु मित्राचा वाढदिवस आटपून काही कारणास्तव त्याच रात्री स्वगावी परतलीस ती कायमचीच.. मला तु परतल्याचे तुझ्या-माझ्या मैत्रिणीकडून फोनवर कळलं.. आणि मी साठवून ठेवली ती मी पाहिलेली माझ्या ताईची शेवटची झलक.. तु रुमच्या रस्त्याकडे इंटरनेट कॅफे जवळून मैत्रिणीँसह वळत होतीस... अगं ताई हो त्याच मैत्रिणीचा आज वाढदिवस.. शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता कळलं की तुला प्राथमिक शिक्षिकेची स्वगावीच कायमस्वरुपी नोकरी लागलीय.. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन ताई... तत्पूर्वी मी रामटेकच्या दर्ग्यामध्ये जाऊन तुझ्यासाठी दुवा मागुन आलो होतो.. त्या रात्री शांत झोप यावी म्हणून मित्राला बोलावलं होतं.. ज्या नात्याची माझ्या काही मित्रमैत्रिणीँनी अवहेलना केली त्यातच काहीँनी खंबीरपणे आधारही दिला.. विशेषत: माझी बेस्ट फ्रेँड-तु जाणतेसच.. तरी त्या दिवशी झोपेपर्यँत 23 तारखेच्या पहाटेचे साडेचार झाले होते.. तु मला त्या भागात आल्यास नि:संकोच घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतंस.. मी प्रयत्न करीन ताई पण हिँमत होईल माझी येण्याची??

23 तारखेला आदल्या दिवसाच्या सर्व आठवणी आठवत होत्या.. आणि तु मात्र गावी पोचलेली असशील.. मी सर्वप्रथम दार बंद करुन एकटाच हाथ-पाय आपटत ओरडत रडलो मात्र माझं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं.. होत्या फक्त चार भिँती! त्या दिवशी अगदी वेड्यापिस्यासारखा रडलो मात्र तु परतणार थोडीच होतीस.. त्या रडण्याचं मी शब्दात वर्णन करुच शकत नाही.. नंतर मन हलकं झाल्यावर तुझ्या मैत्रिँणीची स्लॅम परतवण्यासाठी त्याच खोलीकडे पण यावेळी करमत नव्हतं.. मी आमगावी परतलो.. नंतर आपली भेट कधीच झाली नाही त्याला आज दोन वर्ष लोटलेत...

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

22 सप्टेँबर - ताईस पत्र

ब्लॉग- 64 वा

दिवस- 365 वा

प्रिय ताई,
अस्सलाम-व-अलैकुम..!

पत्राची सुरुवात कशी करावी ते ही कळत नाहिये.. याचा अर्थ मला पत्र लिहीता येत नाही असा नाही गं.. माझ्या दैनंदिनी वह्या उघडून बघितल्यास तुला पण प्रचिती येईल त्याची.. बरीच पत्रे लिहिलीत व आताही लिहितोय तुला माझ्या दैनंदिनीत आणि कालांतराने वाचत बसतो एकटाच... तुझ्याशी बोलू शकत नाही ना म्हणून.. पण यावेळी मनात जरा भितीच आहे बघ कारण पहिल्यांदाच मी प्रसिद्ध करतोय ना तुला पाठवत असलेला पत्र यावेळी... "माझी ताई:एक आठवण" ही तुझ्यावर लिहिलेली कादंबरी (जणू पत्रमालिकाच) पण प्रसिद्ध करणार होतो मी 'न लिहिलेली पत्रे' मध्ये पण नाही पाठवू शकत ते काही कारणांनी तेथे.. आणि हा पत्र म्हणजे काही त्या पुस्तकातील भाग नाहीच...

मला माहितीये ताई तु इंटरनेट वापरत नाही ते.. पण कोण जाणे हृदयाच्या एखाद्या कोप-यातून तू पण हे दुर्दैवी भावाचं पत्र वाचत असशील...!! ताई वाचतीयेस ना..???

524640_466021460180428_1119230898_a.jpg

काल 22 सप्टेँबर 2013.. अगं 22 सप्टेँबर.. काही आठवतंय? तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं? होय ताई मी 22 सप्टेंबर 2011 च्याच त्या जेमतेम 1 तासाच्या अविस्मरणीय संवादाबद्दल लिहीतोय.. मागल्या वर्षी या दिवसाची आठवण म्हणूनच मी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता.. योगायोगाने आज माझ्या ब्लॉग चा पण पहिला वाढदिवस साजरा होतोय या पत्रासह... आणि आता या पत्राद्वारे मी त्या सुखद आठवणींनाच उजाळा देतोय...

तू बोलावल्याप्रमाणेच मी कादंबरी घेऊन तुझ्या रुमवर आलो व तुझ्या दर्शनासाठी आसूसलेला मी तु दिसताच माघारी फिरलो... रुमवर प्रवेशानंतर ताई मी चक्क 601 दिवसांनंतर आपलं बोलणं होणार असल्याने आणि तू स्वत: बोलावल्याने आनंदी जितका होतो तितकाच तू काय बोलशील या विचाराने मनातून घाबरलेलाही होतो... मला त्या भेटीचं क्षण न् क्षण व एकेक प्रसंग जसाचा तसा आठवतोय आजही..! काश् मी चित्रकार असतो तर तो चित्र अगदी तसाच रंगवला असता पण ईश्वरानं माझ्याऐवजी माझ्या लहान भावाला चित्रकला व अल्लाहनं मला लेखनकला दिली... काय झालं मी चित्रकार नसलो तरी स्वत:च्या लेखनीने कुठलीही अतीशयोक्ती न करता ते चित्र रेखाटू शकतो... तुझ्या मैत्रिणीँचा अवघा गृप माझ्या भोवती जमला होता.. आणि मी मुलगा असून तुम्हा 6-7 मुलीँमध्ये मुलीसारखा लाजत होतो...

तु एकदम आलीस आणि केला प्रश्न मला "सांगा काय आहे तुमची शेवटची ईच्छा..?" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं..! मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं..! मी तुझ्यासाठी मैत्रिणीँमार्फत चॉक्लेट पाठवायचो त्याला तु विनोदाने 'रिश्वत' ची उपमा दिलीस.. पण कोण भाऊ बहिणीला रिश्वत देईल गं??

ताई मला माहित नव्हतं कि माझ्या भावना व्यक्त करणं तुला आवडत नव्हतं ते.. पण मी तुला राग यावा म्हणून नव्हे गं ताई तर तुझे गैरसमज दुर होऊन सत्यता कळावी म्हणून मी वेगवेगळे नवनवे मार्ग शोधत होतो पण तुला कधी त्रास द्यावा असा विचार पण मनात आला नाही.. आणि भविष्यात सुद्धा माझ्याद्वारे मी असं कोणतंही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझ्या बहिणीला मी तीला बहिण माणल्याचं शल्य होईल... तुला आठवते माझी सही? आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं! होय 'माझं जीवन आणि माझी ताई' आता एक समिकरणच' झालंय..

ताई तु मला "माझी ताई:एक आठवण" पुस्तकरुपात प्रकाशित न करण्याची विनंती केलीस आणि मी दिलंही वचन क्षणाचा विलंब न करता.. ताइ विश्वास ठेव नाही मोडणार मी ते वचन.. अगं ज्या बहिणीच्या एका अप्रत्यक्ष ईच्छेनुसार मी बोलणं थांबवलं.. स्वत: रडत ज्या बहिणीसाठी कादंबरी लिहिली ती प्रकाशित करुन त्याच बहिणीला त्रास देईल का? किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात..! माझी ईच्छा होती ती पुस्तक तु वाचावीस ते तु वाचलं खरं.. त्यानंतर त्यात मी फक्त एकच लेख वाढवला तो ही याच संस्मरणीय भेटीवर "जाता-जाता गोड शेवट..." पण हो ताई मी माझ्या त्या साहित्यकृतीचा अपमान नाही करु शकत ती पुस्तक अप्रकाशित ठेवून.. पण तरीही मी तुला दिलेल्या शब्दाला तडा जावू देणार नाही हा विश्वास ठेव... मी सर्व कादंबरीचे स्वरुप पालटून फक्त त्या कथेचा आशय एका वेगळ्या स्वरुपात वेगळ्या शिर्षकासह माझ्या वाचकांसाठी प्रकाशित करीन... जेणेकरुन सर्वप्रथम तुला दिलेला वचनही पाळला जाईल व मला कवीचे लेखक बनवणारी त्या पुस्तकाची सत्यकथा ही जीवंत राहील माझ्या वाचकांसाठी

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png