Thursday 26 December 2013

College (कॉलेज)चे नियम कठोर पण पाळण्यासारखे

अनुदिनी 91वी

दिवस 459वा

पत्रमालिका- मनातल्या मनात (पत्र 1)

राजूची रोजनिशी-1.कादंबरी (पत्र 1)

1.कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे

राजेश,
तुझे कालचे पत्र मिळाले. (माफ कर तु मला लेक म्हटलस तसंच प्रेम केलंस तरी मी तुला एकेरी संबोधतेय.. कारण मी तुझी मैत्रीणपण आहे ना..) आणि तु विचारलं होतं ना कि "आजवर मी तुला सांगितलेलं तु पत्राने मला पाठवणार का?" त्याला मी उत्तर देतेय- हो! आता अजून कशाला वेळ दवडायचा. तू माझं काल 25 डिसेँबर 2013 रोजी नाताळच्या शुभपर्वावर माझं केलेलं 'कादंबरी' हे नामकरण मला आवडलं. नाहितरी तु तुझी पहिली कादंबरी (सॉरी बाबा.. आत्मकथनपर पुस्तक.. बस् झालं!) "माझी ताई : एक आठवण" मला विचारुनच तर लिहिली.. पण मला तुला एक सुचवावेसे वाटते.. 'मनातल्या मनात' या नावासोबतच आपल्या या संवादाला 'राजूची रोजनिशी/डायरी' असं पण संबोधत जा कधी-कधी.. हे नाव तुझ्या परवाच्या पत्रातील 'रोजा/रोजी ची रोजनिशी' शी सुद्धा बरेच साम्यदर्शक वाटते नाही..

तर आता तुला घेऊन जातेय तुझ्या आठवणीत आणि सांगते तु जेव्हा मला पहिले पत्र पाठवले होते तेव्हा काय सांगितलं होतं.

नागपुर जिल्ह्यातील प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन रामटेक येथील ती तुझी डीटीएडच्या पहिल्याच दिवसाची रात्र होती.. दिवाळीला 15 ते 20 दिवस बाकी होते.. भर हिवाळ्याच्या दिवसात तुझ्या खोलीमध्ये ओल येत होती.. अन् तु मला तुझ्या "कॉलेजचे नियम कठोर पण पाळण्यासारखे" असल्याचे सांगत होतास.. त्यादिवशी तु काय सांगितलं ते खाली तुझ्याच शब्दात लिहिते..

"मी राजेश दशरथ हजारे. आज दि. 01 ऑक्टोबर 2009 रोज गुरुवारपासून दैनंदिनी लिहायला सुरुवात करत आहे. मी 'अभ्यास कसा करावा?' या पुस्तका तसेच 'लोकमत' वृत्तपत्रातील सुविचार "प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी" या द्वारे व माझा छंद तसेच मला डी.टी.एड. अभ्यासक्रम करताना आलेले अनुभव मांडण्यासाठी दैनंदिनी लिहित आहे.

आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्याची मनात उत्सुकता होती. मी कॉलेजमध्ये जाऊन नविन मित्रांशी भेट झाली. मी तेथील परिपाठाने 'Impress' झालो. नंतर सर्वाँत वरच्या मजल्यावरील Seminar Hall मध्ये 'पालक मेळाव्यात' उपस्थित झालो. महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालकांचा परिचय झाला. मी माझा परिचय Detail मध्ये इंग्रजीत दिला.

सरांनी सर्व विद्यार्थी तसेच पालकांना महाविद्यालयाचे सर्व नियम समजाऊन सांगितले व त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामध्ये माझ्यामते 80% उपस्थितीचा नियम सर्वाँत कठिण आहे.

मी खाली महाविद्यालयाचे नियम लिहून मी 100%, 75%50% पाळू शकणाऱ्या नियमांसमोर अनुक्रमे A,B व C लिहित आहे. तसे नाईलाजास्तव व महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मी सर्व नियम 100% पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन व त्याची सुरुवात आजच मी केली आहे ती म्हणजे उद्या 2 ऑक्टो. ची सुट्टी परवा कॉलेज 4ला रविवार माझा विचार आज गावी जाण्याचा होता परंतु दि. 3च्या उपस्थितीसाठी मी तो विचार मनातून काढून टाकला.
नियम खालीलप्रमाणे-

  1. प्रथम वर्षी तसेच द्वितीय वर्षातील प्रत्येकी 1 ऑक्टो. ते 1 मे व 11 जून ते 30 सप्टेँ. पर्यँत दोन्ही वर्षी प्रत्येक 4ही सत्रात किमान वेगवेगळे 60% उपस्थिती अनिवार्य→ A
  2. प्रथम वर्षी 2न्ही सत्र मिळून आणि द्वितीय वर्षी दोन्ही सत्र मिळून किमान 80% उपस्थिती अनिवार्य→ A
  3. प्रथम वर्षी 240 पैकी किमान 200 दिवस हजर राहणे आवश्यक→ A
  4. कॉलेजमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 व शनिवारी सकाळी 9 पुर्वी हजर होणे→ A
  5. कॉलेजमध्ये नेहमी कॉलेजड्रेस, टाय व शुज तसेच टायपीन, आयकार्ड व व्हाईट सॉक्स घालून येणे→ A
  6. अनुपस्थित असल्यास सरकारी Civil Sergion डॉ. चीच मेडीकल सर्टीफीकेट आणणे→ B
  7. कॉलेजमध्ये चुकूनही मोबाईल न आणणे→ A/B

वरील नियमांत मी म्हणेन की नियम 6 मध्ये जर विद्यार्थ्याला डॉ. कडे जाण्यालायक तब्येत खराब नसेल परंतू कॉलेजमध्ये उपस्थित राहण्या लायकही नसेल तर त्या विद्यार्थ्याला Problem होऊ शकतो. हो नियम क्र. 7 मध्ये बदल करुन मोबाईल सोबत ठेवण्यास मुभा द्यावी परंतू कॉलेज परिसरात कॉलेजच्या वेळेत मोबाईलचा वापर होताना किँवा रिँग वाजताना आढळल्यास आवश्यक कारवाई करावी असे मला वाटते.

असो आज मी गावी जाण्याचा विचार टाळला व उद्या 2 ऑक्टो. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गांधी जयंतीचा कार्यक्रम 3 ऑक्टो. 2009 ला आयोजित करण्यात आला आहे व मी त्या कार्यक्रमात माझं स्वरचित गीत 'म. गांधी आणि आपण' सादर करणार आहे.

आज माझ्या मेसचा Problem सुटला मी अंकूश मारबते यांच्याकडे मेस लावली आहे.
व आता माझ्या घडीप्रमाणे ठिक 11.30Pm ला लिहिणे थांबवत आहे."


तर राजेश तेव्हा तू किती ठिकाणी मी मी करत होता रे.. आणि हो मला माहितीये आज 01 ऑक्टोबर नाही तर 26 डिसेँबर 2013 आहे. एक दिवस असा जरुर येईल कि मी भुतकाळातील ज्या तारखेचं तुला पत्रात लिहीलं असेल वर्तमानकाळातील त्याच तारखेला तु ते वाचत असणार.. असो! परवा तुझ्या कॉलेजातील गांधी जयंती बद्दल पत्र पाठवीन बरं का? तुला काय आहे सकाळी पण पत्र पोचू शकते. पण मला तर रात्री लिहावं लागतं ना पत्र! आता किती वाजलेत माहितीये का? चल आता थांबते..
तुझीच
डायरी नंबर 1 (कादंबरी)

डायरी लेखक- राजेश डी. हजारे



मुळ- 01/10/09 गुरुवार (रामटेक)
प्रसिद्धी-01/11/13 शुक्रवार (आमगाव)
दि.- 26/12/2013 गुरुवार (आमगाव)

अणुक्रमणिका

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार - कमलाकर देसले

दिवस 459 वा

अनुदिनी 90 वी

वाचकाची अनुदिनी 05वी

कमलाकरजीँची लेख- पहिला

सागरची पोस्ट- दुसरी


RDH Sir या फेसबुक पेजचे नियमित युवा साहित्यिक सागर जाधव यांनी 31 ऑक्टोबर 2013 रोजी औपचारीकरित्या पाठवलेला हा कमलाकरजी देसले यांचा लेख त्यांच्याच शब्दात..
आदरनिय कवि-गझलकार कमलाकर आबा देसले यांचा संवेदनशिल लेख.. 550331_371677312920067_1557516207_n.jpg
कमलाकर देसले

वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार

1239731_432020206898143_1384513290_n.jpgही गरिबांची मुले उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न खाऊन भूक भागवत आहेत. संवेदनशील माणसाला हेलावून टाकणारे हे दृश्य आहे; पण हे असे होण्यात श्रीमंतांचा दोष नाही. अज्ञानाने का होईना गरीबी हा पर्याय निवडणाऱ्यांचा आणि त्यांच्या अज्ञानाचा हा दोष आहे.
कधीकाळी असेच जे भुकेले होते ते आज गुणवत्तेने, कर्तृत्वाने श्रीमंत झाले आहेत. कारण अमीरी हा त्यांचाही हक्क आहे. श्रीमंती हा ज्यांचा चॉइस असतो आणि त्यासाठी जे अथक प्रयत्न करत असतात ते श्रीमंतच होतात. त्यांना पुन्हा फकीर ठेवणारा त्यांच्याकडे पर्यायच नसतो. श्रीमंत होणे हा एकमेव मार्ग आणि पर्याय निवडणारे श्रीमंतच होतात.

आता या निष्पाप मुलांविषयी करुणा वाटणं स्वाभाविक आणि आवश्यक आहे. ती वाटायलाच हवी. माणुसपणाचं ते महत्वाचं लक्षण आहे; पण ते पुरेसे नाही . कुठलीही करुणा ही कृतीशिवाय वांझ असते. असं पुलं म्हणायचे. तेव्हा या मुलांना अन्न दिल्याने अथवा कपडे दिल्याने भुकेचे अथवा त्यांचे अन्य प्रश्न कायमचे सुटणार आहेत असे मुळीच नाही. मानवी करुणेतून त्यांना अन्न, कपडे दिल्याने तात्पुरती त्यांची भूक भागेल; पण कायम हे कोण करू शकेल? नाही. मग हे प्रश्न कसे मिटतील ?

जेव्हा मानवी करुणा आणि (करुणावंत) या मुलांना अन्न आणि कपड्या सोबत ज्ञानाला पात्र बनवण्याचे शिक्षणाच्या संधीचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देईल/देतील. म्हणजेच करुणेतून प्रत्यक्ष कृती घडेल. आणि मुख्य म्हणजे ज्यांची ही मुले आहेत त्यांच्या पालकांनाही ही आपली मुले श्रीमंत, ज्ञानी, गुणी, निपुण व्हायला आवडतील. तेव्हाच भुकेचा प्रश्न मिटेल कदाचित॰! वांझ करुणेने प्रश्न नाही संपणार ... कृतीशिवाय करुणा वांझ असते.

लेखक- कमलाकर देसले

द्वारा- सागर जाधव

स्त्रोत- RDH Sir | Facebook

Tuesday 24 December 2013

मनोगत (मनातल्या मनात)

हेच पत्र सुरुवातीपासून वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा



बघ किती शुभदिनी मी तुला हे पत्र पाठवतोय..
माझे बाबा मला विचारायचे 4-4 डायऱ्या लिहील्या पण यांचा उपयोग काय? मी काय सांगणार त्यांना तुमचा उपयोग? मलाच माहित नव्हतं तर..! हं एक मात्र नक्की की तूला सर्व सांगितल्याने मन मोकळा होतो व तू तर ते जतनही करुन ठेवतेस मग वाटलं जर कधी 'मोठ्ठा माणूस' (वयानेच नाही तर कर्तृत्वाने पण) बनलो तर आत्मचरीत्र लिहिताना तुझ्या स्मृतीचा (मेमरीचा) निश्चितच लाभ होईल.. आजवर तुला प्रसिद्ध करण्याचा विचारही मनात आला नाही.. आणि दोघांव्यतीरिक्त कुणाला तुमचं दर्शनही होऊ दिलं नाही.. अन कदाचित म्हणूनच लिहिता आली प्रत्येक सत्य बाब इतक्या मनमोकळेपणे.. पण मला वाटतं आता वेळ आलीय तू आजवर जतन केलेलं समाजासमोर व्यक्त करण्याची... केव्हापर्यँत तु पण ऐकत रहाणार नुसतीच.. बोलणार नाही का कधी? का तूला हक्क नाहीय.. अन् म्हणूनच मला वाटतं की मी तर तूला सांगतच जाईन माझ्या मनातलं पण आता तू पण बोलायचंस माझ्याशी.. काय ऐकतीयेस ना? कसं व काय? अगं अगदी सोपं आहे.. जे मी आजवर तूला सांगितलं ना तेच तू मला पत्राद्वारे पाठवायचं काय? पाठवणार नं? अन् या तुझ्या पत्रमालिकेचं मात्र मी आधीच नामकरण करुन ठेवलंय बघ..

'मनातल्या मनात' हे नाव कसं वाटतंय.. मी जे काही तुला सांगितलं ते माझ्या मनातलच व ते सांगितल्यानंतरही मनातच राहत असल्याने मी हे नाव पसंत केलं... तूला पटतं का हे नाव ते बघ अन् मला कळव आधी पत्र पाठवून.. अन् अधामधात मी देतच जाईन उत्तर तूला पत्रानेच..

शेवटी नाताळ/ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!

तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत...
तुमचाच निर्माता/लेखक
rdhautographeng.jpg
-राजेश डी. हजारे (RDH)
Mob. 07588887401
कामठा रोड, आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया - 441902
दि. 24 डिसेँबर 2013, मंगळवार


सुचना: "मनातल्या मनात" या पत्रमालिकेतील "कादंबरी" ही पहिली रोजनिशी वाचण्यासाठी खालील 'अणुक्रमणिका बघा' वर क्लिक करा...

"अणुक्रमणिका" बघा..



ता.क.: * - "माझी ताई एक आठवण" हे पुस्तक 2014च्या अखेरपर्यँत याच संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध होईल..

अणुक्रमणिका

मनोगत (मनातल्या मनात)

अनुदिनी 88वी

दिवस 457वा

मनातल्या मनात-01

मनोगत/कादंबरी


माझ्या रोजनिशीस,
Hi! Hello!
अरे अशी काय बघतेस नेहमी तूझ्या रुपात दुसऱ्यांशी बोलतो पण आता वाटतं आपण ज्याशी बोलू नाही शकत ते सर्व तू मात्र शांतपणे समजून घेतेस, आणि जतनही करुन ठेवतेस.. मी तूला अश्रूंच्या सोबत बेस्ट फ्रेँड म्हणून कबुल केलं खरं! पण कधी मुद्दामून तूला Hi! Hello! केलच नाही.. म्हणून आज करतोय.. तू आजवर कित्ती-कित्ती ऐकलंस गं माझं.. माझ्या मनातील गोष्टी स्वत: जतन करुन ठेवल्यास.. जेव्हा तूला पाहतो तेव्हा त्या जून्या आनंदी व दु:खी दिवसांची सुद्धा आठवण करुन देतेस, कधी हसवतेस.. कधी रडवतेस पण..

मला आठवतं जेव्हा मला तूझ्याबद्दल कळायला लागलं तेव्हा मी 5वी 6वीत असेन.. जि.प. गोँदिया तील तिरोडा पं.स. अंतर्गत चिखली केँद्रात माझ्या मामाच्या गावी मराठी माध्यमाच्या जि.प. पुर्व माध्यमिक शाळा इंदोरा खूर्द (निमगाव) येथे शिकत होतो.. मराठीचा 'पिरेड' होता (तेव्हा तास कळायचा नाही).. घराजवळीलच श्री सिताराम एन. सोनेवाने हे शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला मराठी शिकवायचे.. ते वर्गात आले व धडा होता 'रोजाची रोजनिशी/रोजीची रोजनिशी'... मला लेखक आठवत नाहीयेत.. त्यांनी शिकवलेले 2पाठ आजही स्मरणात आहेत बघ 'रोजाची रोजनिशी' व 'सुईचे आत्मवृत्त'.. तेव्हाच कळलं कि रोजनिशी म्हणजे तू.. आताही त्या सरांना भेटलो की आधी त्यांचे चरणस्पर्श करतो (बाकी शिक्षकांना पण अभिवादन करतोच...) त्यावेळी कल्पना जरी केली की आपण रोजनिशी लिहायची तरी गंमत वाटायची..

थोडा मोठा झाल्यावर प्रयत्न केला पण मधातच खोळंबलं सगळं आणि बारावीनंतर डीटीएडला नंबर लागला.. डीटीएडच्या पहिल्याच दिवसापासून तूला लिहायला सुरुवात केली.. पहिल्याच दिवसी कॉलेजातून परतलो होतो.. नागपूर जिल्ह्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन रामटेकच्या पवित्र भूमीचं स्थळ होतं.. रामटेकात मी नवा नवाच होतो.. 01 ऑक्टोबर 2009 ची ती रात्र होती.. भाड्याच्या खोलीमध्ये हिवाळ्यातही ओल येत होता.. तेव्हापासून दिवाळी जेमतेम 15 दिवस होती.. स्वत:च जमवून बांधणी (बाईँड) केलेल्या रेखीव कोऱ्या कागदांचा भला मोठा रजिस्टर होता.. त्यादिवशी पहिला लेख (डीटीएड मधील पहिल्या दिवसाचे अनुभव) लिहून तुझा श्रीगणेशा केला..

पहिल्या दिवसी विचार पण नव्हता केला कि हे आपण केव्हापर्यँत लिहू? काय करणार? फायदा काय? हे प्रश्नही मनात नाही आले.. आणि मग तुझ्यावर लिहू लागलो प्रत्येक गोष्ट मला वाटली ते.. तुला सांगू लागलो माझ्या मनातील सुखद व दु:खद गोष्ट.. वाटू लागलो माझी स्वप्ने तुझ्यासोबत.. जे कोणालाही सांगू शकत नव्हतो ते तूला सांगत गेलो.. माझ्या जीवनातील काही वैयक्तिक 'राज' (Personal Secrets) पण तुला सांगून मोकळा झालो.. माहित होतं माझ्याव्यतीरिक्त कोणाला वाचायला फूरसत नाही म्हणून..! माझ्या पहिल्याच डायरीतील काही लेखांवर मी त्या दरम्यान जगलेलं माझं सत्य जीवन माझ्या आत्मकथनपर भाऊ-बहिणीच्या नात्यावर एक पुस्तक लिहिलं व साकार झाली "माझी ताई : एक आठवण"* ही माझी पहिली कादंबरी जी आजही अप्रकाशित आहे.. तेव्हापासून लिहितोय ते आजपर्यँत सतत.. याला 4वर्ष नुकतेच लोटलेत.. या 4 वर्षात 4 डायऱ्या संपल्या व पाचवी डायरी गत 01 नोव्हेँबर 2013 रोजी सुरु झाली.. बघ मी आजवर तुम्हा 5ही बहिणींचं नामकरण तर केलंच नव्हतं.. मी तुम्हाला असंच संबोधत होतो डायरी 1, डायरी 2, डायरी 3, डायरी 4 आणि आता डायरी 5.. पण मी तुमचा बाबाच नं! काय झालं तुला मित्र म्हणत असलो तरी.. शेवटी बाप पण लेकीँचा मित्र असतोच की..! आणि असही मीच तर जन्म दिला तुम्हा चारही बहिणींना; ते ही लग्नाआधी.. आणि तो ही पुरुष असून... अगं हस की थोडी.. कि हसु नाही आलं माझ्या पाणचट विनोदावर.. आता तुम्ही चौघी मोठ्या झालात... आणि दिड महिन्यांपुर्वी आपल्या (राजूची रोजनिशी) परिवारात नव्या पाहुणीचा जन्म झाला.. अगं कोण काय विचारतेस? वरच तर सांगितलं ना तुझी 5वी बहिण म्हणून.. माझी पाचवी लेक नाही का!! दिवाळीच्या शुभमुहुर्तावर बरोबर 1 नोव्हेँबर 2013 रोजी जन्म झाला तिचा.. 'कुंवारा बाप' हे स्व. महमूद यांनी केलेलं चित्रपटातील पात्र मला अगदी सुट होतेय नाही का! आजवर 'कांदेपोहे' नाही खाल्ले अन् 'बाप' बनलोय तुम्हा 5 बहिणीँचा.. पण तुम्हा चारही बहिणीँचं नामकरण करण्यास विसरलो नाही का??

हे काम स्त्रियांना मस्त जमतात बघ.. आणि मी ठरलो 'कुँवारा बाप'.. तुमची आईच नाही तर कसं लक्षात राहणार तुमच्या नामकरणाविषयी? पण आपण बारसं करुनच टाकू एकदमच तुम्हा पाचही बहीणीँचं.. असाही उद्या नाताळ (ख्रिसमस)चा योगही शुभ आहेच.. तर त्यासाठी चांगली तयारी करा बरं का! आणि उद्या 'ख्रिसमस' हून आठवलं-- आज 24 डिसेँबर.. काय विशेष आहे आज सांग बरं बघु.. एवढ्या लवकर विसरलीस.. अगं आज माझ्या आईचा वाढदिवस नाही का?? मी तर शुभेच्छा रात्री 12 लाच दिल्या.. चला तुम्ही पण विश करा बरं का माझ्या आईला..

"हॅप्पी बर्थ डे.. आई !!!"


हेच पत्र पुढे वाचण्याकरिता→ येथे क्लिक करा...

मनातल्या मनात (कादंबरी)

मनातल्या मनात

रोजनिशी (भाग-1) कादंबरी

•अणुक्रमणिका•

Wednesday 18 December 2013

What I think on Section 377 & verdict of Supreme Court

DAY 451

BLOG 86


Section 377 of IPC is in debate recently.. Most of the people are against of verdict by the Supreme Court of India.. But personally I am in a favour of current verdict by the Supreme Court and in favour of Section 377 of IPC..
Because I agree with Supreme Court.. 300px-Supreme_Court_of_India_-_200705.jp

Gaysex and Lesbian sex is an unnatural way of physical relationships still it would with consent.. I don't think that there is a need to repeal Section 377 of IPC from constitution of India in parliament..

gay-sex.jpg

I agree with those supporters of homosexual relationship that we can not sex discriminate between gays and lesbians..
In our country everyone have right to freedom.. And I don't want to heart someone bigoted or their supporters and community.. But--
I would suggest-
Parliament shall bring and pass the ordinance or ammend the law in Section 377 of IPC as follows--

There will not permission to keep homosexual relationship considering as a crime of unnatural way of sex but they will allow to live together..
And those gays or lesbians who have already (before Supreme Court's verdict) married together; will not be affected of new ammentment in Section 377 of IPC..

If above ammendment happens in law then--
Unnatural way of sex/homosexual relationships will avoid, bigoteds (gays or lesbians) may live together and those dogmatics who married together already will not be affected..

Section-377-of-IPC.jpg

I know you will oppose my statement thinking it as conservative and you will ask me in which era we are living and where are we going to follow these old-fashioned life-style, traditions and rules?
But I want to assure you that think deeply from bottom of your heart and ask yourself--
Is really its a natural way to sex? What wrong verdict Supreme Court have sentenced or what wrong I have said in this article?

I asked myself and my heart answered me again and again that whole Act 377 of IPC is not abolishable / repealable or wrong although there would also some lackness in that..
India is wel-known for it's mannerly culture.. And I don't think homosexual relationships would be mannerly characteristis of any wel cultured country..!!! So I would like to say Supreme Court have sentenced a right decision on Section 377 of IPC and in a sense Supreme Court have helped to save Indian culture with the judgement on historic date 11th December, 2013 (11/12/13) by countering so called historic verdict by Delhi High Court sentenced on 02nd July, 2009...
Another important thing is Supreme Court is the highest judiciary court of India.. So we shall respect the justice by Supreme Court as citizen of India..

So I hope Government of India will not repeal whole Section 377 of IPC from constitution of India.. And if government of India tried to repeal this section 377 of IPC then opposition party BJP will oppose to repeal Act 377 in parliament...

Because if Act 377 became repealed there will be no control to stop like this un-natural way of sex..
We can not say that those who are not bigoted and keep interest in gays/lesbians will also keep homosexual relationship by this un-natural way..

Thatswhy Now I would suggest to ammend the Act 377 in parliament instead of repeal that..

At the last I excuse all if anyone hearted from my statement.. I am not any philosopher or expert of this subject or a lawyer who will define this sensational matter deeply..
But I thought to express what I think on Section 377 of IPC and recent verdict of Supreme Court accordingly I also have freedom of speech.. I stated only that what I wish..
THANKS!!!
Source- Facebook Source- Section 377 of IPC | Wikipedia rdhautographeng.jpg

Rajesh D. Hajare (RDH)

(Writer is a Gondia District's President of 'AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA PARISHAD, Pune') Date- 16th Dec, 2013/Mon
Place- Vaishnavi Nursing Home, GONDIA

Wednesday 27 November 2013

TO THE LAST BULLET on 26-11 (#BookLysis)


  • दिवस ४३० वा
  • अनुदिनी ८२वी 
  • दुसरी पुस्तक समीक्षा

मित्रांनो सौ. विनीता अशोक कामटे व सौ. विनीता विश्वास देशमुख लिखित श्री भगवान दातार अनुवादीत "To The Last Bullet" (टु द लास्ट बुलेट) हे २६ /११ तील शहीद DIG IPS अशोक एम. कामटे यांचे जीवनचित्रण वाचून काढले.. हे पुस्तक वाचताना मला आलेले अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात... 

Tuesday 12 November 2013

NOT REACHABLE by Sagar Jadhav

Blog Post--> 81st


Day--> 415th


Reader's Blog--> 04th


Sagar's Blog--> 01st



1234564_520662214690138_658945095_n.jpg जळगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारा आयोजित प्रतिभा संगम साहित्य संमेलनात प्रथम पुरस्कार प्राप्त सागर संजय जाधव या युवा कविची "नॉट रिचेबल" ही कविता पाठवतोय.. या कवितेविषयी मी जास्त बोलणार नाही.. कारण RDH Sir या फेसबुक पेजवर याच कवितेला सर्वाधिक वाचने मिळालीत.. NOT REACHABLE POSTER.jpg

"नॉट रिचेबल"

वासनांनी भरलेल्या
‘डिजिटल’ कॅमेऱ्याच्या भितीने
बदलून घेतलाय तिने
स्वत:चा ‘वॉलपेपर’
अन्
गुणगुणती ‘रिंगटोन’
बदलून बसलीय
‘व्हाईब्रेट मोड’वर...
.
तिला जायचंय
नेटवर्क नसलेल्या ठिकाणी..
‘कनेक्टेड पिपल्स’ च्या जगातून
व्हायचंय
‘नॉट रिचेबल’..
.
तिनं झाकून घेतलंय स्वत:ला
एका ‘क्रिस्टल कव्हर’ मध्ये,
‘स्क्रिन टच’च्या बचावापासून
अन् मनाला घातलाय
बहुआयामी ‘पासवर्ड’
सावधानतेचा...
.
स्वत:वर ओढलंय
एकलेपणाचं ‘स्क्रिन सेव्हर’...
ती फक्त आतल्या आत
स्वत:ला ‘डायल’ करते!
आणि ऐकत असते
‘‘इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है !’’

कवी-- सागर संजय जाधव जोपुळकर

चांदवड, जिल्हा नाशिक
९४०४८०५०६८
स्त्रोत- फेसबुक

Monday 4 November 2013

'मानवता' - सर्वात मोठा धर्म

हाच लेख सुरुवातीपासून वाचा

मी एवढेच सांगू ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे माझा उद्देश कोणत्याही धर्म वा धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. तरी कुणाच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचत असेल तर मी नम्रपणे आपली क्षमा मागतो.. हा लेख लिहिण्यामागे हेतु एवढाच आहे कि जे कोणी धर्मप्रेमी स्वधर्माचा प्रचार करत असताना जाणून बूजून इतर धर्माँचा कमीपणा दाखवत त्या धर्मातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करतात ईश्वर/अल्लाह त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांचे 'तसले' कृत्य बंद होवोत... हा लेख वाचून एक जरी परधर्माचा कमीपणा लेखणारा व्यक्ती त्याधर्माचा सन्मान करु लागला तरी मी माझा हा इवलासा प्रयत्न सार्थक समजेन..

1377546_428661487234015_386813939_n.jpg

मानवता

मी मानतो इमान ला
मी जाणतो इंसान ला
...
सर्वात पहला धर्म एकच
मानवता हे नाव त्याचं
हिँदू-मुस्लिम-शीख-ईसाई
बौद्ध जैन पारशी ही
का वाटता हो ईश्वराला?
...
एक होती ती धरती माता
भेद कधी ना केला होता
भारत-पाक-ईरान येथे
बंधुभावाने राहत होते
का वाटले हो पृथ्वीला?
...
मुस्लिम ताई मंदिरी ये ना
मी ही पाहिन मक्का-मदिना
'ईश्वर' म्हणा वा म्हणा 'अल्लाही'
तुम्ही वाचा 'भगवद्गीताई'
'आरडीएच' वाचतो 'कुरआन'ला
...
'रमजान' मध्ये 'राम' येतो
'दिवाळी'त 'अली' येतो रे
हिँदु-मुस्लिम-शीख-ईसाई
खरं सांगतो सर्व भ्राता रे
वाटू नका बस् मानवाला...


कवी- राजेश डी. हजारे ( RDH Sir)

कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
('गोँदिया जिल्हाध्यक्ष-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे')

'मानवता'-सर्वात मोठा धर्म

अनुदिनी 79 वी

दिवस 407 वा

मी खुप दिवसापासून बघतोय. फेसबूक सारख्या सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स वर काही लोकांनी कोणत्याही एका धर्माच्या नावाने फेसबूक पेज किँवा प्रोफाईल बनवले आहेत आणि इतर धर्मांविषयी खोटेनाटे निराधार आरोप करणारे वक्तव्य आणि चित्रे अपलोड करून मित्रांना टॅग करतात. अशा कित्येक फेसबूक फोटो मलाही टॅग करण्यात आल्यात ज्यावर विचार केल्यानंतर मी काही लिहू व अशा नाटकी लोकांना विचारुही ईच्छितो.

आतापर्यँत असे जितकेही चित्रे मला फेसबूक वर पाठवण्यात आली त्यात फक्त 'ईस्लाम' ला लक्ष्य केले गेले आणि असे लज्जास्पद कृत्य करणारे माझे हिँदु भाऊ-बहिणीच आहेत हे कळल्यावर मलाच कसेतरी वाटते. हिँदू धर्माच्या पवित्र नावाने पेज तयार करुन ईस्लाम किँवा अन्य कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करत त्यांच्या विषयी हे ना ते अनेक बिनबुडाचे आरोप व खोटेपणा समोर आणू पाहणारे आणि स्वत:ला 'स्वाभिमानी हिँदू' असे स्वघोषित बिरुद लावून घेणाऱ्या किँवा एका धर्माच्या नावाने अन्य धर्माँच्या तत्त्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या हिँदू धर्मीयांपैकी निवडक ढोँगी लोकांना मी काही विचारु ईच्छितो...

  • विश्वात काय फक्त दोनच धर्म आहेत?
  • काय फक्त 'ईस्लाम' च वाईट/खोटा/असत्यावर आधारित है?
  • काय फक्त 'ईस्लाम' च्याच तत्त्वात त्रूटी आहेत?
  • काय 'हिँदू' धर्मात कोणताच वाईटपणा/त्रूटी नाही?
  • काय फक्त अशा फोटो अपलोड करणाऱ्या व इतरांना टॅग करणाऱ्या फेसबूक पेजेसच्या संचालकांनाच हिँदू धर्माप्रती आदर व प्रेम आहे?
  • काय फक्त हिँदुंनाच स्वाभिमान आहे?
  • कोणी हिँदु धर्माविषयी 'तशी' पोस्ट अपलोड केल्यास काय माझे हिँदू भाऊ सहन करतील?
  • काय 'मुस्लिम' बंधू-भगिणीँना कसलाच स्वाभिमान नाही?
  • जर आपण आपल्या धर्मावर 'ईतका' प्रेम करतो तर बाकी धर्मीयांना आपल्या धर्माविषयी प्रेम/स्वाभिमान नसेल?

मी ही एक हिँदूच आहे. आम्ही पण आपल्या धर्मावर प्रेम करतो, आम्हालाही हिँदू असल्याचा स्वाभिमान आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तो दाखवण्या व व्यक्त करण्यासाठी इतर धर्मातील कमीपणा शोधून तो पसरवत त्या धर्माला बदनाम करत फिरावं. कारण मी जाणतो की आमच्यासारखाच अन्य सर्व धर्मांनाही स्वाभीमान आहे. आणि जेव्हा आम्ही स्वधर्माविषयी इतर धर्मियांकडून आदर-सन्मान अपेक्षित करतो तर त्यांच्या धर्माँचा सन्मान करणेही आपले कर्तव्य ठरते. आणि स्वत:ला अस्सल हिँदू म्हणवून घेणाऱ्यांना तर हे ही ज्ञात असायला हवं की इतर धर्मांचा सन्मान करण्यातच खरी शालीनता आहे.

मी असं मुळीच म्हणत नाही की या प्रकारचे पेजेस बनवू नका! कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी हे अवश्य करायला पाहीजे! यासाठी भारतीय राज्यघटनेच्या Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मध्ये सर्व भारतीयांना धर्मस्वातंत्र्याचा (आवडीचा धर्म स्विकार,पालन व प्रचार करण्याचा) मुलभूत अधिकार दिला गेला आहे. म्हणून फेसबूक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग संकेतस्थळांच्यामाध्यमाने अवश्य आपल्या धर्माचा प्रचार करायला हवा; पण आपणास हे ही लक्षात ठेवायला हवं कि ज्या संविधानाने आपणास हा धर्मस्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला त्यातच Section 15 नुसार धर्माविषयी भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे आणि 'भारतीय दंड संहिता कलम 295-298' (Indian Penal Code Act 295-298) नुसार कोणत्याही माध्यमाने कोणत्याही धर्माचा अपमान वा धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे कार्य केल्यास त्याला दखलपात्र गंभीर गुन्हा स्विकारत 1 वर्ष कैद किँवा/आणि दंड होऊ शकतो.

वाचक मित्रांनो! होऊ शकतं... कित्येक लोक माझ्या या लेख शी सहमत होणार नाही किँवा मी हिँदू असून ईस्लाम चे समर्थन केल्याने माझ्या मताचा विरोध करतील. त्यांना मी एवढच सांगू ईच्छितो की मी ईस्लाम चेच नव्हे तर विश्वातील सर्वात पहिला धर्म 'मानवता' ची बाजू घेतोय... कारण मी माणतो की...

"सर्व धर्म समान आहेत. निसर्गात तर एकच धर्म आहे तो म्हणजे 'मानवता/ईँसानियत (Humanity)'! पण या धर्माचा याच मानवानं 'हिँदू, मुस्लिम, शिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी' असा बटवारा केला व एकाच ईश्वराला 'भगवान, अल्लाह, ईसा (येशु ख्रिस्त)' असा वाटून निसर्गनिर्मित एका धरतीचा 'भारत, पाक, ईरान' एका धर्मग्रंथाचे 'रामायण, महाभारत, कुरआन' तर एका धर्मस्थळाचे 'मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा' असा वर्गीकरण केला आहे." पण सर्वांचं रक्त एक आहे, शरीराची रचना एक आहे. मी विचारतो "जर त्या निसर्गानं भेद केला नाही तर मानवाला कूणी अधिकार दिला असा भेदभाव करण्याचा?"

मी तर मानतो की खरंतर 'हिँदू''मुस्लिम' धर्म एकच आहेत म्हणायलाही हरकत नसावी कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की "मुस्लिम धर्मीयांच्या RAMzan-Eid या महत्त्वाच्या सणाची सुरुवात हिँदू धर्मीय प्रभू श्री RAM (राम) नावाने तर हिँदू धर्मीयांचा diwALI या सर्वात मोठ्या सणाचा शेवट मुस्लिम प्रेषित ALI (अली) च्या नावाने होतो. अर्थात रामाशिवाय 'रमजान ईद' व अली शिवाय 'दिवाली' हे सण सुद्धा अपूर्ण आहेत तर हिँदू शिवाय मुस्लिम व मुस्लिमांशिवाय हिँदू यांची कल्पना तरी कशी शक्य आहे..."

हाच लेख पुढे वाचा . . .

Thursday 31 October 2013

मृतात्म्यास पत्र

दिवस ==> 403 वा

अनुदिनी ==> 77 वी

सदर पत्र 'झाडीबोली'त पाठवत आहे...

मृतात्म्यास पत्र

Image Source: India Today
प्रतिमा स्त्रोत: India Today

स्वर्गीय मेल्या माणसाच्या आत्म्यास,
तो 29 सप्टेँबर चा दिवस होता.. मी बाजंवर झोपला होतू.. सकारी सकारी माज्या आईना उटवलन.. जवरपास आठक वाजले असतील.. हव तुमी बराबर वाचून रायल्या.. मी एवढ्यावरच उटता कदी कदी.. झोपता बी जरा लेटच.. मोटी दाळ आदत आहे माले पर का करता? तं जाऊ द्या.. मले सांगतलन का आमगावमंदी कोणाचा तरी खून झाला.. माझे बाबूजी त्या जागेवर जाऊन वापस आल्ते.. भल्तीच गर्दी होती तं त्यायले पावाले नायी भेटला खरा..! मंग मी निँग्लू चड्ड्यावरच.. तुले पावाले.. कोण असल? कसा असल? कायले मारला असतील? कोणा मारला असतील? मनात लगीस्से परस्न येत होते.. आखीरकार पोचलूच त्या जागेवर... आमच्या घरापासना ज्यादा दूर नवता.. तू त्या नवीन बनत्या घरातच अंदर निपचित पडला अससील.. असे तं तू जिता अससील तई कोनी नसल विचारलंन तूले पर तूह्या मेल्यावर खासकरून तूजा मडर झाल्ता मून स्यानी सप्पायसाठी तूजी डेटबॉडी मनजे मोट्या हिरोसारकीच झाली होती.. गर्दीच गर्दी लोकायची.. पोरायपासून तं बूळग्यायवरी ना रिकामडेँ**यपासून(शिवी) तं आफीसरायवरी सप्पायसाटी तुजा मेला थोबडा मंजे जसा का हिरोच होता.. अंदर पोलिस पंचनामा करत होते तं तूले पावासाठी लोकायले घरात एंट्री नवती.. पर सप्पा बिजी मानसा त्यादिवसी कामधंदा सोडून (तसाई इतवारच होता) निस्ता तूले पावासाटी नव दा वाजेवरी भर तपनीत तेतीच उभे होते ना गा.. मले तं असे ढुंढून जे भेटत नवते ते भेटले त्या दिवसी.. भरमार दूरदूरुन आले होते निस्ता तूले पावासाटी...

मंग आखिरकार तूले बाहेर आणला.. आमी तं तसा तूले पायलून नवतून पर जे लोकं सकारी सकारी पायटलेच जातत ना (अगा डब्बे धरुन नायी गा...!) फिरावले का मनतत त्याले मार्निँग वाक का फार्निँग वाक तं त्यायच्यातल्या एकाले तूजे पाय दिसले होते खरा..! मंग पोलिसायले बोलवला असतील.. मनजे माले तं लागते सनवारच्या रातीच झाला असल तूजा काम तमाम है ना गा? तं पोलिसायना पोते हातरला जमिनीवर अना लोकायले मेन पोलिसाना सांगतलंन (माफ करा भाषेमुळे मान देऊ शकत नाही) "तर बघा तूम्हाला आतापर्यँत इथे थांबवून ठेवण्याचा इंटेन्शन एवढाच आहे कि जर तुमच्यातील कोणी याला ओळखत असेल कि हा कोण आहे, कूठला आहे तर सांगावं व याची ओळख पटावी... तर तुम्ही एक-एक करुन पुढे या, पहा व समोर निघत चला..." त्याच्यापयलेच आमाले फोटोग्राफर ना क्यामेऱ्यात तूही फोटू दाखवलन होतन.. तेबी अलग-अलग पोज मंदली.. तूना बी खिचला नससील तस्या पोज जिता अससील तई..! तरी आमी तूले ससारचा (खरोखर) पावासाटी थांबलेच होतून.. मंग आमी पायलून तूले.. नड्ड्यावर (गळा), पाटीवर ना पोटावर चाकूचे घाव होते, तोँड उघडा होता.. मोठा भयानक दिसत होतास पर आमाले भेव नायी लागला.. मंग कोणातरी ओरखलन ना तूजा असली सरनेम सांगतलन तो मी नाई लिवा या पतरात अना गाव सांगतलन.. अखीन एका मानसाना पुस्टी केलन (पेपर वाचता मून मी बी नक्कल मारुन रायलू पेपरावानी.. ) तं पुस्टी बी नायी समजे; पुस्टी मनजे तो तुच व्हस मून कनफरम गा.. मंग आमी घरी आलून.. त्याच्या बादमंदी पोलिसायना तूजा पोस्टमार्टम केला असतील नायी का..? अना मंग तूले तूया घरी नेऊन सोडला असतील..

तू तं मेलास.. आगीत भस्सम बी झाला अससील.. आमीना तूले पायलून तरी चूपच.. पर आजूबाजूच्या बाया.. ज्या आल्या नायी, गेल्या नायी, पायला नायी तरी त्यायचा चालू-- "कोणा कूत्र्यायना मारला असतील बाई... मानसं नसतील ते... जनावर असतील (हा तं खरी मनला).." पर तू जेती भेटलास तो घर बनतच होता.. वास्तूपूजन बी होवालेच होता ना रावाले बी जावाचेच होते तं या का मनत सांगू-- "कसे रायतील बाई ते.. भेव नायी लागल का? घर बनावच्या पयलेच मुर्द्यायना अपसकून केला.. आता तो (म्हणजे तू) भूत बनून तेती फिरसील.." मी खरी सांगता तूज्या मेल्यापासून कोणी तेती बिनकामानं नायी जाय रातच्याले.. अना असा सिरीफ तूज्याच नायी.. तं कोणी बी मेला मनजे होते.. आता तू बी येतीच रायत होतास तं तूले बी मालूमच असल मना.. नायी असा नायी.. पर मी मनता- "का झाला?" तू का जाणून बूजून थोडी गेलतास तेती मरावले.. खूदहून तूले मारला त्या घरी दूसऱ्यायना.. तसा तं भूत बीत राये नायी.. काऊनका माजा विस्वासच नसे भूतादैतावर.. पर आता तू वरतं गेलास तं तूले मालूम तूले देवाघरी रावाचे आये का भूत बनावचा आये?
पर हो.. जर भूत झालास गिलास तं एकदम माझ्याजवरच नोको येजो नायतं माले पतरं कायले लिवलास मून.. अना तू झोँबजो तं त्यायले ज्यायनं तूले मारला.. आता मालूम चालला का तू मोटा सिदा सादा होतास खरा.. 

तं मी हा पतरं तूले सांगावसाठी लिवून रायलू का माणूस मेल्यावर त्याचा का होते हा अलग मॅटर आहे पर त्याच्याबाऱ्यात त्याच्या संगचेच आमच्यासारके लोकं का सोचतत.. अना हा मालूम असून का एक दिवस सप्पायले जावाचाच आहे तरी!! तं जाऊ दे तो सब सोड आता.. मी सांगता त्या घराले आता दरवाजा लावला.. तूले एकच इनती हाय का जो झाला तो झाला.. बळा गलत झाला तूज्यासंगा पर जाऊ दे आता त्यायची सजा देव त्याले देयल पर तू आता देवाघरी गेलास तं देव बनून राय.. भूत बीत तं रायेच नायी.. हाच सांगावासाठी डॉ. नरेँद्र दाभोळकर सारखा देवमाणूस थकून केला पर हिँमत नायी हारला तं जनावरायना त्यायच्यासारक्या देवमाणसाले बी तूज्याचसारखा मारला.. तूले मालूमच असल पेपरात वाचला अससील तं.. ते आता तेतीच असतील.. तू त्यायले विचार डॉक्टर तूले माज्यावून चांगला समजवून सांगतील भूत-चुडैल च्या बाऱ्यात का हे निर्री अंदश्रद्दा व्हय मून.. अना हो चूकभूल माफ कर.. जेतीबी अससील सुखी राय..

देव तूज्या आत्म्याले शांती लाभू देवो...!


तुआ मेला चेहरा पायनेवाला एक अनोळखी पोरगा

-राजेश डी. हजारे

(लेखक 'अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे' चे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)

आमगाव जि. गोँदिया

लेखन: 20 ऑक्टो. 2013 (रविवार)
शेवटचे अद्ययावत: 19 मे 2019 (रविवार)

  • स्त्रोत:

  1. न लिहिलेली पत्रे-14
  2. न लिहिलेली पत्रे-15
  3. #RDH Sir FB
  4. WhatsApp

Thursday 17 October 2013

फ.मु.शिँदे यांना अभिनंदनपर पत्र

दिवस→ 389

अनुदिनी/ब्लॉग→76

1382876_426999214066909_28692608_n.jpg1378742_525340920886123_1163613089_n.jpg
सन्माननीय श्री फ.मुं.शिँदे सर,

काल वृत्त वाचण्यात आले कि आपली '87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या' अध्यक्षपदी निवड झाली.. तात्काळ मी हे वृत्त फेसबुक व ट्विटर वर शेअर केलं... सोबतीला आपला छायाचित्र हवा होता म्हणून गुगल वर शोधून पाहिला आपला नाव तेव्हा चित्रांसोबतच विकीपिडीया वर आपल्याबद्दल सविस्तर माहिती दिसली.. तेव्हाच आपणास या निमित्ताने पत्र पाठवण्याचा माणस झाला... सोबतच आपल्या फेसबुक पेजविषयी पण कळलं.. आता तो तुमचाच आहे कि तुमच्या नावाने कोण्या दुसऱ्याच व्यक्तीने बनवून ठेवलाय ते माहित नाही पण कळवा जरुर...

तसं बघितलं तर आपली ओळख मी शाळेत शिकायचो तेव्हापासूनची... म्हणजे हो मला कळतय आपण मला ओळखत नाही.. पण मी आपणास ओळखायला लागलो ते शाळेत असतानापासून.. मला इयत्ता आठवत नाही पण इतकं अवश्य आठवतंय कि आठवी अथवा आठवीपुर्वीच्या मराठी बालभारती च्या पाठ्यक्रमात आम्हाला आपण लिहिलेली प्रसिद्ध 'आई' ही कविता होती... वर्ग आठवत नसल्याने आतापर्यँतच्या (1ली पासून ते अगदी डीटीएड पर्यँत) सर्व मराठी शिक्षकांची नावे आठवत असूनदेखील नेमक्या शिक्षकाचे नाव सांगू शकत नाही.. पण ती कविता शिकवण्यापुर्वी शिक्षकाने सांगितलेला लेखक परिचय व त्यातलेच त्या कवितेचे कवी 'फ.मु.शिँदे' अगदी 'फकीर मुंजाजी शिँदे' या आपल्या पूर्ण नावासह लक्षात आहेत ते आजपर्यँत.. मी शिकलेल्या बऱ्याच कविता विसरल्यात मात्र 'आई' ही कविता आणि तीचे कवी आजही स्मरणात आहेत.. कारण 'आई' हा प्रत्येकासाठी अगदी जवळचा (किँबहुना पहिलाच) शब्द.. आणि आपण काय सोपं व तितकच भावस्पर्शी वर्णन केलं आईचं त्या कवितेत तो ही अगदी साध्या व सोप्या भाषेत..

मी ती कविता शिकत असताना कधी स्वप्नातही विचार वा कल्पना केली नव्हती की मी कधी आपणास पत्र पाठवीन.. या साहित्यिक क्षेत्रात येण्याचं तर कधी स्वप्नातही आलं नव्हतं.. पण योगायोगाने मी या क्षेत्राकडे वळलो तो हि फक्त छंद म्हणून नव्हे तर अगदी 'प्रोफेशन' म्हणून तेसुद्धा तरुण वयात.. मी जाणतो कदाचित या क्षेत्रात पैसा नसेल पण आपल्या लेखनीत ताकत असेल तर एक दिवस तो ही एक दिवस निर्माण होईल याच क्षेत्रातून... आज मी 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' च्या 'गोंदिया जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष' पदावर कार्यरत आहे.. ही हि एक समाजसेवाच आहे... आणि पैसा मिळत नसला तरी या सर्वाँतून मिळणारा मानसिक समाधान खुप मोठा आहे.. मी जाणतो "पैसा खुप काही असला तरी सर्वकाही नाही.." आणि या मानसिक समाधानाची तुलना पैशाची होऊच शकत नाही.. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपणास भेटण्याचा (किँवा प्रत्यक्ष पाहण्याचा) कधी योग येईल.. होय कारण मी पुणे पासून भरपूर लांब (अगदी विरुद्ध टोकावरीलच) गोँदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असून देखील पुणे जिल्ह्यातील 'सासवड' येथे 3, 4 व 5 जानेवारी 2014 रोजी आयोजित '87 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी' येत आहे.. तसे मी या फक्त 20 वर्षाच्या आयुष्यात बरीच छोटी मोठी साहित्यसंमेलने पार पाडली आहेत, पण इतक्या मोठ्या व विशेषत: इतक्या प्रतिष्ठित व मानाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्याची ही माझ्यासाठी पहिलीच संधी असेल... मला निमंत्रण पण मिळालेय.. आणि माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकासाठी स्वाभाविकच ही खुप आनंद व अभिमानास्पद बाब आहे...

असो... आपणाशी बोलण्या व सांगण्यासारखं बरंच काही आहे कारण आपण स्वत:च्या कर्तृत्वाने लेखनीद्वारे व वयानेही खुपच मोठे आहात आणि त्यामुळे आपली किमयाही फारच न्यारी व महतीही खुपच मोठी आहे.. पण पत्राला काही मर्यादा आहेत त्या पाळाव्या लागतील.. आणि आपण आता खुप व्यस्त असाल त्यामुळे पत्र वाचाल कि नाही काय माहिती पण हातात पडल्यास वाचालच ही आशा करतो.. जर पत्र वाचून झाला असेल तर प्रतिक्रीया नक्की द्या पत्राद्वारे... माझा पत्ता व संपर्क क्रमांक माझ्या फेसबुकच्या भिँतीवरुन आपणास मिळूनच जाईल आणि तरीही मी शेवटी नोँदवलाय.. शेवटी साहित्यसंमेलनात आपली प्रत्यक्ष भेट (पाहणे होईलच) 5-10 सेकंदांची का होईना पण त्या व्यस्त कार्यक्रमात भेटही होईल जर अल्लाहची (मी हिँदु आहे) ईच्छा असली तर... काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करावे... आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी असेल हा विश्वास आहे.. आपली लेखनी तडपत राहो हि सदिच्छा व्यक्त करतो...

आणि या पत्राचा समारोप करण्यापुर्वी तुमचीच आई ही कविता (ज्यामुळे मी आपणास ओळखू लागलो) विषय निघालाच आहे तर ती इथे नमूद करतोय..

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं
गाव असतं !
...
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा...
...
घर उजळतं तेव्हा
तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायला
कमी पडतं रान !
...
अरे ! आणि आपणास शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या कि... 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन ..!
आपलाच चाहता
एक नवोदित साहित्यिक
rdhautographmar.jpg
राजेश डी. हजारे (RDH)
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401
पत्ता-कामठा रोड आमगाव ता. आमगाव जि. गोँदिया- 441902
~(गोँदिया जिल्हाध्यक्ष- अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे)

Saturday 12 October 2013

आसुमल हरपलानी ते 'संत' (न)आसाराम

BlogPost==> 73rd

Day==> 384

अप्रिय आसाराम...
मी माफीही मागत नाही कि मी तुम्हाला प्रिय प.पु. संत श्री बापू असं म्हटलं नाही.. कारण मी मानतच नाही.. तसं मी यापूर्वीही तुमचा कोणी मोठा भक्त वा समर्थक नव्हतो व आता तर प्रश्नच नाही... कारण जे बहूसंख्य होते ते आता तर थोडेफार राहिले असतील.. व त्यातलेही काही पश्चात्तापच करत असतील..!

पण मी एक खरं सांगू.. ज्यादिवशी तुमच्यावर पहिल्यांदा 'बलात्काराचा' आरोप लावला गेला व जेव्हा प्रसारमाध्यमे (मिडीया) तुम्हाला विनापुरावा पोलिसांच्या चौकशीपुर्वीच धारेवर धरत होती.. त्यांनी तुम्हाला तेव्हाच गुन्हेगार संबोधलं होतं त्यावेळी मीच तुमची बाजू घेत "आसाराम यांची पोलिसांद्वारे चौकशी होऊ द्यावी त्यात गुन्हा सिद्ध झाला तर नंतर मग मिडियाने तुम्हाला गुन्हेगार संबोधावं" असं ट्वीट केलं होतं.. पण ते चूकीचे नव्हते.. जेव्हा तुम्ही पोलिसांसमोर समर्पण करण्याऐवजी इकडे-तिकडे लपत नव-नवे बहाणे बनवत होते ना.. तेव्हाच मलाही पटलं "सच मे जरुर दाल मेँ जरूर कूछ काला हैँ..." आणि नंतर माझंही मत बदललं.. मी स्वत: परत मिडीयाची माफी मागत तेच बरोबर असल्याचं पण नवीन ट्वीटद्वारे कबूल केलं होतं...

आसाराम, तुम्ही स्वत: आश्वासन दिलं होतं कि "सध्या माझे सत्संग सुरु असल्याने 30 तारखेनंतर मी स्वत: समर्पण करून पोलिस चौकशीत मदत करीन.".. पण तुम्ही तर मूदत संपून 2 दिवसांनंतरही इंदौरच्या आश्रमात विश्रांती घेत होतात... मला अचंबा वाटतो की तिथले पोलिस कसे मिडीयाने जोर धरेपर्यँत तूम्हाला अटक करण्यास धजावले नाहीत... शेवटी मानलं तुम्हाला! पण माघार घेणार ते भारतीय पोलिस कसले? डोंबले ना तुरुंगात शेवटी! तुमचा कितीही दबदबा असला तरी...! तुम्ही गुन्हेगार असल्याचं मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा विमानामध्ये तुमचे (विशेषत: महिला) समर्थक 'आजतक' या नॅशनल खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी शिव्यागाळ व मारपीठ सारखे असभ्य वर्तन करत होते आणि तुम्ही दुपट्ट्याने तोँड झाकत होतात... म्हणे 'प्रायव्हसी' चा विचार केला.. मी म्हणतो तुम्ही उत्तर द्यायचं होतं ना... प्रायव्हसी च्या कारणाने कारवाई झाली असती ती केली असती विमान कंपनीने संबंधित वाहिनीवर.. त्याची तुम्हाला काय पडली होती एवढी ?

मी तूम्हाला सन्मानाने 'जी' संबोधतोय याचं कारण एवढंच कि तुम्ही वयाने मोठे आहात.. पण तुम्ही तर दिडशे वर्षे जगण्याची ईच्छा ठेवता म्हणे... हे वाईट नाही हो... पण तुम्हाला कोणत्या पुस्तकात कळलं तर कोण जाणे दिर्घायुष्यासाठीच तुम्ही (अर्शकल्प, आणि अजून कोणकोणते मला 'नॉलेज' नाही) शक्तीवर्धक (अंमली पदार्थ सुद्धा!) औषधी सेवन करुन अल्पवयीन मुलीँचे लैँगिक शोषण करत होतात खरं..! कोणी म्हणतं तुम्हाला लहान मुलीँशी वासनाच्छेचा आजार जडलाय काय नाव त्याचं... मी विसरलोच बघा... मग तर मोठमोठाले ऋषीमुनी कित्येक वर्षे जगले त्या सर्वाँनी तीच पुस्तक वाचली होती काय? वा रे मेरे संत!

माझ्या माहितीनूसार तुमचं खरं नाव आसुमल थाउमल हरपलानी उर्फ आसुमल सिरुमलानी.. जन्म 17 एप्रिल 1941 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या तत्कालीनी ब्रिटीश भारतातील नवाबशाह जिल्ह्यातील विरानी गावात मेहनगीबा (आई) व थाऊमल सिरुमलानी (वडील) च्या घरी.. 'थँक्स गॉड' तुमचा जन्म एक दिवस उशीरा झाला नाही अन्यथा माझ्याही मनात एक सल आयुष्यभर राहिली असती की माझा वाढदिवस कुकर्मी आसारामच्या वाढदिवसी येतो.. ईश्वरानं मला सुदैवानं 18 एप्रिल 1992 रोजी 'भारतरत्न' महर्षी धोँडो केशव कर्वे सारख्या समाजसुधारकाच्या वाढदिवसी या पृथ्वीवर पाठवलं.. तुम्ही पंक्चर दुरुस्तीचे काम करत होतात.. तुमचा मालक जवळच एका संताचे प्रवचन ऐकण्यास जायचा.. कधी मधी तुम्ही पण सोबत जायचे.. मग तुमच्या मनात आलं कि-- हा तर मस्त काम आहे.. काही वेळ प्रवचन करायचं.. मान, सन्मान, प्रसिद्धी मिळते.. अन्  दक्षिणेच्या नावाखाली वारेमाप पैसासुद्धा... सोबतच स्त्री-पुरुष, मुले-मुली, भक्त जमतात.. पाया पडतात.. आशीर्वादाच्या बहाण्याने प्रत्येक वयाच्या स्त्री-पुरुषास स्पर्श करता येतो... तुम्हाला काय पाहिजे होतं अजून... मग काय?? सुरु केला तुम्ही आसुमल चे आसाराम असे नामकरण करत स्वत:च स्वत:ला प.पु.संत आसाराम बापु अशा एक ना अनेक पदव्या घोषित करुण प्रवचनगिरीचा व्यवसाय... खरंतर इथंच चुकलं तुमचं... तुम्ही आपला नाव आशाराम वा 'आसाराम' ऐवजी 'नासाराम' ठेवावयास हवं होतं... पण काहीही म्हणा तुम्हाला तरुण मुलींना आशीर्वाद देण्यात जरा जास्तच रस होता नाही का? खरे संत फक्त डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद देतात; पण तुम्हाला समर्पणाच्या नावाखाली स्वतंत्र खोलीत बोलावून तरुणीँच्या बाह्य व आंतरीक अंगाअंगाला स्पर्श करत आशीर्वाद देण्याचे जरा जास्तच कौशल्य होते.. आणि पिडीत तरुणी बिचारी विरोधात 'ब्र' ही उच्चारु शकत नव्हती..


Source: i.ndtvimg.com

कारण बहुसंख्य समर्थक जे होते तुमची बाजु घेण्यासाठी.. सोबतच अशा कार्यातून तुम्हाला वाचवणारे सहकारी देखील... शिवाय तुम्हाला वाटत असावं कदाचित भोळ्या भाबड्या भक्तांच्या आस्थेचे बाजारीकरण करुन कमावलेल्या वारेमाप संपत्तीच्या बळावर व प्राप्त समर्थकांच्या विरोधाच्या बळावर करत राहू तरुण वयातील कोवळ्या मुलीँवर लैँगिक अत्याचार आणि वाचून जाऊ भारताच्या कायद्यापासून... पण ते कदापि शक्य नाही... आणि आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर येताहेत भुतपूर्व पिडीत मुली एकेक करुण पुढे तुमच्या विरोधात खटले दाखल करण्यासाठी...

आता तर तुमच्या विषयी फक्त प्राथमिक माहिती पुढे आलीय.. ये तो अभी ट्रेलर है मेरे आसा.. अब तो पुरी पिक्चर बाकी है... आता जेव्हा मी तुमच्या विरोधात इतर विविध पोलिस ठाण्यात पिडीतांद्वारे एफआयआर नोँद होताना पाहतो व तुमच्या आश्रमातीलच तुमच्याच भुतपूर्व सहयोग्यांचे तुमच्याचविरोधात मते व आश्रमासंबंधी वादग्रस्त प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रतिक्रीया ऐकतो तेव्हा मला वाटतं कि किती भोळे आहेत आमच्या भारतातील भक्त! आणि कसे फसवत होतात तुम्ही भाबड्या भक्तांना... अन् आम्हीही कसं विश्वास ठेवतो तुमच्यासारख्या स्वघोषित संतांवर स्वत:च्या बंद डोळ्यांनी... तुमच्यासारख्या ढोँगी बाबांची सत्यता कळल्यावर मी देवाला प्रार्थनाच करु शकतो की एक दिवस असा न येवो की जे खरंच स्वत:ला संत म्हणून फक्त म्हणवूनच घेत नाही तर वास्तविक वैयक्तिक जीवनात आचरणही करतात संतांसारखाच अशांवरचा विश्वास व श्रद्धेला कलंक लागू न देवो रे बाबा !! अन्यथा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत गोराकुंभार, संत सैय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा, संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बाबा, ईश्वरतूल्य संत साईबाबा, संत गजानन महाराज, विसाव्या शतकातील प्रबोधनकार राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज या व अशा कितीतरी तसेच ज्यांनी अखिल मानवजातीस ईश्वर दगडांच्या मंदिरात नसून माणसात आहे ही ग्राम स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबतच बहुमूल्य शिकवण दिली त्या संत गाडगेबाबा महाराजांच्या महाराष्ट्र व भारत देशातील हिँदूंच्या धार्मिक अस्मितेला कदापि काळीमा फासला जाऊ नये; आणि कलंकाचा डाग तर सोडा पण छोटासा छिट्टा सुद्धा उडवला जाऊ नये...

अप्रिय आसाराम.. तुम्ही तर कलंकित झालातच पण आपल्या या दुष्कृत्यात मुलगा नारायण प्रेम साई सिरुमलानी ला सुद्धा सामाऊन घेतलंत... असा कोणता बाप असेल जो कुकर्मात स्वत:च्या मुलाला सामाऊन घेईल.. आणि असंच करायचं होतं तर का दिलं त्या बलात्कारी पोराला ईश्वरतूल्य साई बाबा चं पवित्र नाव... सुरत ठाण्यात दोन सख्ख्या बहिणीँनी त्याच्याविरुद्धही लैँगिक अत्याचाराचा खटला नोँदवलाय.. हे तर काहिच नाही.. या सर्व खेळात संपूर्ण कुटूंबच सहभागी आहे खरं तुमचा... अर्थात तुमची पत्नी लक्ष्मीदेवी व मुलगी भारतीदेवी सुद्धा... फक्त नावासमोर देवी लावल्यानं कोणी साक्षात देवी बनून जात नाही.. आता तर तुमचा अवघा परिवारच अदृश्य आहे खरं... ते सर्व गायब आहेत... तुम्हीच जाणोत कुठं असतील ते... कारण आपण तर 'साक्षात परमेश्वराचेच अवतार' आहात ना !!! माहित असेल तर सांगून द्या कुठे लपून बसलेत ते... सुरत पोलिस मागावर आहेत त्यांच्याही.. मला तर नारायण साईवर पुर्वीपासुनच संशय होता... जेव्हापासून एका पहाडी जंगलातील त्याच्या गुप्त गुफेबद्दल 'इंडिया टीव्ही' या अजून एका प्रसिद्ध राष्ट्रीय खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिलं व ऐकलं तेव्हापासूनच... नुकतच ऐकायला मिळालं कि तुमचा मुलगा हि उठून सुटून निरर्थक बहाणेबाजी करतोय याचिकाकर्त्याँविरुद्ध.. आणि करु लागलाय खरं जाहिरात स्वत: निर्दोष असल्याची स्थानिक वृत्तपत्रांमधून.. पण आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा.. एक म्हण आहे बघा आमच्यात "मंदीराची इमारत मजबूत असण्यासाठी सर्वप्रथम त्याचा पाया मजबूत असावा लागतो.." आणि इथे तर मंदिराचा पाया अर्थात परिवाराचा मुखिया म्हणजे तुम्हीच कलंकित असल्यावर मंदिर म्हणजे तुमच्या परिवारातील इतर सदस्यांवर या कलंकाचा एक छिट्टा उडाला नसेल हे शक्यच कसे आहे? आणि जर तुमचा परिवार आहे निर्दोष खरोखरच तर येत का नाही समोर सुरत पोलिसांच्या..? का करावं लागतंय पोलिसांना त्याचा शोध ठिकठिकाणी 6 टिम बनवून...?

असो... मी बरंच बोललो या पत्राच्या माध्यमातून.. मी ना तुमचा समर्थक ना विरोधक! मला काय आवश्यकता होती एवढं लिहिण्याची कोण जाणे.. पण एकमात्र नक्की! माझे शब्द तुम्हाला टोचले कि नाही माहित नाही कारण तुम्ही ठरले ते शेवटी 'बेशरम'च! पण तुमच्या आताही असलेल्या समर्थकांना निश्चितच टोचले असतील माझे शब्द... मला जाणीव आहे त्याची... कारण जसे आज तुमचे विरोधक तूमचे समर्थन करणारे वक्तव्य ऐकू शकत नाही तसंच तूमचे आजही टिकून असलेले समर्थक सुद्धा आपल्या 'परमात्म्याविरुद्ध' काही ऐकू ईच्छिणार नाही मी जाणतो... पण त्यांच्यावर जरा जास्तच प्रभाव दिसतो आपला... किमान त्यांचा तरी विचार करावयास हवा होता तोँड काळा करण्यापूर्वी.. इतकं सगळं होऊनही व नवनवे कटू सत्य बाहेर येणं सूरुच असूनदेखील त्यांचा अद्यापही तूमच्यावरचा विश्वास टिकून आहे... मी तूमची माफी कदापि मागणार नाही पण माफी मागतो त्या सर्व समर्थकांची... माझा उद्देश त्यांच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.. पण हेच कटु सत्य आहे.. मी जाणतो हे थोडं कठिण आहे पण एक दिवस त्यांनाही जाणीव होईल वस्तुस्थितीची कि तुम्ही कोणी 'संत' वगैरे नसून फक्त 'बलात्कारी बाबा' आहात... होय पैशाचा हव्यासु, किशोरवयीन मुलीँशी शरीरसुख मिळवण्यासाठी वासनेच्छा तृप्त करण्यासाठी टपूनच असलेला एक बिमार वृद्ध राक्षस! निव्वळ एक पाखंडी!! मला हे कळत नाही कि एकीकडे अवघा संत समाज तुम्हाला संत बिरादरीत नाकारत असताना अ.भा. संत महासभेचे/अखाडा परिषद चे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज का घेत आहेत तुमची बाजू?? खाजगी वृत्तवाहिन्यांवर आयोजित परिसंवादात का देताहेत ते वादग्रस्त विधाने व का जोडतात संबंध तुमच्या कूकर्मांचा साधारण परंतू संवेदनशील घटनांशी? तुमची साठगाठ तर नाही ना? अन्यथा असेल भिती त्यांना कि एका पापी संतामुळे उडून जाईल जनतेचा विश्वास संत समाजावरुन-- पण हे कदापि शक्य नाही.. संतांवरचा आमचा विश्वास व श्रद्धा अढळ आहे.. ती कमी होणार नाही.. पण एक मात्र नक्की! आता करु लागतील किमान काहितरी सुजाण भक्त चौकसबुद्धीने विचार संतांना संत मानण्यापूर्वी एकदातरी... आणि आता अपेक्षाही आहे सुजाण भक्तांकडून ती एवढ्याचीच...


तुमचा ना समर्थक ना विरोधक
एक चौकसबुद्धीचा आस्तिक

-राजेश डी. हजारे (RDH Sir)
-12/10/2013, आमगाव
(पत्र लेखक अ.भा. मराठी साहित्य परिषद, पुणे चे गोंदिया जिल्हाध्यक्ष आहेत. )

  • ता. क.: 25 एप्रिल 2018 रोजी आसाराम ला बलात्काराच्या आरोपात दोषी मानत जोधपुर न्यायालयाने आजीवन कारावास चा दंड सुनावला आहे. 


  • पुर्वप्रसिद्धी:
 

Monday 7 October 2013

प्रेमात हरले... - Poem by SWATI THUBE

Day→ 379


Blog Post→ 72


Reader's Blog→ 03


Swati's blog→ 02




प्रेमात हरले...

प्रेमात हरले
दोन शब्द माझे
विरहालाही
नि:शब्द केले
...
इतभर काव्य
तुजसाठी
भावनांना मी
चव्हाट्यावर आणले
...
भावना झाल्या
अपंग माझ्या
तुला शोधण्यास
नजरा धावल्या
...
कुठे थांबल्या
अडकल्या
पडल्या कि
वाटेतच निजल्या
...
थेंबभर काव्य
तुजसाठी
किती रक्त माझे
आटत गेले


कवयित्री: स्वाती ठुबे-खोडदे

Thursday 3 October 2013

जुमदेवबाबास पत्र

...सुरुवातीपासून वाचा

तसं मी 'परमात्मा एक' या मार्गाचा सेवक नाही पण या मार्गाच्या सेवकांशी माझा संपर्क येऊन गेला (त्या दिवशी तर विशेषत्वाने) आणि भविष्यात येणारच.. पण मी हिँदु धर्मीय असलो तरी माझ्यावर ईस्लामचा बराच प्रभाव आहे.. त्यामुळे साहजिकच मी 'परमात्मा एक' या एकमेव सत्याचा (मार्गाचा नसलो तरी) अनुयायी आहे... आपणास माहित असेलच रामटेक येथे तुमचा खुप मोठा (आश्रम/मंदिर/देऊळ/मठ/आणखी काही नेमकं काय म्हणतात माहित नाही) पण आहे..आणि जवळच 'हजरत बाबा सैय्यद गंजुशाह रहमतुल्लाह अलैह' यांचा दर्गासुद्धा.. मी दर्ग्यात जात असताना बहुतेक वेळा तुमच्याकडे येवुन नतमस्तक व्हायचो.. 'परमात्मा एक' सेवकांसाठी हे योग्य असले तरी मी मानत असलेल्या ईस्लाम मध्ये एकमेव 'अल्लाह' व्यतीरिक्त कुणापुढेही नतमस्तक होणं नियमात बसत नाही पण काय करणार..? शेवटी मी जन्मलो व वावरतो तर हिँदू म्हणूनच ना!

असो.. 3 एप्रिल व 3 ऑक्टोबर ला दरवर्षी तुमच्या जयंती व पुण्यतीथीनिमित्त वर्धमान नगर नागपूर नागपूर व मौदा येथे 'परमात्मा एक' सेवकांचा बराच मोठा कार्यक्रम असतो खरं... शक्य झालं व कधी योग आला तर तिथेही येईन भविष्यात पण प्रॉमिस नाही करत..

असो... काही चुक-भूल झाली असेल तर क्षमा मागतो.. असंही 'क्षमा' हा तुमच्या व तुमच्या सेवकांचा महत्त्वाचा गुण आहेच.. शेवटी तुमच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हास पाठवत असलेल्या या पत्राला नुकतीच प्रकाशित तुमचीच टपाल तिकीट जोडलीय..

आशीर्वाद व कृपा असावी..
मार्गाचा नसलो तरी एक सेवक
राजेश डी. हजारे
jumdev30092013.jpg
-आमगाव
(03 ऑक्टो. 2013, गुरुवार)

जुमदेवबाबास पत्र

दिवस---> 375वा

अनुदिनी/ब्लॉग---> 70वा

प.पु. महानत्यागी श्री जुमदेवजी बाबा,
आज 3 ऑक्टोबर 2013.. आपली पुण्यतिथी.. त्या स्मृतीप्रित्यर्थ माझं आपणास नमन... तसं पाहिलं तर काही आपणास पत्र पाठवण्याचा बेत नव्हताच.. परंतु नेरवाच्या दिवसी 30 सप्टेँबर 2013 रोज सोमवारला गोँदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात (MIET) तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ डाक तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.. मी तसं उपस्थित राहणार नव्हतोच म्हणा पण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर VVIP राजकीय नेते राहणार होतो.. आणि असणार का नाही म्हणा..! जिल्ह्याचे खासदार ना. प्रफुल पटेल सारखे दमदार नेते केँद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री असल्यावर..

तर नियोजनाप्रमाणे मी सकाळी गोँदियाच्या एन.एम.डी. महाविद्यालयात गेलो..तसं माझं तिथे वैयक्तिक काम होतं.. पण तुम्हाला सांगू का हा तुमच्या तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम प्रारंभी याच परिसरात डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये होता.. या कार्यक्रमामुळे तेथुन कोणत्या तरी परिक्षेचं केँद्र रद्द करण्यात आलं खरं.. कार्यक्रमाचा मंच उभारणार तोच जागा मर्यादित असल्याच्या कारणाने कार्यक्रमाचे स्थान MIET त स्थलांतरीत करण्यात आल्याचं कळलं.. मला तर नवलच वाटलं बुवा! बाबा जुमदेवजीच्या साध्या डाक तिकीट प्रकाशनासाठी एवढी काय गर्दी असणार? असंच मला वाटलं होतं पण---

मी गोँदियात पोचल्यापासूनच कितीतरी 'परमात्मा एक' सेवकांचे जत्थेचे जत्थे पायदळी कार्यक्रमस्थळी जाताना दिसत होते.. मी हि निघालो एनएमडी तून आणि थोड्याच अंतरावर एका प्रौढ व्यक्नीने हात दाखवला.. त्यांना मी दुचाकीवर लिफ्ट दिली.. त्यांनाही तुमच्याच कार्यक्रमास जायचं होतं व योगायोगाने मला पण.. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणाने शहरातील ऑटो रिक्षा बंद असावेत बहुतेक..! MIET त पोहोचताच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.. अहो खरंच..माझा अंदाज फोल ठरला होता.. जिकडे तिकडे वाहने व माणसांव्यतीरिक्त काहीच दिसत नव्हते..

कार्यक्रम नुकताच सुरु झालेला.. मंचावर उपस्थित केँद्रात मंत्री असलेल्या बऱ्याच मंत्र्यांची भाषणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. प्रफूल पटेल यांचे भाषण झालेले.. अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के. शंकरनारायणन यांनी भाषण दिले ज्यात आपल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.. व भारत सरकारद्वारा प्रसिद्ध तुमच्या डाक तिकीटाचे प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती मा. ना. डॉ. श्री मो. हामिद अन्सारी यांच्या हस्ते झाले.. भारताच्या उपराष्ट्रपतीँनी आपल्या भाषणात वारंवार प्रफूल पटेलांचे कार्य, गोँदिया जिल्ह्याचा विकास इ. बाबीँचा आवर्जून उल्लेख केला.. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...

1374762_163783340487404_638683112_n.jpgjumdevstamprelease.jpgjoomdev.jpg

माझ्या नजरेत आपली ओळख 'परमात्मा एक' चे संस्थापक (जुमदेवजी ठुब्रिकर) इतकीच होती पण ती या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने कळली.. कार्यक्रमासाठी लावलेल्या हजारो खुर्च्या सेवकांनी गच्च भरल्या होत्या आणि त्याच्याही दुप्पट सेवक दोन्ही बाजुला शांतपणे उभे होते.. जितपर्यँत नजर जाईल तिथपर्यँत डोळ्यांना आपल्या सेवकांचेच दर्शन होत होते.. आणि कार्यक्रम संपल्यानंतरही हजार-दोन हजार सेवकांचे येणे सुरुच होते.. मी ज्यांना लिफ्ट दिली होती ते संजय वानखेडे सुद्धा 'परमात्मा एक' सेवक असून ते स्वत: चंद्रपूर हून आलेले होते.. हिँगना, नागपूर सारखे सबंध महाराष्ट्र व कदाचित आंतरराज्यातुनही आलेल्या आपल्या मार्गाच्या सेवकांनी MIET चे प्रांगण अगदी तुडुंब भरले होते.. काटोल हून तर अवघी बसची बसच बुक करुन आलेली होती.. मला नंतर तुमच्या सेवकांकडून कळलं कि 'परमात्मा एक' चा कार्यक्रम कुठेही असो सेवकांना कळल्यास जातातच.. ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने.. अल्पोहाराची आयोजकांकडून व्यवस्था असुनदेखील सेवक स्वत: आणलेले डबे, अल्पोहार अथवा स्वखर्चाने नाश्ता खरेदी करुन शांतपणे ग्रहण करत होते...

home-page-logo.png
home-page-logo2.png

माझ्या मनात 'परमात्मा एक' म्हणजे घराच्या दाराला लावलेली "दारु पिऊन आत येण्यास मनाई आहे." ही पाटी हि एकच ओळख होती.. पण नेरवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण जीवनभर महानत्याग करुन अंधश्रद्धा विरोधी व व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल जाणुन घेता आले.. जसे 3 शब्द, 4 तत्त्व, 5 नियम.. कच्चे सेवक, पक्के सेवक.. हातावर पर्वत घेऊन उडत्या हनुमानाचेच प्रतिक म्हणून स्विकार, जात-धर्म कसलाही भेद न करता मानवतावादाचा पुरस्कार.. वगैरे वगैरे.. आणि बरंच काही...

पुढे वाचा→ readmore.png

Wednesday 2 October 2013

नोकरी करणा-या महिलेची व्यथा (Letter by SWATI THUBE)

374वा→ दिवस

069वी→ अनुदिनी

002री→ वाचकाची अनुदिनी

नमस्कार..!
आज माझ्या या ब्लॉगिँग वेबसाईटने 50,000 वाचक भेटी पुर्ण केल्यात.. ब्लॉग च्या 374व्या दिवशी आणि ते ही 02 ऑक्टोबर 2013 म्हणजे महात्मा गांधी यांच्या 144व्या जयंतीच्या दिवशी आपण हा टप्पा पुर्ण केला त्याबद्दल या ब्लॉगच्या वाचकांचे अभिनंदन आणि धन्यवाद..!

'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर युवा साहित्यिका स्वाती ठुबे - खोडदे यांनी एक पत्र पाठवले होते नोकरी करणा-या महिलेची व्यथा... या पत्राने फेसबुक विश्वात बरेच विक्रम केले व याला खुप प्रसिद्धीही मिळाली. त्यासंबंधी दैनिक 'लोकमत' मध्ये सोमवार दि. 30 सप्टेँबर 2013 रोजी अभिनंदनपर वृत्तही छापून आले.. स्वाती ठुबे यांच्या सहमतीने सदर पत्र मी खाली देत आहे...

1278056_531460616933644_1132553930_o.jpg

1.नोकरी करणा-या महिलेची व्यथा

काल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले, नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे.

1234719_155351857997219_759671131_n.jpg प्रिय सखी
“नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे” हे मी काल ऐकले होते. मला त्या वेळेस बोलावसं वाटलं होतं, तुम्ही खुपजणी होतात आणि मी एकटीच होते, आधीच खुप उशिर झाला होता, त्यात माझ्या पिल्लांचे दोन फोन येऊन गेलते. मला घराची ओढ होती म्हणून नाही थांबले मी.

सखी आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय? आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करतो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांचे बोलणे खावे लागतात, घरचे टेन्शन, ऑफीसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामीक टेन्शनखाली वावरत असतो आम्ही.

नोकरीवाली असले तरी मी ही एक आईच आहे. नऊ महिने पुर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवुन बाळाचे स्वप्न पहात मी प्रवास केला. तुमच्या सारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. तीन महीन्याचे बाळ घरी सोडुन जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप फुटायचा तेव्हा काळजाच पाणी पाणी व्हायचं. वाटायच पळत सुटावं आणि पिलाला कुशित घेवुन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दुर ठेवावं लागलं.

आम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणुन आम्हाला गर्वीष्ट समजता पण तसे नाही आम्हाला वेळच नाही. अग, सखी घरी आल्यावर कधी काम आवरुन झोपेल असं होतं गं. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफीसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात.

तुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. चार घास खाऊ घालण्याइतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात, तेव्हा तापलेल्या लेकराला सोडुन जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार.

आमचे सगळे सण ऑफीसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पहातो तेव्हा तुम्ही नटुन थटुन चालले असतात. तेव्हा खुप चिडचिड होते. आमच्या कपडयांकडे तुम्ही पहात असता. आमच्या चांगल्या रहाण्याला शुध्द बोलण्याला आमच्या साध्या चपलांना तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपुन घेता तर आमच्या रोजच्या प्रवासाचे काय? काय मजा करतो आम्ही?

उठल्यापासुन झोपे पर्यंत घडयाळाच्या काटयावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडुन आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करुन घेतात तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मजाच मारतो हा गप्पांचा विषय का होतो सखी?

तुमचीच
एक नोकरी करणारी सखी
लेखिका : स्वाती ठुबे - खोडदे

Tuesday 1 October 2013

शिकून गेलो आहे (Posted by PRAVIN GHULE)

Day→373

BlogPost→68th

Reader's Blog→01

RDHSir या फेसबुक पेजवर मागील आठवड्यात वाचकांद्वारे सर्वाधिक पसंतीस पडलेली कवी प्रविण घुले यांची एक छानशी कविता पोस्ट करतोय..

1. शिकुन गेलो आहे...

सांगा त्या वादळांना
ताकदीने उभा होतो,
आता झुकणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
त्या निर्जीव दगडांना
मानतच नव्हतो मी,
आता डोकं टेकवणंसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
जख्मा नाही काळजात
असे काही नाही,
तरी हसणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
सत्याला न्याय ना इथे
दुनियाच ही लबाडांची,
तुम्हापरी कपटी वागणंसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
जरी पाहसी फिनीक्सा
सवंगड्यापरी असा तु,
आता राखेत झिजणेसुद्धा
शिकुन गेलो आहे...
...
ना हार मानली कधीही
ना मानणार आहे,
माघार घेणंसुद्धा आता
शिकुन गेलो आहे...

कवी- प्रविण घुले

स्त्रोत: RDH Sir | Facebook

Thursday 26 September 2013

FIRST ANNIVERSARY OF MY BLOG

Day→368

Blog→ 67

anniversary-logo.jpgBVFDIr0CQAA2_SW.jpg Hi!
It's 24th Sep. 2013... Means FIRST ANNIVERSARY OF MY BLOG... I started my blog and wrote MY FIRST BLOG POST on dated 24th Sept. 2012... At that time I was looking so many sites for blog... I registered myself on so many sites like Tumblr, Wordpress, Blogger and so many other sites... And then I got information about MyWapBlog and quickly I registered on this... I have written much more that why I use MyWapBlog in my Acknowledgement... So I will not write more here...

When I wrote MY FIRST BLOG POST on this site I never thought that I will use this site for a year continuously or I will introduce this site www.rdhsir.mwb.im as my blogging website... But I think this site is much easier and better than others to browse and to write a blog with multimedia from any gazette like Feature Phone (Mobile), smart phone, tablet or PC...

I started blog to express myself about my life, literatures and few social issues... I never expected good response from my readers which I receive... But I am getting great response from my readers which I had never expected... When I know that my readers read my full blogpost of single and multiple pages I satisfy... And when readers give their feedbacks in comment below of my blog post I get happiness...

In this one year (365 days) I have posted just 66 blog posts... And I know total articles/blogs are not even 66 because few articles are posted into 2-3 posts because of browser's word limit/length which I use from my mobile... I agree that this is a very least number... I think this number should be atleast more than 200 posts and 66 is not even half of that... But I don't care that How many blogs I write... Writing is must important than figures for me... When I wish I post my blog... Now also I have idea in my mind to post so many blogs but I haven't write that on paper so I haven't posted... I am delaying to post even this post of MY BLOG's FIRST ANNIVERSARY.. Not because I am lazy its because I hadn't papered it...

I have approved 43 comments which are sent by my readers till today for my 66 blogs in this year.. This doesn't mean only 43 comments I have received.. I have deleted few comments and most of my readers give their feedbacks via various platforms of social media... I think they choose simple way to give their feedback instead of writing mail, name and them comment in my site... So they give their feedback in comment or sending personal massage on facebook or sending SMS(es) to my mobile.. Few readers call me directly.. Few readers send their feedback by sending mail personally or from this site... While few readers mentiones me in their tweets.. I welcome all the comments coming from any media...

Its a big achievement for me that in this just first one year 48800+ visitors and readers have visited my site and read my blog posts and the visitor counter is increasing day to day which makes of proud..!

282194.gif578678_467394816709759_2072006141_n.jpg

I would like to inform you that My blog readers are not from any single country... Undoubtedly my maximum readers are from INDIA and after them readers who belongs from United States, Norway, Poland, Ukraine, China, Russia, Germany, Latvia, Taiwan, HongKong and other countries also read my blogs.. My most of the readers click on the link of blog post I shared, few goes though Search Engine and rest of the readers visit my site directly... Still today my ACKNOWLEDGEMENT of this blogging site is read by maximum 420 readers...

At the end I Thank You everyone who visited my site and read my blog even once, I thank you who Read, Like, Love, Comment my blog, who Appreciate and even Criticize me... I promise you that I will never nervous you as my readers.. THANK YOU for your lovely response... Hope your Love & Blessings will be showering on me and on my blog always in next year also..!


Your Response Gives Me Strength to write more..
Keep Visiting
Keep Reading
THAKS WITH LOTS OF LOVE..!

RAJESH D. HAJARE (RDH Sir)

rdhautographmar.jpg

Monday 23 September 2013

22 सप्टेँबर - ताईस पत्र

हाच ब्लॉग सुरुवातीपासून वाचा

त्या दिवशी मला बोलावून तासभर संवाद साधण्यामागे तुझा हेतू काय होता ते तर मला कळलं नाही.. पण मी तूला एक सांगू ईच्छितो ताई.. आज आपण जरी स्वगावी राहत असलो, आपल्यात बराच अंतर असला.. व त्या सुखद दिवसानंतर 2 वर्ष लोटलेत.. तुला कदाचित वाटत असेल कि तूझा न मानलेला भाऊ तूला विसरला.. पण नाही ताई.. याचा पुरावा हा पत्र आहे.. आपल्यात संपर्क नाही याचा अर्थ असा नाही ताई कि मी तुला विसरलोय वा तुझा नंबर माझ्याकडे नाही.. तो आहे पण भिती वाटते आजही तुझी आणि नाही करत फोन कितीही आठवण येत असली तरी कारण उगाचच होऊ नये त्रास तुला माझ्यामुळे म्हणून.. कारण काळजी आहे मला माझ्या ताईची.. मला नाही आवडणार तुला एका मुलाचा फोन आल्याचे घरच्यांना कळल्यास त्यांनी तुला काही प्रश्न केलेलं.. तो ही तुझा दोष नसताना.. म्हणून आजही पुर्वीप्रमाणेच तुझ्या छायाचित्रांशीच बोलतो वा बोलतो तुझी कल्पना करुन स्वत:च स्वत:शी एकांतात वा लिहित असतो तुला पत्रे माझ्या दैनंदिनीत व वाचत बसतो एकटाच वेळ मिळेल तेव्हा.. मला माहितीये ताई हा पत्र प्रसिद्ध होत असल्याने वाचकवर्ग हसेल माझ्यावर.. म्हणतील असलाही काय वेडेपणा!! कारण त्यांना बहिण असेल.. आणि नसलीही तर उणीव भासत नसेल बहिणीची.. पण मला किँमत कळतेय बहिण नसल्याची.. आणि म्हणूनच आजच्या वर्गमैत्रिणीँशी प्रेमाचे सोँग करणा-यांच्या युगात व वातावरणात मी मानलं तूझ्या रुपात माझ्या वर्गमैत्रिणीला मोठी बहिण.. तो ही जात-पात, धर्म, वय सर्व बाबींना अलिप्त ठेवून.. कारण या बाबी पवित्र नात्याच्या आड येवू शकत नाहीत.. आणि तुला सांगू ईच्छितो ताई आता मी पण (हिँदू असून) तुम्हा मुस्लिम बंधु-भगिणीँचा पवित्र धर्मग्रंथ 'कुरआन' वाचतोय.. तो ही जीवाभावापासून..! काय झालं तु मला भाऊ मानलं नाही? मी कधी तुला भाऊ मानच म्हणून बळजबरी केली नाही वा त्रास दिला नाही.. बस् घुटमळत बसतो एकटाच.. मी जाणतो ताई जरी तु मला भाऊ मानत नसली तरी कुठे ना कुठे असेलच जागा या भावासाठी तुझ्या हृदयात.. अन्यथा कशाला लिहिलं असतं तु टोपणनाव "तुमची ताई" म्हणून माझ्या स्लॅम मध्ये?

ताई, त्या दिवशी मला तु भाऊ मानलं नाही पण आश्वासन दिलं होतं कि "वाटल्यास जमलंच तर... लग्नाला बोलवूऽऽऽ..." मी आठवण करुन देतोय ताई किमान एवढं तरी करशील माझ्यासाठी.. "ताईचं प्रेम नाही तर ना सही पण तीचा 'निकाह' तरी या दुर्दैवी भावाला नसीब होऊ दे... तुला माझी शप्पथ." तु तर मला नि:संकोच बोलण्याची संधी दिली होतीस गं.. पण त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते; होते ते फक्त अश्रू! तुझ्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला भरपूर काही आठवत होऊ बोलण्यासारखं पण वेळ निघून गेली होती.. आता आजही खंत आहे मनात तु संधी देऊनपण मी मनसोक्त बोलू शकलो नाही.. मला भरपूर बोलायचं होतं.. 2 वर्ष रडत असताना जे थोडेफार आनंदाश्रू साठवले होते याच सुखद दिवसासाठी ते तरळतसुद्धा होते.. ती अश्रूसरिता मला ताईच्या खांद्यावर लहान भावाच्या नात्यानं डोकं ठेवून मनसोक्त रडत मोकळी करायची होती.. तुझ्यापुढे कानशील पुढे करत बहिणीच्या हातच्या 2 चपराक खायच्या होत्या मी केलेल्या क्षुल्लक चुकांसाठी.. आई-वडील व ईश्वरानंतर ज्या व्यक्तीचे छायाचित्रात पाया पडत होतो त्या साक्षात मोठ्या ताईचे चरणस्पर्श करायचे होते पण सर्व ईच्छा अपु-याच राहिल्या..

त्या दिवशी तु मला उपवास असल्याने चम्मचभर साखर व पाणी प्यायला दिलं होतं.. आजही त्या साखरेचा गोडवा प्रसाद व पाण्याची चव अमृत म्हणून जीभेवर आहे.. दुस-या दिवशी जाण्याचे नियोजन असतानाही तु मित्राचा वाढदिवस आटपून काही कारणास्तव त्याच रात्री स्वगावी परतलीस ती कायमचीच.. मला तु परतल्याचे तुझ्या-माझ्या मैत्रिणीकडून फोनवर कळलं.. आणि मी साठवून ठेवली ती मी पाहिलेली माझ्या ताईची शेवटची झलक.. तु रुमच्या रस्त्याकडे इंटरनेट कॅफे जवळून मैत्रिणीँसह वळत होतीस... अगं ताई हो त्याच मैत्रिणीचा आज वाढदिवस.. शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता कळलं की तुला प्राथमिक शिक्षिकेची स्वगावीच कायमस्वरुपी नोकरी लागलीय.. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन ताई... तत्पूर्वी मी रामटेकच्या दर्ग्यामध्ये जाऊन तुझ्यासाठी दुवा मागुन आलो होतो.. त्या रात्री शांत झोप यावी म्हणून मित्राला बोलावलं होतं.. ज्या नात्याची माझ्या काही मित्रमैत्रिणीँनी अवहेलना केली त्यातच काहीँनी खंबीरपणे आधारही दिला.. विशेषत: माझी बेस्ट फ्रेँड-तु जाणतेसच.. तरी त्या दिवशी झोपेपर्यँत 23 तारखेच्या पहाटेचे साडेचार झाले होते.. तु मला त्या भागात आल्यास नि:संकोच घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतंस.. मी प्रयत्न करीन ताई पण हिँमत होईल माझी येण्याची??

23 तारखेला आदल्या दिवसाच्या सर्व आठवणी आठवत होत्या.. आणि तु मात्र गावी पोचलेली असशील.. मी सर्वप्रथम दार बंद करुन एकटाच हाथ-पाय आपटत ओरडत रडलो मात्र माझं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं.. होत्या फक्त चार भिँती! त्या दिवशी अगदी वेड्यापिस्यासारखा रडलो मात्र तु परतणार थोडीच होतीस.. त्या रडण्याचं मी शब्दात वर्णन करुच शकत नाही.. नंतर मन हलकं झाल्यावर तुझ्या मैत्रिँणीची स्लॅम परतवण्यासाठी त्याच खोलीकडे पण यावेळी करमत नव्हतं.. मी आमगावी परतलो.. नंतर आपली भेट कधीच झाली नाही त्याला आज दोन वर्ष लोटलेत...

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

22 सप्टेँबर - ताईस पत्र

ब्लॉग- 64 वा

दिवस- 365 वा

प्रिय ताई,
अस्सलाम-व-अलैकुम..!

पत्राची सुरुवात कशी करावी ते ही कळत नाहिये.. याचा अर्थ मला पत्र लिहीता येत नाही असा नाही गं.. माझ्या दैनंदिनी वह्या उघडून बघितल्यास तुला पण प्रचिती येईल त्याची.. बरीच पत्रे लिहिलीत व आताही लिहितोय तुला माझ्या दैनंदिनीत आणि कालांतराने वाचत बसतो एकटाच... तुझ्याशी बोलू शकत नाही ना म्हणून.. पण यावेळी मनात जरा भितीच आहे बघ कारण पहिल्यांदाच मी प्रसिद्ध करतोय ना तुला पाठवत असलेला पत्र यावेळी... "माझी ताई:एक आठवण" ही तुझ्यावर लिहिलेली कादंबरी (जणू पत्रमालिकाच) पण प्रसिद्ध करणार होतो मी 'न लिहिलेली पत्रे' मध्ये पण नाही पाठवू शकत ते काही कारणांनी तेथे.. आणि हा पत्र म्हणजे काही त्या पुस्तकातील भाग नाहीच...

मला माहितीये ताई तु इंटरनेट वापरत नाही ते.. पण कोण जाणे हृदयाच्या एखाद्या कोप-यातून तू पण हे दुर्दैवी भावाचं पत्र वाचत असशील...!! ताई वाचतीयेस ना..???

524640_466021460180428_1119230898_a.jpg

काल 22 सप्टेँबर 2013.. अगं 22 सप्टेँबर.. काही आठवतंय? तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं? होय ताई मी 22 सप्टेंबर 2011 च्याच त्या जेमतेम 1 तासाच्या अविस्मरणीय संवादाबद्दल लिहीतोय.. मागल्या वर्षी या दिवसाची आठवण म्हणूनच मी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता.. योगायोगाने आज माझ्या ब्लॉग चा पण पहिला वाढदिवस साजरा होतोय या पत्रासह... आणि आता या पत्राद्वारे मी त्या सुखद आठवणींनाच उजाळा देतोय...

तू बोलावल्याप्रमाणेच मी कादंबरी घेऊन तुझ्या रुमवर आलो व तुझ्या दर्शनासाठी आसूसलेला मी तु दिसताच माघारी फिरलो... रुमवर प्रवेशानंतर ताई मी चक्क 601 दिवसांनंतर आपलं बोलणं होणार असल्याने आणि तू स्वत: बोलावल्याने आनंदी जितका होतो तितकाच तू काय बोलशील या विचाराने मनातून घाबरलेलाही होतो... मला त्या भेटीचं क्षण न् क्षण व एकेक प्रसंग जसाचा तसा आठवतोय आजही..! काश् मी चित्रकार असतो तर तो चित्र अगदी तसाच रंगवला असता पण ईश्वरानं माझ्याऐवजी माझ्या लहान भावाला चित्रकला व अल्लाहनं मला लेखनकला दिली... काय झालं मी चित्रकार नसलो तरी स्वत:च्या लेखनीने कुठलीही अतीशयोक्ती न करता ते चित्र रेखाटू शकतो... तुझ्या मैत्रिणीँचा अवघा गृप माझ्या भोवती जमला होता.. आणि मी मुलगा असून तुम्हा 6-7 मुलीँमध्ये मुलीसारखा लाजत होतो...

तु एकदम आलीस आणि केला प्रश्न मला "सांगा काय आहे तुमची शेवटची ईच्छा..?" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं..! मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं..! मी तुझ्यासाठी मैत्रिणीँमार्फत चॉक्लेट पाठवायचो त्याला तु विनोदाने 'रिश्वत' ची उपमा दिलीस.. पण कोण भाऊ बहिणीला रिश्वत देईल गं??

ताई मला माहित नव्हतं कि माझ्या भावना व्यक्त करणं तुला आवडत नव्हतं ते.. पण मी तुला राग यावा म्हणून नव्हे गं ताई तर तुझे गैरसमज दुर होऊन सत्यता कळावी म्हणून मी वेगवेगळे नवनवे मार्ग शोधत होतो पण तुला कधी त्रास द्यावा असा विचार पण मनात आला नाही.. आणि भविष्यात सुद्धा माझ्याद्वारे मी असं कोणतंही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझ्या बहिणीला मी तीला बहिण माणल्याचं शल्य होईल... तुला आठवते माझी सही? आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं! होय 'माझं जीवन आणि माझी ताई' आता एक समिकरणच' झालंय..

ताई तु मला "माझी ताई:एक आठवण" पुस्तकरुपात प्रकाशित न करण्याची विनंती केलीस आणि मी दिलंही वचन क्षणाचा विलंब न करता.. ताइ विश्वास ठेव नाही मोडणार मी ते वचन.. अगं ज्या बहिणीच्या एका अप्रत्यक्ष ईच्छेनुसार मी बोलणं थांबवलं.. स्वत: रडत ज्या बहिणीसाठी कादंबरी लिहिली ती प्रकाशित करुन त्याच बहिणीला त्रास देईल का? किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात..! माझी ईच्छा होती ती पुस्तक तु वाचावीस ते तु वाचलं खरं.. त्यानंतर त्यात मी फक्त एकच लेख वाढवला तो ही याच संस्मरणीय भेटीवर "जाता-जाता गोड शेवट..." पण हो ताई मी माझ्या त्या साहित्यकृतीचा अपमान नाही करु शकत ती पुस्तक अप्रकाशित ठेवून.. पण तरीही मी तुला दिलेल्या शब्दाला तडा जावू देणार नाही हा विश्वास ठेव... मी सर्व कादंबरीचे स्वरुप पालटून फक्त त्या कथेचा आशय एका वेगळ्या स्वरुपात वेगळ्या शिर्षकासह माझ्या वाचकांसाठी प्रकाशित करीन... जेणेकरुन सर्वप्रथम तुला दिलेला वचनही पाळला जाईल व मला कवीचे लेखक बनवणारी त्या पुस्तकाची सत्यकथा ही जीवंत राहील माझ्या वाचकांसाठी

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

Wednesday 11 September 2013

ईँसानियत - सबसे बड़ा धर्म

Blog==> 63

Day==> 352

मैँ कई दिनो से देख रहा हूँ। फेसबूक जैसी सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स पर कुछ लोगोने किसी एक मज़हब के नाम से फेसबूक पेज या प्रोफाईल बनाये हूये है और अन्य मज़हब के बारे मेँ बुराई किये हुये स्टेटस और फोटो अपलोड कर मित्रोँ को टॅग करते है। ऐसे कई सारे फेसबूक फोटो टॅग मुझे भी प्राप्त हुये है जिनपर गौर करने के बाद मैँ कुछ लिखना चाहता हूँ तथा ईस पोस्ट के जरीये ऐसे लोगो से कुछ पुछना भी चाहता हूँ।

अबतक ऐसे जितने भी फोटो मेरे फेसबूक अकाउंट पर टॅग किये गये उनमे सिर्फ 'ईस्लाम' कि बुराई कि हुई है तथा ऐसी शर्मनाक हरकत करनेवाले मेरे 'हिँदु' भाई ही है ये जानकर तो मुझे ही शर्मिँदगी महसूस होती है। 'हिँदू' मज़हब के पवित्र नाम से पेज बनाकर 'ईस्लाम' या किसी एक मज़हब को टार्गेट कर उनकी बुराई करनेवाले और ऐसी हरकते करके खुद को 'स्वाभिमानी हिँदू' बतानेवाले या धर्म के नाम पर दुसरे मज़हब के स्वाभिमान पर सवाल उठानेवाले नाटकी लोगो से मै कुछ पुछना चाहता हूँ।

  • क्या विश्व मे सिर्फ 2 ही मज़हब है? क्या सिर्फ 'ईस्लाम' बूरा/झूटा/असत्य पर आधारित है? क्या सिर्फ 'ईस्लाम' मेँ कमजोरीयाँ है? क्या 'हिँदू' धर्म मे कुछ भी बुराई/कमजोरी नही है? क्या सिर्फ ईस तरह की फोटो अपलोड करने वाले 'हिँदू' मज़हब से संबंधी फेसबूक पेजेस के अॅडमिनर्स और वे फोटो टॅग करनेवालोँ को ही 'हिँदू' मजहब से प्यार है? क्या सिर्फ हिँदुओँ को ही स्वाभिमान है? किसी ने 'हिँदु' मज़हब के बारे मे ऐसी पोस्ट अपलोड करने पर क्या मेरे हिँदू भाई बर्दाश्त करेँगे? क्या 'ईस्लाम' का कोई स्वाभिमान नही है? अगर आप अपने मज़हब को ईतना चाहते हो तो बाकी मज़हब वालोँ को अपने मजहब से प्यार/स्वाभिमान नही होगा?
मैँ भी हिँदू हूँ। हम भी अपने मज़हब से प्यार करते है, हमे भी अपने मजहब पर स्वाभिमान है। पर ईसका मतलब ये तो नही की उसे जताने के लिये हम दुसरे अन्य किसी भी मज़हब को नीचा दिखाते फिरे। क्यूँ की हमारे जैसा ही सभी धर्मोँ को स्वाभीमान है। और जब हम अपने मज़हब के प्रती अन्य धर्मियोँसे आदर-सम्मान की चाह रखते है तो उनके धर्मोँ का सम्मान करना भी हमारा कर्तव्य बनता है। और खुद को अस्सल हिँदू माननेवालोँ को तो ये भी पता होना चाहिये की अन्य धर्मोँ का सम्मान करने मे ही सच्ची शालीनता है।

मै ये हरगीज नही कहता कि ईस तरह के पेजेस मत बनाओ! किसी धर्म का प्रसार करने के लिये ये जरूर बनाने चाहिये! ईस बात के लिये हिँदुस्तान के संविधान कि Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मे सभी हिँदुस्तानियोँ को पसंदिदा मज़हब को अपनाने/पालन करने एवं प्रसार करने का संवैधानिक अधिकार भी दिया गया है। अत: फेसबूक, ट्विटर जैसी सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग साईट्स के माध्यम से जरूर अपने मज़हब का प्रसार करना चाहिये; लेकिन हमे ये भी याद रखना चाहिये कि जिस संविधान ने हमे हमारे धर्म का प्रसार करने का अधिकार दिया उसीके Section 15 के तहत धर्म के बारे मे भेद करने को ईजाजत नही दी गई है एवं 'भारतीय दंड संहिता दफा 295-298' (Indian Penal Code 295-298) के अनुसार किसी भी मजहब या धर्म के लोगोँ की धार्मिक भावनाओँ को किसी भी माध्यम से ठेस पहूँचानेवाले कार्य करनेपर उसे गंभीर जुर्म मानकर 1 साल कैद या/और फाईन हो सकती है।

मित्रो! हो सकता है... कई लोग मेरे ईस पोस्ट से राजी ना हो या मैने हिँदू होकर ईस्लाम की बाजू ली ईसलिये मेरा विरोध करे। उन्हे मै बताना चाहूँगा की मैने ईस्लाम की नही बल्की विश्व के सबसे पहले एवं बड़े मजहब 'ईँसानियत' की बाजू ली... क्यूँ की मैँ मानता हूँ की...

"संसार मेँ अगर कोई धर्म है तो बस् एकही है... और उस धर्म (मजहब) का नाम है मानवता/ईँसानियत (Humanity)। पर इंसान ने उस एक धर्म को हिँदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी ऐसा बाँटकर एक धरती का भारत, पाक, ईरान एक धर्मग्रंथ का रामायण, महाभारत, कुरआन और एक धर्मस्थल का मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा ऐसा बटवारा किया है।"

"पर मै कभी-कभी अपने आपसे पुछता हूँ की जब उस भगवान/अल्लाह/ईसा/ईश्वर या संसार ने इंसान मे कभी कोई भेद नही किया तो इंसान को किसने हक दिया इंसान-इंसान मेँ भेद करने का?" खैर...

"मैँ तो मानता हूँ कि हिँदू एवं मुस्लिम एक ही है कहूँ तो अचंबा नही होना चाहीये। क्युँकी सोचनेवाली बात है की जहाँ मुसलमान भाई-बहनोँ के पवित्र त्योहार RAMzan Eid की शुरूवात हम हिँदुओँ के भगवान प्रभू श्री RAM के नाम से होती है वहीँ हम हिँदुओँ के सबसे बड़े त्योहार diwALI का समापन मुसलमान प्रेषित ALI के नाम से होता है। फिर मैँ पुछता हूँ जब प्रभू श्रीराम के नाम के बिना रमज़ान ईद एवं अली के नाम के बिना दिवाली नहीँ मनाई जा सकती तो हिँदू एवं मुस्लिम मेँ भेद कैसे किया जा सकता है?

अंत मे मै यही कहना चाहूँगा की मेरा मकसद किसी मज़हब की धार्मिक भावनाओँको ठेस पहूँचाने का न होकर ये संदेश देने के लिये है कि- जो किसी भी धर्म के लोग अपने धर्म के प्रती अपना स्वाभिमान जताने के लिये दुसरे धर्म/धर्मोँ का अनादर करने मेँ जुटे होते हैँ भगवान/अल्लाह उनको सद्बुद्धी दे। और वो जल्द ईस तरह की दुसरे धर्मियोँ की धार्मिक भावनाओँ को ठेस पहुँचानेवाले स्टेटस/फोटोज अपलोड करना छोड़कर अपने धर्म के साथ-साथ दुसरे धर्म का भी सम्मान करने लगे।


लेखक: RDH (राजेश डी. हजारे)
-गोँदिया जिल्हाध्यक्ष-अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे
तिथी-29 अक्तुबर 2012 आमगांव साधार: ईँसानियत-सबसे बड़ा धर्म

Tuesday 20 August 2013

HAPPY RAKSHABANDHAN

61st→Blog Post

331st→Day



Happy-Raksha-Bandhan-2251.jpg



Today is Rakshabandhan! So many friends greeted me. And specialy Ratnamala; who had tied Rakhi on the wrist of my hand in 2011. Thank you Ratna!

Rakshabandhan is a special holy festival of happiness & joy with lots of memories for every brother and sister. But this holy festival does not practically exist in destiny of people like me who does not have a sister. I want to express my feelings on the auspicious occasion of this holy festival today. Because who would write & perhaps know about this festival & relation of brother and sister better than me?

I haven't a full sister. When I was a kid; even then I knew about Rakhi. My cousins were tying or sending Rakhis for both of us brothers. When I grown up. I completed my primary education in my uncle's village Indora Khurd (Nimgaon) which is located at Tirora tehsil in Gondia district. At that time my father was doing service as an assistant teacher in Z.P. Pri. School Dodadgaon which is located in Jalna district's Ambad tehsil. There is around 600 to 700 kilometers long distance between Jalna and Gondia. So my mother was sending Rakhis by Indian postal service for her brothers and for me too.

I went to Jalna for studying 7th & 8th std. My aunt lives with us; in fact she is one of the five members of our family. She had been tying Rakhi to both of us brothers while tying to my father. I completed my secondary to higher secondary education (9th-12th std.) in Amgaon where I do live now after my father's transfer in Gondia district. Few girl classmates tied me Rakhi in SSC and FYJC. (But not a single girl tied me Rakhi in the next year even being in the same class and in neighbourhood)! So many classmates (boys) become absent to save their wrists safe from being tied a sacred thread of Rakshabandhan and I was an exception among all of them!

I don't understand what do girls want to prove by tying Rakhis to those boys who don't wish to get tied a sacred thread. Does any boy's lustful mentality turns into Platonic by just a thread of silk? Never! There is no option for platonic mind. You can not change someone's licentious thoughts into platonic thoughts. There is no need to tie a sacred thread for changing someone's lascivious thoughts. Then why some girls humiliate this holy festival?



I considered my sister to a girl after 17 years of my life when I was a trainee of DTEd first year in 2010. I have already written a big novel/autobiography 'Majhi Tai : Ek Athvan' about our distant relation of silent Brother and Sister; which is made by platotic & pure mind, a lots of love from my side. The story would tell you lot of pleasant & regretful memories of our silent relation. (The book 'Majhi Tai : Ek Athvan' might never get published but it is available to read online for my readers & fans on my website/blog www.rdhsir.mwb.im www.rdhsir.com. Full book will be uploaded very soon.)

I had decided in 2010 that either I will tie first Rakhi from my sister mentioned above or I will never tie it from anyone; even not from my aunt who had been tying Rakhi on my wrist from my childhood. Because I don't feel any sense in tying Rakhi from any other person after acknowledging someone a sister. That's just like "Dil Ki Tasalli Ke Liye Good Ki Jilebi .. !!" I have committed my commitment successfully until today and wrist of my hand is still gloomy.


In the next year in 2011, my sister's birthday & that year's holy festival of Rakshabandhan had fallen on the very same day i.e. 13th August... What a big and auspicious occasion that was! How big fortune may be for any brother..? I had carried a Rakhi in my pocket, however my hand's wrist was gloomy in that year just because my sister had not tied me a sacred thread of silk... Later my best friend Dipali tied me Rakhi after few days. I was not really interested for my wrist being tied with a thread called Rakhi from her; but somehow I agreed just because of her favour and care during our one and half year's friendship..!

Now one question remains unanswered that why do I also avoid to get my wrist tied by a thread of silk from someone..!! That's because I don't need a sister who would forget me after tying me a Rakhi for one year (atleast on the day of Rakshabandhan.) Although I could not be brother of my sister, I did not lost a single hope to get my sister's love back even today... Because Pope says- "Hope is the base of life." And after all, my sister has mentioned her name as "Yours Sister" in my slam book by meeting me face to face on the last day before returning back to her village.

I celebrated Rakhi on only social media last year. But my best friend Dipali had not forgotten me on the holy occasion; she was the first person who had wished me Rakshabandhan by sending Rakhi via an SMS. But this year myself have freed her from following her duties towards her best friend cum brother; because she is a daughter-in-law of someone's house. It will be my foolishness if I would hope to get wished from her over phone.

I don't believe on virtual friendship but I had considered a sister to someone named Shiba Shaikh on Facebook (in fact herself had said me brother.) I was also accepting that relation gradually & carefully. But she shocked me by blocking even without my single mistake. I felt much guilty because I was deluding myself by treating her as my sister. I thank God that she blocked me earlier before bond of our relationship became stronger. And I decided that I wont say sister to anyone at first glance before deeply thinking. You don't know how I have waited, tried, cried and did so many attempts to achieve my sister's consideration for being called myself as her brother (now also prayers are continue...) I will also observe patience of girls before saying anyone a sister.

On the previous Rakshabandhan I had uploaded a photo with some of my quotations. Reading those quotations any girl named Kiran Pakhare tried to say me her brother. This time herself proved that she was not eligible to be my sister. She also blocked me later. I had taken a right decision that I did not assumed her my sister. But this same virtual world of social media gave me a memorable friend like Mr. Farukh Bin Latif Shah. My belief on this world has been increased.

This year on my 21st birthday; 2013 April 18th, any girl named Malak Al Dunia wished me on Twitter saying me a brother. She is from United Arab Emirates (UAE). So there wasn't any chance of acquaintance because she was not from my country India. How I would have said her my sister? I had swindled two times from two different girls in this virtual world. I did not want to take risk once again. So I tried to check eagerness of that girl for being my sister; and finally that girl passed all of my queries. Sometimes I found that girl as my best friend mentioned above. Finally I could not say 'no' to her. Yes I agree that Malak Al Dunia is my younger sister because first of all she cares me as I care about my first sister... Secondly Malak too belongs to Islamism. No! You are wrong. I am not discriminating in religions. I faith on all the religions. I am proud to be born as a Hindu! And I try to follow Islam because I am influenced by the Islamism! I have mentioned this because both of my sisters belong to Islamism! Anyways I consider my sister to every Mohmadian girl; but this statement of mine does not mean that I don't consider sisters to the girls belonging to other religions... I don't know how long will relation between Malak & Mine long... But my attempts will be continued to maintain our bond happy & last long forever... I hope that Malak will also try & I believe that she will...! I just pray that this virtual world wont deceive us...!! But I want to clear one thing hear... No one can take place of my sister in the first corner of my heart which is reserved for my only sister...


Today my sister Malak Al Dunia also wished me on this holy festival. And she had asked me for her gift doing fun. I hope that she would love my this gift. Sorry if she did not like.
Anyways... This is the 20th August, 2013! Brother & Sister's festival... Rakshabandhan! I wish for all of them who called me a brother or tied me Rakhi anywhere anytime even at once with sacred heart... And first of all I pray & wish HAPPY RAKSHABANDHAN to my both Sisters Tai & MALAK AL DUNIA!!!
Image Source: Happy New Year 2018 images




HAPPY RAKSHABANDHAN
=RAJESH D. HAJARE=


UPDATE:
  • This article was first published (into two posts) on 20/08/2013 at 18:36 IST and edited (All the content published in 2 posts into single post) as well as updated without major changes on 07/08/2017 at 23:30 IST.